शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

रस्ता खडीकरणाच्या कामात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:36 IST

गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत तेढा येथे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत महाजनटोला ते नवाटोला रस्ता खडीकरणाचे काम करण्यात आले. मात्र हे काम करताना कोणतेही मस्टर न काढता व बाहेरील मजूर लावून काम करण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देबांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर : सीईओंकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनिंबा (तेढा) : गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत तेढा येथे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत महाजनटोला ते नवाटोला रस्ता खडीकरणाचे काम करण्यात आले. मात्र हे काम करताना कोणतेही मस्टर न काढता व बाहेरील मजूर लावून काम करण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.महाजनटोला ते नवाटोला रस्ता खडीकरणाच्या कामात गिट्टी, मुरुम या साहित्याची रॉयल्टी न काढता विना रॉयल्टीने यात निकृष्ट साहित्याचा वापर केल्याचा आरोप आहे. रस्त्याच्या कामात मुरूमाऐवजी विहिरीतील मलमा वापरण्यात आला. निकृष्ट दर्जाचे साहित्त्य वापरुन रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आल्याने अल्पावधीत रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाºया वाहन चालकांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागते. या कामावर बांधकाम साहित्य टाकण्याचे व घोटाई करण्याचे काम एका कंत्राटदाराला पेटी कंत्राट पध्दतीने देण्यात आल्याची माहिती आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कामे करताना गावातील मजुरांना प्राधान्य देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र ग्रामपंचायतने या कामावर बाहेरील मजूर लावून गावातील मजुरांना कामापासून वंचित ठेवले. या कामात मोठ्या भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावातील मजुरांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी, तहसीलदार गोरेगाव व गटविकास अधिकारी पं.स. गोरेगाव यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीतून केली आहे.नाल्यावरील बांधकामावर प्रश्नचिन्हमहाजनटोला- नवाटोला या रस्त्यावर एक नाला आहे. या नाल्यावर सिंमेटचे बांधकाम करायचे होते. तसेच सिमेंट क्रांकीटचे बेस तयार करण्याची गरज होती. मात्र तसे न करता मातीवरच क्रांकीट टाकण्यात आले. पावसाळ्यात दरवर्षी या नाल्याला पूर येतो. तसेच शालेय विद्यार्थी सुध्दा याच नाल्यावरुन ये-जा करतात. निकृष्ठ बांधकामामुळे पावसाळ्यात नाल्यावरील बांधकाम वाहून गेल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल परिसरातील गावकºयांनी उपस्थित केला आहे.