शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

सलंगटोल्यातील आदिवासी जगताहेत रस्त्याविना

By admin | Updated: January 10, 2016 02:08 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील दल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सलंगटोल्याचे आदिवासी स्वातंत्र्योत्तर काळातही रस्त्याविना जगत आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष : रस्त्यासाठी वर्षानुवर्षांपासून पायपीटशेंडा (कोयलारी) : सडक अर्जुनी तालुक्यातील दल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सलंगटोल्याचे आदिवासी स्वातंत्र्योत्तर काळातही रस्त्याविना जगत आहेत. वारंवार मागणी करुनही त्यांच्या पदरी निराशाच पडल्याने ते स्वत:ला दुर्दैवी मानत आहेत.सडकअर्जुनीवरुन फक्त नऊ कि.मी. अंतरावर असलेल्या सलंगटोला नावाचे गाव आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या गावात फक्त आदिवासी समाजाचे लोक वास्तव्याने राहतात. परंतु त्यांना आजही धुऱ्यापाळीने चालून आपल्या गरजा कराव्या लागतात हे वास्तव आहे.आपल्याला हक्काचा रस्ता मिळावा यासाठी येथील तरुण राजेश धुर्वे रस्त्याची मागणी वारंवार करीत आहेत. तरी प्रशासनाला जाग येत नसल्याचे विदारक स्वरुप सद्यस्थितीत दिसून येते.या जिल्ह्याचे पालकमंत्री सडक अर्जुनी तालुक्याचे असून त्यांच्या घरापासून या गावाचे अंतर केवळ नऊ कि.मी. आहे. हे गाव त्यांच्याच विधानसभा क्षेत्रात असूनही त्या गावाला जाण्या-येण्याचा मार्ग नाही. त्यामुळे त्यांच्या परिसरातील गावावर किती जवळीक असेल हे दिसून येते.या गावातील विद्यार्थी विद्यार्जनासाठी उशिखेडा, शेंडा, डोंगरगाव, (सडक) व तालुक्याच्या ठिकाणी जातात. पावसाळ्यात त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. वेळ पडली तर रस्त्याअभावी चार-चार दिवस शाळेला बुट्टी मारावी लागते. वृद्धांची समस्या याहूनही बिकट आहे. पावसाळ्यात प्रकृती बिघडली तर वृद्धांना धुऱ्यापाळीने खाटेवर न्यावे लागते. एवढी बिकट समस्या असूनही प्रशासनाचे अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी रस्त्याची दखल घेत नाही. यावरून तालुक्याच्या नकाशातून संलगटोल्याचे नाव वगळण्यात तर आले नसावे? अशी संका नागरिकांना येते.पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत गाव तेथे रस्ता ही योजना राबविण्यात आली. मग सलंगटोल्यावर अन्याय का? असे एक ना अनेक प्रश्न उद्भवतात. निवडणूक काळात मोठमोठे नेते धुऱ्यापाळीने येऊन या गावाला भेट देतात. गावकरी मतदानाच्या बदल्यात रस्त्याची मागणी करतात. परंतु पाच वर्षाचा कार्यकाळ लोटूनही त्या गावाकडे ढुकूंनही लोकप्रतिनिधी पाहात नाही. स्वातंत्र्याची ६५ वर्षे उलटली तरीे सलंगटोलावासीयांनी अजूनही रस्त्याची सोय झाली नाही. अनेकदा निवेदन देऊनही त्यांना साधा रस्ता उपलब्ध झाला नाही. लोकप्रतिनिधींनी या सलंगटोलावासीयांच्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)