शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

दिलेली जमीन परत करा

By admin | Updated: May 14, 2015 00:49 IST

तालुक्यातील भजीयापार येथील ४१ कुटुंबातील शेतकऱ्यांना नोकरीचे आमिष तसेच गौशाळा विकासाच्या भूलथापा देत ...

शेतकऱ्यांची मागणी : पत्रपरिषदेतून दिला आत्महत्येचा इशाराआमगाव : तालुक्यातील भजीयापार येथील ४१ कुटुंबातील शेतकऱ्यांना नोकरीचे आमिष तसेच गौशाळा विकासाच्या भूलथापा देत पाऊलदौना येथील ग्रामोस्थान संस्थेने शेतकऱ्यांकडून ६.३९ हे.आर. जमीन दान स्वरूपात मिळविली. परंतु सलग २९ वर्षापर्यंत कोणताच विकास किंवा केलेला करार पूर्ण न करता या जमिनीपासून खासगी उत्पन्न मिळविण्यासाठी गौण खनीज अवैधपणे काढले जात आहे. त्यामुळे दान स्वरूपात दिलेली जमीन परत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी लढा उभारला असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली. भजियापार येथील शेतकऱ्यांना गौविकास, गावविकास तसेच नोकरीचे आमिष देत ग्रामोस्थान संस्थेच्या संचालकांनी शेतकऱ्यांकडून जवळपास १६ एकर जमीन सन १९८६ मध्ये दान स्वरूपात मिळवून घेतली. परंतु या जमिनीचा कोणताच विकास संस्थेने केला नाही. तर सलग २९ वर्षांपर्यंत कागदावर उपयोग घेऊन शेतकऱ्यांना मिळत असलेल्या उत्पन्नावरही डल्ला मारला. शेतकऱ्यांकडून मिळविलेली जमीन हातातून जाऊ नये यासाठी संचालकांनी जमीन घेताना शेतकऱ्यांना विविध आमीष दिले. परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली नाही. त्यामुळे अल्प भूधारक शेतकऱ्यांना हातातून गेलेल्या जमीनीमुळे आर्थिक समस्यांना समोरे जावे लागत आहे. त्यामुळे कोणताच विकास न झालेली जमीन हक्काने परत मिळावी यासाठी संस्थेकडे सन २००८ मध्ये रितसर अर्ज केले. परंतु संस्था संचालकांनी शेतकऱ्यांची पिळवणूक सुरु ठेवली. यामुळे हलाखीचे जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांपुढे उत्पन्नाअभावी मरणासन्न परिस्थिती पुढे आली. शेतजमीन परत मिळविण्यासाठी त्यांनी संस्थेकडे वारंवार पाठपुरावा केला परंतु प्रतिसाद मिळत नसल्याने आता शासनाकडे धाव घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तर जमीन परत न मिळाल्यास ४१ शेतकरी कुटुंबीयांनी आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसल्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे. (शहर प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या जमिनी परत करू : शिवणकर ग्रामोस्थान संस्थेने शेतकऱ्यांच्या जमिनी दान स्वरूपात घेतल्या. परंतु या जमीनीवर कोणताच विकास झाला नाही. शेतकऱ्यांनी संस्थेकडे व धर्मदाय आयुक्त विभागाकडे रितसर अर्ज करावे त्यांच्या जमीनी परत करू असे मत ग्रामोस्थान संस्थेचे अध्यक्ष व माजी वित्तमंत्री प्रा. महादेवराव शिवणकर यांनी प्रतिनिधीजवळ व्यक्त केले.