शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
4
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
5
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
6
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
7
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
8
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
9
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
10
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
11
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
12
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
13
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
14
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
15
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
16
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
17
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
18
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
19
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
20
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

व्यर्थ न हो बलिदान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 21:49 IST

स्मारकाचे स्मरण निवृत्त सैनिकांच्या संघटनेमुळे अलिकडे होऊ लागले आहे. नुकताच त्यांनी या स्थळी कारगिल विजय दिवस साजरा केला होता. त्यात प्रशासकीय अधिकारी सुद्धा आमंत्रित होते. त्यावेळी स्मारकाच्या सुशोभीकरणाची आठवण करून देण्यात आली. काही वर्षांपूर्वी स्थानिक पंचायत समितीने जिल्हा निधीतून सुमारे साडे चार लक्ष रु पयांचा सुशोभीकरणाचा प्रस्ताव तयार केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : शहराचा नावलौकिक वाढविणारा हा हुतात्मा स्मारक आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ १९७३ मध्ये या स्मारकाची उभारणी झाली. एक विचार केला तर चहुबाजूंनी आवारभिंतीत बंदिस्त असलेले हे स्मारक आहे. दोन कोनशिलांपैकी एका कोनशीलेवर शहीद व कारावास भोगलेल्या ४५ हुतात्म्यांची नावे कोरली आहेत. तर दुसऱ्या कोनशिलेवर भारताचे संविधान कोरले आहे. हे स्मारक मोडकळीस आले आहे. ऑगस्ट क्रांती दिन, स्वातंत्र्य दिन व भारतीय गणराज्याच्या वर्धापन दिनी प्रशासनाला जाग येते. एरवी स्मारकाचे कधीच स्मरण होत असल्याचे आठवत नाही. या स्मारकाची देखभाल, दुरुस्ती व व्यवस्थापन नेमके कुणाकडे आहे हेच कळायला मार्ग नाही. आपल्या गावात देशासाठी बलिदान देणाऱ्याच्या स्मरणार्थ स्मारक आहे, याची साधी कल्पनाही नाही. याला एकमेव कारण हे स्थळ प्रकाश झोतात नाही हेच असू शकते.स्मारकाचे स्मरण निवृत्त सैनिकांच्या संघटनेमुळे अलिकडे होऊ लागले आहे. नुकताच त्यांनी या स्थळी कारगिल विजय दिवस साजरा केला होता. त्यात प्रशासकीय अधिकारी सुद्धा आमंत्रित होते. त्यावेळी स्मारकाच्या सुशोभीकरणाची आठवण करून देण्यात आली. काही वर्षांपूर्वी स्थानिक पंचायत समितीने जिल्हा निधीतून सुमारे साडे चार लक्ष रु पयांचा सुशोभीकरणाचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र तो हवेतच विरला. आजच्या युवापिढीत देशाभिमान जागृत होण्याच्या दृष्टीने या स्मारकाचे प्रेक्षणीय स्थळात रूपांतर होणे काळाची गरज आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.मी शहीद स्मारकभारतमातेला इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे, ९ ऑगस्ट क्रांती दिन... स्वातंत्र्यासाठी १९४२ चा अखेरचा लढा. महात्मा गांधींनी ‘चले जाव’चा नारा दिला. ‘करेंगे या मरेंगे’च्या गगनभेदी घोषणेने अख्खा देश पेटून उठला. या आंदोलनात लाखो तरुणांनी सहभाग नोंदविला अन् बघता बघता सारा देशच जणू तुरुंग झाला. परंतु ९ ऑगस्टला देशात विविध ठिकाणी जनक्षोभ भडकला. या आंदोलनात अनेक वीरांनी प्राणाची पर्वा न करता ब्रिटिश सरकारविरोधात बंड पुकारले. अनेकांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्याच स्मरणार्थ प्रत्येक जिल्ह्यात शहीद स्मारके उभारण्यात आली. आज क्रांती दिनानिमित्त या स्मारकांच्या अवस्थेवर प्रकाश टाकणारे हे वृत्त...