शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

तंमुस अध्यक्षाचा निकाल सात महिन्यांपासून कुलूपबंद

By admin | Updated: July 17, 2016 00:20 IST

ग्राम पंचायत माल्ही येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीची निवड प्रक्रिया सात महिन्यापूर्वी मतदानाने घेण्यात आली.

कालीमाटी : ग्राम पंचायत माल्ही येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीची निवड प्रक्रिया सात महिन्यापूर्वी मतदानाने घेण्यात आली. परंतु सात महिने लोटूनही मतपेढीला कुलूप लावले आहे. या प्रकरणी प्रशासनाविरोधात गावकऱ्यांमध्ये रोष आहे. तहसील कार्यालय व पोलीस ठाणे आमगाव अंतर्गत ग्राम पंचायत माल्ही येथे अनेक महिन्यापासून महात्मा गांधी तंटामुक्त समितीची निवड प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे गावातील तंटे विकोपाला जात आहेत. तरी देखील तहसीलदार, पोलीस निरीक्षक व खंडविकास अधिकारी अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावात शांतता प्रस्थापित करून गावातील वाद गावातच मिटविले जावे यासाठी तऽटामुक्त गाव समित्या गावागावात तयार करण्यात आल्या. परंतु येथील प्रशासनाच्या उदासिनतेमुळे सदर योजना धुळीस मिळत आहे. ग्राम पंचायत माल्ही येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष व समिती नेमण्याकरीता १० सप्टेंबर २०१५ रोजी गुप्त मतदान घेण्यात आले. ५० गावात तेढ निर्माण झाल्याने सदर पेढी सात महिन्यापासून सीलबंद आहे. ती पेढी ग्राम पंचायत कार्यालय सुरक्षित असून तहसीलदार व पोलीस निरीक्षक गावात केव्हा येणार याची प्रतिक्षा गावकऱ्यांना आहे. गावात तंटामुक्त समिती नसल्याने गावात होणारे किरकोळ तंटे, जमिनीवरून होणारे वाद, दारूबंदी, व्यसनमुक्त सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम थंड बस्त्यात आहेत. यामुळे नागरिकांचे मानसिक, आर्थिक नुकसान होत आहे. माल्ही येथील छोटेमोठे वाद पोलिसात दाखल होत असून नागरिकांना न्यायालय प्रक्रियेचा भूर्दंड सहन करावा लागत आहे. माल्ही येथील नागरिकांनी अनेकदा तहसीलदार, पोलीस निरीक्षक, खंडविकास अधिकारी यांना निवेदन देवूनही अध्यक्ष व समिती निवड प्रकरण निकाली काढण्याची विनंती केली. गोंदिया जिल्हा महात्मा गांधी तंटामुक्त मोहीमेत राज्यात पहिला ठरला. पण माल्ही ग्रा.पं.याला अपवाद ठरत आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी दखल घेवून अध्यक्ष व समितीची निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)