बोंडगावदेवी : पूर्वीच्या रोजगार हमी योजना कामासंबंधी रोजगार हमी काम कमी, अर्धे तुम्ही, अर्धे तुम्ही असे खुलेआम बोलल्या जात होते. आताच्या मग्रारोहयोबाबतीत काम कमी दाम जास्त म्हणून तर सधन लोकांची उपस्थित जास्त असे चित्र आजघडीला परिसरातील रोहयो कामावर पाहायला मिळत आहे. स्थानिक ग्रामपंचायतच्या वतीने गावामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम सुरू आहे. गावातील जॉब कार्ड धारकांना वर्षभरातून कुटुंबातील एका व्यक्तीला किमान १०० दिवस रोजगाराची संधी मिळावी असा दंडक आहे. आज गावातील गोरगरीब मजुरांना रोजगाराची संधी गावातच मिळावी, पोटासाठी ग्रामस्थांना वनवन भटकावे लागू नये म्हणून महाराष्ट्र गामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावोगावी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सध्या गावागावात इतरत्र दुसरे काम उपलब्ध नसल्याने अख्या गावकऱ्यांनी पसंती मग्रारोहयो कामाला प्राधान्याने दिसत आहे. गावातील मजूर ‘नमुना-४’ भरून कामाची मागणी ग्रामपंचायतकडे करतात. गावामधील भूमिहीन, अल्पभूधारक, कष्टकरी, नित्यनेम बारमाही मजुरीची मागणी करतात. परंतु ज्यांनी कधी आपल्या कुटुंबाच्या कामाव्यतिरिक्त इतरत्र कामासाठी भटकंती कधी केलीच नाही. ज्यांना कामाची आवश्यकता नाही, गावातील अशा सधन लोकांनी सुरू असलेल्या मग्रारोह योजनेच्या कामाला देखणी पसंती दाखविल्याचे दिसत आहे. परिसरातील कामावर फेरफटका मारला असता अनेक विचित्र किस्से आवर्जुन दिसून आले. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविणारे सामान्य माणूस कामावर राबताना दिसतात. त्यांना रोजगाराची गरज आहे हे समजू शकते. परंतु जी व्यक्ती आपली शेती व आपल्या कुटुंबातील कामाव्यतिरीक्त, दुसऱ्यांच्या मजुरीवर कधीही गेले नाही, असे सधन माणसे आज मग्रारोहयो कामावर देखण्या उपस्थित आढळले. सध्या मग्रारोहयो कामावर रोजगार सेवकाचे नियंत्रण आहे. मग्रारोहयो कामावर पाहिजे त्या प्रमाणात श्रम खर्ची होत नसल्याने अनेकांची पसंती त्या कामावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कामापेक्षा दाम जास्त असल्याने अनेकांची झुंबड उडते.(वार्ताहर)
रोहयोच्या कामावर सधन लोकांची मजुरी!
By admin | Updated: May 29, 2016 02:07 IST