शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

साहेब रुग्णालयात, अंत्यसंस्कारासाठी जातोय, एसटी प्रवाशांची तीच ती कारणे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:31 IST

गोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू ...

गोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. सर्वत्र लॉकडाऊन असून, ई-पास सेवेशिवाय जिल्ह्याबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. बससेवासुद्धा अत्यावश्यक सेवेसाठी सुरू ठेवण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी बससेवा सुरू असून, अत्यावश्यक कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांना ठोस कारण दिल्यावरच एसटीत प्रवासाची मुभा दिली जात आहे. त्यामुळे या काळात प्रवास करणाऱ्यांसाठी बहुतेक प्रवासी हे साहेब माझे नातेवाईक रुग्णालयात अखरेच्या घटका मोजत आहे, साहेब मला अंत्यसंस्कारासाठी जायचे आहे, नातेवाईक फार आजारी आहेत, ही कारणे देत आहेत. त्यातच लॉकडाऊनमुळे बसमध्ये सुद्धा फारसे प्रवासी राहत नसल्याने त्यांना प्रवास करण्याची मुभा दिली जात आहे. जिल्ह्यात गोंदिया आणि देवरी असे दोन आगार असून, यात एकूण १२० बस आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे सध्या केवळ गोंदिया आगाराची १ बस सुरू आहे. ती सुद्धा नियमित नसून प्रवासी मिळाल्यास नागपूरपर्यंत सोडली जाते. एका बसमध्ये सध्या २५ पेक्षा अधिक प्रवासी राहत नसल्याचे गोंदिया आगारप्रमुखांनी सांगितले.

..........

केवळ नागपूर मार्गावर बसफेरी सुरू

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मागील महिनाभरापासून बससेवा जवळपास बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बस सोडल्या जात आहेत. जिल्ह्यातील तिरोडा आणि गोंदिया आगारांपैकी केवळ गोंदिया आगारातून नागपूरसाठी एक बस सोडली जात आहे. बऱ्याचदा प्रवासी मिळत नसल्याचे चित्र आहे.

...........

कोट

मागील महिनाभरापासून सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे बसफेऱ्या पूर्णपणे बंद आहेत. सद्यस्थितीत तर एक बस सोडली जात आहे. मात्र, तिला सुद्धा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. लॉकडाऊनमुळे आगाराचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

- संजना पटले, आगारप्रमुख गोंदिया

...........

वादाचे प्रसंगच नाहीत

सध्या केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बस सोडल्या जात आहे. त्यातच काही अत्यावश्यक कामांसाठी जाणारे प्रवासी येणे-जाणे करीत आहेत. एका बसमध्ये केवळ २० ते २५ प्रवासी असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांशी वाद होण्याचे कुठलेच प्रसंग घडले नाहीत. सध्या केवळ बस नियमित सुरू आहे.

..........

जिल्ह्यातील एकूण आगार : ०२

बस चालविल्या जातात : ०१

सध्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या : २५ ते ३०

.................

तीच कारणे

- लॉकडाऊनमुळे जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी ई-पास आवश्यक आहे, तर कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रवासीसुद्धा अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडत आहे.

- कुणी नातेवाईक आजारी असल्याने त्यांना पाहण्यासाठी तर कुणाच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जात आहे.

- प्रवास करताना प्रवासीसुद्धा नेमके अंत्यसंस्काराला जातो, नातेवाईक आजारी आहे, बऱ्याच दिवसांपासून कुटुंबापासून दूर आहे हीच कारणे देत असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.

.........