शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंध शिथिल झाले, कोरोना नव्हे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 05:00 IST

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ब्रेक द चेन अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून (दि.१) काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले. दीड महिन्यापासून सर्व उद्योगधंदे, दुकाने बंद असल्याने व्यावसायिकांची आर्थिक कोंडी झाली होती. अनेकांचा रोजगार गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे अर्थव्यवस्थेची गाडी सुध्दा रुळावरुन घसरली होती.

ठळक मुद्देपहिल्याच दिवशी गर्दी : नियमांचे पालन करण्याचा विसर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले. मात्र याचा अनेकांनी चुकीचा अर्थ लावत शहरातील बाजारपेठ आणि दुकानांमध्ये गर्दी केली होती. जणू कोरोना पूर्णपणे निघून गेल्याच्या आविर्भावात नागरिक वावरत होते. मात्र कोरोनाचा धोका अद्यापही टळला नसून पूर्वी इतकीच काळजी घेण्याची गरज आहे. केवळ निर्बंध शिथिल झाले कोरोना नव्हे हे सांगण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ब्रेक द चेन अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून (दि.१) काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले. दीड महिन्यापासून सर्व उद्योगधंदे, दुकाने बंद असल्याने व्यावसायिकांची आर्थिक कोंडी झाली होती. अनेकांचा रोजगार गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे अर्थव्यवस्थेची गाडी सुध्दा रुळावरुन घसरली होती. याला गती देण्यासाठी कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्केपेक्षा कमी आहे त्या जिल्ह्यात निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहे. यातंर्गत मंगळवारपासून अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत तर इतर दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी दिली होती. तब्बल दीड महिन्यानंतर सर्वच दुकाने उघडल्याने शहरवासीयांनी सकाळी बाजारपेठ आणि दुकानांमध्ये गर्दी केली होती. त्यामुळे जिल्ह्यातून कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे संपल्याचे चित्र आहे. बाजारपेठेत आणि दुकानांमध्ये वावरताना नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा सुध्दा विसर पडल्याचे चित्र होते. इतर दुकाने राहणार आता दुपारी २ पर्यंत सुरुजिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी मंगळवारी सुधारित आदेश काढीत अत्यावश्यक सेवे शिवाय इतर दुकाने सुध्दा बुधवारपासून (दि.२) दुपारी २ वाजतापर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे व्यावसायींकाना मोठा दिलासा मिळाला आहे. दुकानांच्या वेळेत वाढ करण्यात आली असली तरी दुकानदार आणि ग्राहकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. अन्यथा कारवाईला पुढे जावे लागले.  

नागरिकांनो नियमांचे करा पालन  कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. मागील दीड महिना जशी आपण स्वत:ची आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तशीच काळजी यापुढे सुध्दा घ्या, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करा, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा, सॅनिटायझरचा नियमित वापर करा, बाजारपेठेत गर्दी करु नका. अन्यथा आपले थोडेही दुर्लक्ष कोरोना संसर्गाला पुन्हा आमंत्रण देऊ शकते. 

 व्यावसायिकांमध्ये थोडी खुशी थोडा गमजिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने केवळ सकाळी ११ वाजतापर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली होती. तब्बल दीड महिन्यानंतर दुकाने सुरु झाल्याने व्यावसायिकांमध्ये थोडी खुशी होती तर केवळ चार तासच दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिल्याने थोडे नाराजीचे वातावरण होते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या