शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

सलंगटोल्यातील आदिवासी जगताहेत रस्त्याविना

By admin | Updated: January 10, 2016 02:08 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील दल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सलंगटोल्याचे आदिवासी स्वातंत्र्योत्तर काळातही रस्त्याविना जगत आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष : रस्त्यासाठी वर्षानुवर्षांपासून पायपीटशेंडा (कोयलारी) : सडक अर्जुनी तालुक्यातील दल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सलंगटोल्याचे आदिवासी स्वातंत्र्योत्तर काळातही रस्त्याविना जगत आहेत. वारंवार मागणी करुनही त्यांच्या पदरी निराशाच पडल्याने ते स्वत:ला दुर्दैवी मानत आहेत.सडकअर्जुनीवरुन फक्त नऊ कि.मी. अंतरावर असलेल्या सलंगटोला नावाचे गाव आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या गावात फक्त आदिवासी समाजाचे लोक वास्तव्याने राहतात. परंतु त्यांना आजही धुऱ्यापाळीने चालून आपल्या गरजा कराव्या लागतात हे वास्तव आहे.आपल्याला हक्काचा रस्ता मिळावा यासाठी येथील तरुण राजेश धुर्वे रस्त्याची मागणी वारंवार करीत आहेत. तरी प्रशासनाला जाग येत नसल्याचे विदारक स्वरुप सद्यस्थितीत दिसून येते.या जिल्ह्याचे पालकमंत्री सडक अर्जुनी तालुक्याचे असून त्यांच्या घरापासून या गावाचे अंतर केवळ नऊ कि.मी. आहे. हे गाव त्यांच्याच विधानसभा क्षेत्रात असूनही त्या गावाला जाण्या-येण्याचा मार्ग नाही. त्यामुळे त्यांच्या परिसरातील गावावर किती जवळीक असेल हे दिसून येते.या गावातील विद्यार्थी विद्यार्जनासाठी उशिखेडा, शेंडा, डोंगरगाव, (सडक) व तालुक्याच्या ठिकाणी जातात. पावसाळ्यात त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. वेळ पडली तर रस्त्याअभावी चार-चार दिवस शाळेला बुट्टी मारावी लागते. वृद्धांची समस्या याहूनही बिकट आहे. पावसाळ्यात प्रकृती बिघडली तर वृद्धांना धुऱ्यापाळीने खाटेवर न्यावे लागते. एवढी बिकट समस्या असूनही प्रशासनाचे अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी रस्त्याची दखल घेत नाही. यावरून तालुक्याच्या नकाशातून संलगटोल्याचे नाव वगळण्यात तर आले नसावे? अशी संका नागरिकांना येते.पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत गाव तेथे रस्ता ही योजना राबविण्यात आली. मग सलंगटोल्यावर अन्याय का? असे एक ना अनेक प्रश्न उद्भवतात. निवडणूक काळात मोठमोठे नेते धुऱ्यापाळीने येऊन या गावाला भेट देतात. गावकरी मतदानाच्या बदल्यात रस्त्याची मागणी करतात. परंतु पाच वर्षाचा कार्यकाळ लोटूनही त्या गावाकडे ढुकूंनही लोकप्रतिनिधी पाहात नाही. स्वातंत्र्याची ६५ वर्षे उलटली तरीे सलंगटोलावासीयांनी अजूनही रस्त्याची सोय झाली नाही. अनेकदा निवेदन देऊनही त्यांना साधा रस्ता उपलब्ध झाला नाही. लोकप्रतिनिधींनी या सलंगटोलावासीयांच्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)