शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

प्रकरण दडपण्यात पोलिसांची भूमिका संशयास्पद

By admin | Updated: July 3, 2017 01:31 IST

मृत राजू दास यांच्या अपघातप्रकरणी पवनी पोलिसांनी एकतर्फी तपास केला असून केवळ आरोपीच्या

राजू दास यांचे अपघात प्रकरण : वडिलांकडून फेरतपासाची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : मृत राजू दास यांच्या अपघातप्रकरणी पवनी पोलिसांनी एकतर्फी तपास केला असून केवळ आरोपीच्या नजीकच्या लोकांचे बयान नोंदविले. यात आर्थिक उलाढाल झाली असून या प्रकरणी फेरतपास करण्याची मागणी वडील चित्तरंजन दास यांनी पत्रपरिषदेत केली आहे. बंगाली वसाहत अरूणनगर येथील राजू चित्तरंजन दास हा नागपूर येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. तो २३ मे रोजी सकाळी नागपूरला दुचाकीने जात असताना बोरगाव-आसगावजवळ एका चारचाकी वाहनाने त्याला जबर धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात पवनी पोलिसांनी आरोपी अनिल मेश्राम (रा. चिमूर) याच्याविरूद्ध गुन्हा नोंदविला. मात्र बऱ्याच बाबी संशयास्पद असून त्या पोलिसांनी दडपल्याचा आरोप करण्यात आला आहे.अपघाताच्या वेळी मृतक राजू हा नागपूरच्या दिशेने दुचाकीने (एमएच ३५/एडी-२५७४) जात होता. तर आरोपी अनिल हा मारूती अल्टो (एमएच ३४/एए-५४३२) या वाहनाने लाखांदूरकडे येत होता. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात राजू दुचाकीवरून खाली पडला. त्यावेळी आरोपीने कार मागे घेतली व लोकांच्या मदतीने मृतकाला कारसमोर सरकावून ठेवले. मृतकाच्या कुटुंबीयांना या अपघाताची माहिती पोलिसांनी दिली नाही तर घटनास्थळावर हजर असलेल्या एका इसमाने भ्रमणध्वनीवरून मृतकाचा लहान भाऊ अमर याला दिली.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दास कुटुंबीय बोरगावकडे काही नातेवाईकांना घेवून निघाले. घटनास्थळावर पोहोचल्यानंतर कारचालकाच्या वाहनाचा समोरचा टायर पंचर झाल्याने हा अपघात घडल्याचे कळले. कुटुंबीयांनी पवनी पोलीस ठाणे गाठले व मृतक राजू तसेच कारचालक कुठे आहे, याविषयी पोलिसांना विचारणा केली. मृतक हा शवचिकित्सा गृहात तर आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीचे नाव व पत्ता ठाण्यात गेल्यानंतर कळले. अपघात २३ मे रोजी झाल्यापासून आरोपी पोलिसांच्या ताब्यात होता. मात्र २५ मे रोजी अटक दाखवून त्याच दिवसी त्याची जामीनावर सुटका झाली.पोलिसांनी आरोपीला दोन दिवसानंतर अटक करून जामीन मिळण्यासाठी संरक्षण दिले, असा आरोप आहे.आरोपीच्या पत्नीला तुम्ही कोठे जात होते, अशी पोलिसांनी विचारणा केली असता निमगाव (अर्जुनी-मोरगाव) येथे एका अंत्यसंस्कारासाठी जात असल्याचे सांगितले. यावर पोलिसांनी हे कारण सांगू नका, दुसरे कोणतेही सांगा, असा सल्ला आरोपीच्या पत्नीला दिल्याचे कुटुंबीयांना प्रत्यक्षदर्शनी सांगितले.मृतकाची पत्नी प्रीती हिला पोलिसांनी बयानासाठी बोलावले. ३ जून रोजी त्यांनी आपले बयान नोंदविले.अपघात झाल्यानंतर आरोपीने मृतकाला उपचारासाठी १ किमी अंतरावर असलेल्या आसगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याचे सौजन्य दाखविले नाही. कदाचित वेळेवर उपचार मिळाला असता तर राजूचे प्राण वाचू शकले असते, असे चित्तरंजन दास यांचे म्हणणे आहे. याविषयी त्यांनी ठाणेदार चौधरी यांची विचारणा केली असता आरोपीनेच अपघाताची माहिती पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अपघाताची माहिती बोरगावच्या पोलीस पाटलांनी पवनी पोलिसांना दिल्याची दस्तावेजात नोंद आहे. आरोपीने पोलिसांना माहिती दिल्याचा काय पुरावा आहे, अशी विचारणा केल्यावर तुम्ही माहितीच्या अधिकारात माहिती घ्या, असे ठाणेदारांनी सांगितल्याचा आरोप दास यांनी केला आहे. ही विसंगती आरोपीला संरक्षण देणारी असल्याचेही त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले.या प्रकरणाविषयी ज्या-ज्या वेळी ठाणेदारांना विचारले तेव्हा आम्ही व्यस्त आहोत, आम्हाला हिच कामे आहेत का? चूक तुमच्या मुलाचीच आहे. कधी ठाण्यात असतानाही, सुट्टीवर आहे अशी उलटसुलट उत्तरे देतात, असा आरोप केला आहे. पोलिसांनी अपघाताचा केलेला पंचनामा अमान्य असून आमच्या समक्ष प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांचे बयान नोंदविण्यात यावे. तसेच सदर प्रकरणाची पूर्णत: व सखोल फेरचौकशी करण्याची मागणी चित्तरंजन दास यांनी पत्रपरिषदेत केली आहे.