शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सडक अर्जुनी-शेंडा रस्ता ठरतोय प्रवाशांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 06:00 IST

अताशा आशिर्वाद बिल्डर्स नागपूर यांच्याकडे सदर रस्त्याचे काम आहे. या कामाची अंदाजे किमत २२ कोटी रुपये असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. त्यामध्ये २ किलो मीटर हा रस्ता सिमेंटीकरण असल्याचेही सांगितले. कामाची मंजुरी १४ नोव्हेंबर २०१८ ची असून काम संपविण्याचा अवधी हा १३ नोव्हेंबर २०२० पर्यंत आहे. एवढ्या मोठ्या कामासाठी काम करणारी यंत्रणा फारच मात्र तुटपुंजी आहे.

ठळक मुद्देकंत्राटदाराची मनमानी : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

राजकुमार भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : तालुक्यातील सडक-अर्जुनी-शेंडा रस्त्याचे काम अतिशय कासवगतीने सुरू आहे. रस्ता बांधकामासाठी अर्धवट कामासाठी खोदून ठेवलेल्या रस्ता आणि रस्त्यावर ठेवलेल्या साहित्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.अताशा आशिर्वाद बिल्डर्स नागपूर यांच्याकडे सदर रस्त्याचे काम आहे. या कामाची अंदाजे किमत २२ कोटी रुपये असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. त्यामध्ये २ किलो मीटर हा रस्ता सिमेंटीकरण असल्याचेही सांगितले. कामाची मंजुरी १४ नोव्हेंबर २०१८ ची असून काम संपविण्याचा अवधी हा १३ नोव्हेंबर २०२० पर्यंत आहे. एवढ्या मोठ्या कामासाठी काम करणारी यंत्रणा फारच मात्र तुटपुंजी आहे. अतिशय कमी मजूर कामावर असल्यामुळे कंत्राटदाराचे कामावर पूर्ण दुर्लक्ष आहे. सडक-अर्जुनी ते ग्रामीण रुग्णालय पर्यंतचा एक किलोमीटर रस्ता हा सिमेंट रोड असणार असल्यामुळे मोठ्या नाल्याचे काम मागील वर्षीपासून सुरु आहे. एक वर्ष लोटूनही एक कि.मी. सिमेंट क्रांकीट नाल्याचे बांधकाम पूर्ण होवू शकले नाही.अनेक ठिकाणी नाल्याचे खोदकाम करुन ठेवले परंतु बाजूची जागा भरण टाकून भरल्या गेली नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघात झाले आहे. नाल्याच्या बाजूचे खोदकाम केलेली जागा भरण टाकून भरल्यास योग्य होईल. परंतु तसे मात्र दिसून येत नाही. रस्त्याच्या बाजूला मुरुम,गिट्टी पडलेली असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. केसलवाडा, रेंगेपार, उशिखेडा आणि शेंडा या गावांना जाण्यासाठी नागरिकांना रस्त्याच्या धुळीचा सामना करावा लागतो. उलट दुचाकी व चारचाकी वाहने पंचर होतात ते अलग. एखादा रुग्ण आणायचे म्हणजे फार मोठे संकट आहे.सदर कामाची देखरेख व्हावी याकरिता तांत्रीक मंडळी आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (सावंगी) या अंतर्गत या कामावर नियंत्रण ठेवते. परंतु सदर कामावर लक्ष फक्त कार्यालयातूनच दिले जात असल्याचे निदर्शनास येते. रस्ता आणि नाल्याची अवस्था पाहिली तर लक्षात येते की सदर कामावर कोणतीही देखरेख नाही. कंत्राटदाराच्या जसे मनात येईल तशा प्रकारचे काम आणि निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. या रस्ता बांधकामाकडे उपविभागीय बांधकाम विभागाने लक्ष रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.कामे व्यवस्थित करावी आणि रस्ता बांधकामाची गती वाढवावी असे मी वारंवार कंत्राटदाराला सांगितले आहे. परंतु कंत्राटदार लक्ष देत नाही.- प्रकाश लांजेवार,उपविभागीय अभियंता, कार्यालय सडक-अर्जुनी (सावंगी) 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा