शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

रस्ता रोखून दर्शविला विरोध

By admin | Updated: May 15, 2015 00:47 IST

शासनाच्या भू-संपादन कायद्याविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आता रस्त्यावर उतरले असून यातूनच गुरूवारी (दि.१४) राष्ट्रव्यापी रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

देवरी/रावणवाडी : शासनाच्या भू-संपादन कायद्याविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आता रस्त्यावर उतरले असून यातूनच गुरूवारी (दि.१४) राष्ट्रव्यापी रस्तारोको आंदोलन करण्यात आले. या राष्ट्रव्यापी आंदोलनांतर्गत गोंदिया तालुक्यातील रावणवाडी येथे मुख्य मार्गावर तसेच देवरी तालुक्यातील चिचगड मार्गावर रस्तारोको आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे रावणवाडी येथे भाकपच्या कार्यकर्त्यांनी अटक करवून घेतली. भू-संपादन कायदा २०१३ मध्ये संशोधन करून सत्तेत आलेली भाजप शासन विदेशी भांडवलदार, कारखानदार, भू-माफिया व बिल्डर्सच्या हितास्तव नवीन भू संपादन कायदा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर नव्याने तयार करण्यात येणारा कायदा शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण जनतेसाठी घातक असल्याचे कारण पुढे करीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष त्याचा विरोध करीत आहे. आपला विरोध दर्शविण्यासाठी भाकपने राष्ट्रव्यापी आंदोलन झेडले असून त्यांतर्गत गुरूवारी (दि.१४) जिल्ह्यातील मुख्य मार्गांवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांतर्गत रावणवाडी येथे मुख्य मार्गावर भाकप कार्यकर्त्यांनी दुपारी १.३० वाजता रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे २० मिनीटे अवरूद्ध झाली होती. तर आंदोलनाला बघता पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान मंडळ अधिकारी अशोक कोरे यांना भू संपादन अध्यादेश रद्द करणे तसेच अदानी पावर प्रोजेक्ट, बिरसी एअरपोर्ट व लिफ्ट इरिगेशन प्रकल्पामुळे जिल्ह्यातील कित्येक कित्येक शेतकरी प्रभावीत झालेत. त्यांचे पूनर्वसन करून रोजगाराची व्यवस्था करण्याची मागणी असलेले निवेदन देण्यात आले. पश्चात सुमारे ५०-६० कार्यकर्त्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली. मोर्चात भाकपचे जिल्हा सहसचिव रामचंद्र पाटील, तालुका सचिव करूणा गणवीर, तालूका सहसचिव प्रल्हाद उके, छन्नू रामटेके, क्रांती गणवीर, ताराचंद डोमळे, जितेंद्र गजभिये, सत्यपाल उके यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तर देवरी येथे देवरी शाखेने मोर्चा काढून चिचगड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या मोर्चाचे नेतृत्व भाकपचे जिल्हा सचिव शेखर कनोजिया यांनी केले. आंदोलनांतर्गत भू-संपादन कायद्याविरोधात नारेबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे चिचगड मार्गावरील वाहतूक काही काळ अवरूद्ध झाली होती. दरम्यान भू-संपादन कायदा रद्द करणे, वनहक्क जमीन अतिक्रमण करणाऱ्यांना पट्टे द्या, रोहयो अंतर्गत कामात प्रती कुटूंब दोन व्यक्तींना कामे द्या, २०० दिवस कामे देऊन ३०० रूपये मजूरी द्या आदि मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी सुयर्वंशी यांना देण्यात आले.