शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

प्रकरण दडपण्यात पोलिसांची भूमिका संशयास्पद

By admin | Updated: July 3, 2017 01:31 IST

मृत राजू दास यांच्या अपघातप्रकरणी पवनी पोलिसांनी एकतर्फी तपास केला असून केवळ आरोपीच्या

राजू दास यांचे अपघात प्रकरण : वडिलांकडून फेरतपासाची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : मृत राजू दास यांच्या अपघातप्रकरणी पवनी पोलिसांनी एकतर्फी तपास केला असून केवळ आरोपीच्या नजीकच्या लोकांचे बयान नोंदविले. यात आर्थिक उलाढाल झाली असून या प्रकरणी फेरतपास करण्याची मागणी वडील चित्तरंजन दास यांनी पत्रपरिषदेत केली आहे. बंगाली वसाहत अरूणनगर येथील राजू चित्तरंजन दास हा नागपूर येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. तो २३ मे रोजी सकाळी नागपूरला दुचाकीने जात असताना बोरगाव-आसगावजवळ एका चारचाकी वाहनाने त्याला जबर धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात पवनी पोलिसांनी आरोपी अनिल मेश्राम (रा. चिमूर) याच्याविरूद्ध गुन्हा नोंदविला. मात्र बऱ्याच बाबी संशयास्पद असून त्या पोलिसांनी दडपल्याचा आरोप करण्यात आला आहे.अपघाताच्या वेळी मृतक राजू हा नागपूरच्या दिशेने दुचाकीने (एमएच ३५/एडी-२५७४) जात होता. तर आरोपी अनिल हा मारूती अल्टो (एमएच ३४/एए-५४३२) या वाहनाने लाखांदूरकडे येत होता. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात राजू दुचाकीवरून खाली पडला. त्यावेळी आरोपीने कार मागे घेतली व लोकांच्या मदतीने मृतकाला कारसमोर सरकावून ठेवले. मृतकाच्या कुटुंबीयांना या अपघाताची माहिती पोलिसांनी दिली नाही तर घटनास्थळावर हजर असलेल्या एका इसमाने भ्रमणध्वनीवरून मृतकाचा लहान भाऊ अमर याला दिली.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दास कुटुंबीय बोरगावकडे काही नातेवाईकांना घेवून निघाले. घटनास्थळावर पोहोचल्यानंतर कारचालकाच्या वाहनाचा समोरचा टायर पंचर झाल्याने हा अपघात घडल्याचे कळले. कुटुंबीयांनी पवनी पोलीस ठाणे गाठले व मृतक राजू तसेच कारचालक कुठे आहे, याविषयी पोलिसांना विचारणा केली. मृतक हा शवचिकित्सा गृहात तर आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीचे नाव व पत्ता ठाण्यात गेल्यानंतर कळले. अपघात २३ मे रोजी झाल्यापासून आरोपी पोलिसांच्या ताब्यात होता. मात्र २५ मे रोजी अटक दाखवून त्याच दिवसी त्याची जामीनावर सुटका झाली.पोलिसांनी आरोपीला दोन दिवसानंतर अटक करून जामीन मिळण्यासाठी संरक्षण दिले, असा आरोप आहे.आरोपीच्या पत्नीला तुम्ही कोठे जात होते, अशी पोलिसांनी विचारणा केली असता निमगाव (अर्जुनी-मोरगाव) येथे एका अंत्यसंस्कारासाठी जात असल्याचे सांगितले. यावर पोलिसांनी हे कारण सांगू नका, दुसरे कोणतेही सांगा, असा सल्ला आरोपीच्या पत्नीला दिल्याचे कुटुंबीयांना प्रत्यक्षदर्शनी सांगितले.मृतकाची पत्नी प्रीती हिला पोलिसांनी बयानासाठी बोलावले. ३ जून रोजी त्यांनी आपले बयान नोंदविले.अपघात झाल्यानंतर आरोपीने मृतकाला उपचारासाठी १ किमी अंतरावर असलेल्या आसगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याचे सौजन्य दाखविले नाही. कदाचित वेळेवर उपचार मिळाला असता तर राजूचे प्राण वाचू शकले असते, असे चित्तरंजन दास यांचे म्हणणे आहे. याविषयी त्यांनी ठाणेदार चौधरी यांची विचारणा केली असता आरोपीनेच अपघाताची माहिती पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अपघाताची माहिती बोरगावच्या पोलीस पाटलांनी पवनी पोलिसांना दिल्याची दस्तावेजात नोंद आहे. आरोपीने पोलिसांना माहिती दिल्याचा काय पुरावा आहे, अशी विचारणा केल्यावर तुम्ही माहितीच्या अधिकारात माहिती घ्या, असे ठाणेदारांनी सांगितल्याचा आरोप दास यांनी केला आहे. ही विसंगती आरोपीला संरक्षण देणारी असल्याचेही त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले.या प्रकरणाविषयी ज्या-ज्या वेळी ठाणेदारांना विचारले तेव्हा आम्ही व्यस्त आहोत, आम्हाला हिच कामे आहेत का? चूक तुमच्या मुलाचीच आहे. कधी ठाण्यात असतानाही, सुट्टीवर आहे अशी उलटसुलट उत्तरे देतात, असा आरोप केला आहे. पोलिसांनी अपघाताचा केलेला पंचनामा अमान्य असून आमच्या समक्ष प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांचे बयान नोंदविण्यात यावे. तसेच सदर प्रकरणाची पूर्णत: व सखोल फेरचौकशी करण्याची मागणी चित्तरंजन दास यांनी पत्रपरिषदेत केली आहे.