शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
5
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
6
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
7
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
8
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
9
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
13
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
14
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
15
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
16
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
17
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
18
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
19
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
20
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

वाढत्या महागाईने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:20 IST

सुरेंद्र भांडारकर मुंडीकोटा : परिसरात शेतकऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेती करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय ...

सुरेंद्र भांडारकर

मुंडीकोटा : परिसरात शेतकऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेती करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. वर्षभर शेतीचे कामे करुन आपला उदरनिर्वाह करीत असतात. या महागाईच्या युगात शेती करणे परवडत नाहीत, असे शेतकऱ्यांकडून बोलले जाते. यावेळी काही शेतकरी आपली शेती ठेका, बटई देतात तर अनेक शेतकरी स्वत:च शेतीची कामे करीत असतात. यावर्षी बी-बियाणे, ट्रॅक्टर तसेच मजुरीचे दर गगणाला भिडल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

पैसा खर्च करुन शेतीसाठी वेळेवर मजूर मिळत नाहीत अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. स्वत: राबेल त्यांची शेती, असे पूर्वीचे वृध्द म्हणत होते. ही बाब सत्य आहे. रात्रंदिवस शेतकरी काबाडकष्ट करुन आपल्या शेतीत राबत असतो. कधी-कधी शेतकऱ्यांवर अतिवृष्टी, पूर, अपुरा पाऊस यामुळे हाती आलेले पीक गमविण्याची वेळ येते. बळीराजा अनेक संकटाला तोंड देत असते. पण शेती करणे सोडत नाहीत. त्यातच वर्षभराचा खर्च लग्न, मुला-मुलींचे शिक्षण व इतर खर्च यात शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत असतात. मुंडीकोटा परिसरात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी धानाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्र्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. मात्र यंदा रिकामी नसल्याने खरेदी केलेला धान ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रब्बीच्या धान खरेदीचा गोंधळ कायम आहे.

......

शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक भुर्दंड

मुंडीकोटा येथे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांनी विविध सेवा सहकारी संस्था मुंडीकोटा यांना खरीप हंगामासाठी धान खरेदी केंद्र देण्यात आले होते. येथील शासकीय गोदाम व सेवा सहकारी गोदाम हे दोन्ही गोदाम पूर्ण भरलेले आहेत. शासनाचे त्या मालाची अजून उचल केली नाही. परिणामी शेतकरी हा अडचणीत सापडलेला आहे. मुंडीकोटा परिसरातील धान (तिरोडा) खमारी या केंद्रावर नेण्याचा सल्ला संस्था चालक हे शेतकऱ्यांना देत असते. पण मुंडीकोटा ते खमारी अंतर येथून २० किमी आहे. ट्रॅक्टर भरुन नेणे व भाडा देणे आणि काटा होईपर्यंत थांबणे हे शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाहीत.

....

अधिक उत्पादन होवूनही नुकसान

शेतकऱ्यांची रब्बी धानाची चुरणी व मळणी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी ते धान आपल्या घर आणून ठेवले आहेत. व्यापारी कमी दरात धान खरेदी करुन शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे धान ठेवण्याकरीता जागा नाहीत,त्यांनी काय करावे,असा प्रश्न निर्माण झाला आहे. पिकेल तर विकेल पण काय? अधिक उत्पादन होऊन सुध्दा शेतकऱ्यांचे नुकसान सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.