शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

तंमुस अध्यक्षाचा निकाल सात महिन्यांपासून कुलूपबंद

By admin | Updated: July 17, 2016 00:20 IST

ग्राम पंचायत माल्ही येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीची निवड प्रक्रिया सात महिन्यापूर्वी मतदानाने घेण्यात आली.

कालीमाटी : ग्राम पंचायत माल्ही येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीची निवड प्रक्रिया सात महिन्यापूर्वी मतदानाने घेण्यात आली. परंतु सात महिने लोटूनही मतपेढीला कुलूप लावले आहे. या प्रकरणी प्रशासनाविरोधात गावकऱ्यांमध्ये रोष आहे. तहसील कार्यालय व पोलीस ठाणे आमगाव अंतर्गत ग्राम पंचायत माल्ही येथे अनेक महिन्यापासून महात्मा गांधी तंटामुक्त समितीची निवड प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे गावातील तंटे विकोपाला जात आहेत. तरी देखील तहसीलदार, पोलीस निरीक्षक व खंडविकास अधिकारी अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावात शांतता प्रस्थापित करून गावातील वाद गावातच मिटविले जावे यासाठी तऽटामुक्त गाव समित्या गावागावात तयार करण्यात आल्या. परंतु येथील प्रशासनाच्या उदासिनतेमुळे सदर योजना धुळीस मिळत आहे. ग्राम पंचायत माल्ही येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष व समिती नेमण्याकरीता १० सप्टेंबर २०१५ रोजी गुप्त मतदान घेण्यात आले. ५० गावात तेढ निर्माण झाल्याने सदर पेढी सात महिन्यापासून सीलबंद आहे. ती पेढी ग्राम पंचायत कार्यालय सुरक्षित असून तहसीलदार व पोलीस निरीक्षक गावात केव्हा येणार याची प्रतिक्षा गावकऱ्यांना आहे. गावात तंटामुक्त समिती नसल्याने गावात होणारे किरकोळ तंटे, जमिनीवरून होणारे वाद, दारूबंदी, व्यसनमुक्त सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम थंड बस्त्यात आहेत. यामुळे नागरिकांचे मानसिक, आर्थिक नुकसान होत आहे. माल्ही येथील छोटेमोठे वाद पोलिसात दाखल होत असून नागरिकांना न्यायालय प्रक्रियेचा भूर्दंड सहन करावा लागत आहे. माल्ही येथील नागरिकांनी अनेकदा तहसीलदार, पोलीस निरीक्षक, खंडविकास अधिकारी यांना निवेदन देवूनही अध्यक्ष व समिती निवड प्रकरण निकाली काढण्याची विनंती केली. गोंदिया जिल्हा महात्मा गांधी तंटामुक्त मोहीमेत राज्यात पहिला ठरला. पण माल्ही ग्रा.पं.याला अपवाद ठरत आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी दखल घेवून अध्यक्ष व समितीची निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)