शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या महागाईने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:20 IST

सुरेंद्र भांडारकर मुंडीकोटा : परिसरात शेतकऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेती करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय ...

सुरेंद्र भांडारकर

मुंडीकोटा : परिसरात शेतकऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेती करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. वर्षभर शेतीचे कामे करुन आपला उदरनिर्वाह करीत असतात. या महागाईच्या युगात शेती करणे परवडत नाहीत, असे शेतकऱ्यांकडून बोलले जाते. यावेळी काही शेतकरी आपली शेती ठेका, बटई देतात तर अनेक शेतकरी स्वत:च शेतीची कामे करीत असतात. यावर्षी बी-बियाणे, ट्रॅक्टर तसेच मजुरीचे दर गगणाला भिडल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

पैसा खर्च करुन शेतीसाठी वेळेवर मजूर मिळत नाहीत अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. स्वत: राबेल त्यांची शेती, असे पूर्वीचे वृध्द म्हणत होते. ही बाब सत्य आहे. रात्रंदिवस शेतकरी काबाडकष्ट करुन आपल्या शेतीत राबत असतो. कधी-कधी शेतकऱ्यांवर अतिवृष्टी, पूर, अपुरा पाऊस यामुळे हाती आलेले पीक गमविण्याची वेळ येते. बळीराजा अनेक संकटाला तोंड देत असते. पण शेती करणे सोडत नाहीत. त्यातच वर्षभराचा खर्च लग्न, मुला-मुलींचे शिक्षण व इतर खर्च यात शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत असतात. मुंडीकोटा परिसरात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी धानाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्र्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. मात्र यंदा रिकामी नसल्याने खरेदी केलेला धान ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रब्बीच्या धान खरेदीचा गोंधळ कायम आहे.

......

शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक भुर्दंड

मुंडीकोटा येथे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांनी विविध सेवा सहकारी संस्था मुंडीकोटा यांना खरीप हंगामासाठी धान खरेदी केंद्र देण्यात आले होते. येथील शासकीय गोदाम व सेवा सहकारी गोदाम हे दोन्ही गोदाम पूर्ण भरलेले आहेत. शासनाचे त्या मालाची अजून उचल केली नाही. परिणामी शेतकरी हा अडचणीत सापडलेला आहे. मुंडीकोटा परिसरातील धान (तिरोडा) खमारी या केंद्रावर नेण्याचा सल्ला संस्था चालक हे शेतकऱ्यांना देत असते. पण मुंडीकोटा ते खमारी अंतर येथून २० किमी आहे. ट्रॅक्टर भरुन नेणे व भाडा देणे आणि काटा होईपर्यंत थांबणे हे शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाहीत.

....

अधिक उत्पादन होवूनही नुकसान

शेतकऱ्यांची रब्बी धानाची चुरणी व मळणी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी ते धान आपल्या घर आणून ठेवले आहेत. व्यापारी कमी दरात धान खरेदी करुन शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे धान ठेवण्याकरीता जागा नाहीत,त्यांनी काय करावे,असा प्रश्न निर्माण झाला आहे. पिकेल तर विकेल पण काय? अधिक उत्पादन होऊन सुध्दा शेतकऱ्यांचे नुकसान सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.