शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

वाढत्या महागाईने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:20 IST

सुरेंद्र भांडारकर मुंडीकोटा : परिसरात शेतकऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेती करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय ...

सुरेंद्र भांडारकर

मुंडीकोटा : परिसरात शेतकऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेती करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. वर्षभर शेतीचे कामे करुन आपला उदरनिर्वाह करीत असतात. या महागाईच्या युगात शेती करणे परवडत नाहीत, असे शेतकऱ्यांकडून बोलले जाते. यावेळी काही शेतकरी आपली शेती ठेका, बटई देतात तर अनेक शेतकरी स्वत:च शेतीची कामे करीत असतात. यावर्षी बी-बियाणे, ट्रॅक्टर तसेच मजुरीचे दर गगणाला भिडल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

पैसा खर्च करुन शेतीसाठी वेळेवर मजूर मिळत नाहीत अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. स्वत: राबेल त्यांची शेती, असे पूर्वीचे वृध्द म्हणत होते. ही बाब सत्य आहे. रात्रंदिवस शेतकरी काबाडकष्ट करुन आपल्या शेतीत राबत असतो. कधी-कधी शेतकऱ्यांवर अतिवृष्टी, पूर, अपुरा पाऊस यामुळे हाती आलेले पीक गमविण्याची वेळ येते. बळीराजा अनेक संकटाला तोंड देत असते. पण शेती करणे सोडत नाहीत. त्यातच वर्षभराचा खर्च लग्न, मुला-मुलींचे शिक्षण व इतर खर्च यात शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत असतात. मुंडीकोटा परिसरात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी धानाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्र्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. मात्र यंदा रिकामी नसल्याने खरेदी केलेला धान ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रब्बीच्या धान खरेदीचा गोंधळ कायम आहे.

......

शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक भुर्दंड

मुंडीकोटा येथे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांनी विविध सेवा सहकारी संस्था मुंडीकोटा यांना खरीप हंगामासाठी धान खरेदी केंद्र देण्यात आले होते. येथील शासकीय गोदाम व सेवा सहकारी गोदाम हे दोन्ही गोदाम पूर्ण भरलेले आहेत. शासनाचे त्या मालाची अजून उचल केली नाही. परिणामी शेतकरी हा अडचणीत सापडलेला आहे. मुंडीकोटा परिसरातील धान (तिरोडा) खमारी या केंद्रावर नेण्याचा सल्ला संस्था चालक हे शेतकऱ्यांना देत असते. पण मुंडीकोटा ते खमारी अंतर येथून २० किमी आहे. ट्रॅक्टर भरुन नेणे व भाडा देणे आणि काटा होईपर्यंत थांबणे हे शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाहीत.

....

अधिक उत्पादन होवूनही नुकसान

शेतकऱ्यांची रब्बी धानाची चुरणी व मळणी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी ते धान आपल्या घर आणून ठेवले आहेत. व्यापारी कमी दरात धान खरेदी करुन शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे धान ठेवण्याकरीता जागा नाहीत,त्यांनी काय करावे,असा प्रश्न निर्माण झाला आहे. पिकेल तर विकेल पण काय? अधिक उत्पादन होऊन सुध्दा शेतकऱ्यांचे नुकसान सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.