शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

रस्ता रोखून दर्शविला विरोध

By admin | Updated: May 15, 2015 00:47 IST

शासनाच्या भू-संपादन कायद्याविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आता रस्त्यावर उतरले असून यातूनच गुरूवारी (दि.१४) राष्ट्रव्यापी रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

देवरी/रावणवाडी : शासनाच्या भू-संपादन कायद्याविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आता रस्त्यावर उतरले असून यातूनच गुरूवारी (दि.१४) राष्ट्रव्यापी रस्तारोको आंदोलन करण्यात आले. या राष्ट्रव्यापी आंदोलनांतर्गत गोंदिया तालुक्यातील रावणवाडी येथे मुख्य मार्गावर तसेच देवरी तालुक्यातील चिचगड मार्गावर रस्तारोको आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे रावणवाडी येथे भाकपच्या कार्यकर्त्यांनी अटक करवून घेतली. भू-संपादन कायदा २०१३ मध्ये संशोधन करून सत्तेत आलेली भाजप शासन विदेशी भांडवलदार, कारखानदार, भू-माफिया व बिल्डर्सच्या हितास्तव नवीन भू संपादन कायदा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर नव्याने तयार करण्यात येणारा कायदा शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण जनतेसाठी घातक असल्याचे कारण पुढे करीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष त्याचा विरोध करीत आहे. आपला विरोध दर्शविण्यासाठी भाकपने राष्ट्रव्यापी आंदोलन झेडले असून त्यांतर्गत गुरूवारी (दि.१४) जिल्ह्यातील मुख्य मार्गांवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांतर्गत रावणवाडी येथे मुख्य मार्गावर भाकप कार्यकर्त्यांनी दुपारी १.३० वाजता रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे २० मिनीटे अवरूद्ध झाली होती. तर आंदोलनाला बघता पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान मंडळ अधिकारी अशोक कोरे यांना भू संपादन अध्यादेश रद्द करणे तसेच अदानी पावर प्रोजेक्ट, बिरसी एअरपोर्ट व लिफ्ट इरिगेशन प्रकल्पामुळे जिल्ह्यातील कित्येक कित्येक शेतकरी प्रभावीत झालेत. त्यांचे पूनर्वसन करून रोजगाराची व्यवस्था करण्याची मागणी असलेले निवेदन देण्यात आले. पश्चात सुमारे ५०-६० कार्यकर्त्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली. मोर्चात भाकपचे जिल्हा सहसचिव रामचंद्र पाटील, तालुका सचिव करूणा गणवीर, तालूका सहसचिव प्रल्हाद उके, छन्नू रामटेके, क्रांती गणवीर, ताराचंद डोमळे, जितेंद्र गजभिये, सत्यपाल उके यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तर देवरी येथे देवरी शाखेने मोर्चा काढून चिचगड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या मोर्चाचे नेतृत्व भाकपचे जिल्हा सचिव शेखर कनोजिया यांनी केले. आंदोलनांतर्गत भू-संपादन कायद्याविरोधात नारेबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे चिचगड मार्गावरील वाहतूक काही काळ अवरूद्ध झाली होती. दरम्यान भू-संपादन कायदा रद्द करणे, वनहक्क जमीन अतिक्रमण करणाऱ्यांना पट्टे द्या, रोहयो अंतर्गत कामात प्रती कुटूंब दोन व्यक्तींना कामे द्या, २०० दिवस कामे देऊन ३०० रूपये मजूरी द्या आदि मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी सुयर्वंशी यांना देण्यात आले.