शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

साहेब, त्या बंधाऱ्यांत पाणी अडेल काय?

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तालुक्यात मोठया प्रमाणात बंधारे बांधण्याचा सपाटा सुरू आहे. मात्र बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात एक थेंब पाण्याचा दिसत नाही.

सडक अर्जुनी : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तालुक्यात मोठया प्रमाणात बंधारे बांधण्याचा सपाटा सुरू आहे. मात्र बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात एक थेंब पाण्याचा दिसत नाही. नियोजनशून्य कारभाराचे हे फलीत असल्याचे मूर्त उदाहरण असून फक्त पैसा पाण्यात टाकण्याचा प्रकार तालुक्यात सुरू असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या योजना चांगल्या असतात पण राबविणारी यंत्रणाच बरोबर नसल्यास योजनेचे तीन तेरा वाजायला वेळ लागत नाही.पाण्याचा प्रश्न गांभीर्याने घेत राज्यशासनाकडून राज्यात जलयुक्त शिवार योजना मोठ्या धडाक्यात राबविली जात आहे. कृषी विभाग, वन विभाग, लघु पाटबंधारे, सार्वजनिक पाटबंधारे आदी विभागांच्या माध्यमातून ‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ हा उपक्रम राबविला जात आहे. या योजनेंतर्गत कोट्यवधी रूपये खर्चून बंधारे बांधण्याचा धडका तालुक्यात पाहावयास मिळत आहे. तालुक्यातील डव्वा, सौंदड, हेटी, डोंगरगाव/डेपो, कोकणा/जमी., शेंडा, पांढरवाणी, जांभळी, कोसमतोंडी, पांढरी या परिसरात पाणी अडविण्यासाठी मोठमोठे बंधारे बांधले आहेत व सध्या बंधारे बांधण्याचा धडाका सुरूच आहे. मात्र पावसाळा निघून गेल्यावरही आजघडीला या बंधाऱ्यांत एकही थेंब पाणी अडल्याचे दिसून येत नाही.बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाणी अडविल्यास जमिनितील जलस्तर वाढणार. याचा मानवासह वन्यप्राण्यांनाही सहारा मिळणार. विशेष म्हणजे पाण्याची व सिंचनाची सोय होणार या मागचा मुख्य उद्देश आहे. मात्र पावसाचा लहरीपणा उलट परिस्थिती आणते. परिणामी शेतीसाठी भूगर्भातील पाण्याच्या उपसामुळे पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. पाण्याचा स्तर वाढविण्यासाठी जवळजवळ सर्वच जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणी अडविण्याचे काम होत आहे. यातूनच डव्वा परिसरात एकाच नाल्यावर पाच ते सात बंधारे बांधण्यात आले. अधिकाऱ्यांच्या नियोजन शुन्यतेमुळे हे बंधारे बांधल्यामुळे त्या बंधाऱ्यांजवळ आजघडीला एकही थेंब पाणी नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जलयुक्त शिवार हा अभियान खऱ्या अर्थाने राबविल्यास तालुक्यातील शेतकरी ‘सुजलाम सुफलाम’ झाल्याशिवाय राहणार नाही. पण कोणताही अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे समस्या बिकट होताना दिसत आहे. अभियानाच्या नावावर अधिकारी फक्त कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त दिसतात, हे विशेष. त्यामुळे कोट्यवधींचा चुराडा करूनही पाणी दिसत नसल्याने आता एक अडाणीही साहेब, या बंधाऱ्यांत पाणी अडेल का असा टोमणा मारत आहे.