शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाईट गोष्टींना लगाम स्वत:पासूनच घाला

By admin | Updated: August 12, 2015 02:16 IST

तरुणांमध्ये सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. पाहिजे तसा तरुणाचा ज्ञानार्जनाकडे कल नाही. उच्चपणाचा

लोकमत परिचर्चा : युवा वर्गाने दाखविले जागरूक आणि सामाजिक भानगोंदिया : तरुणांमध्ये सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. पाहिजे तसा तरुणाचा ज्ञानार्जनाकडे कल नाही. उच्चपणाचा आव दाखवून समाजात वावरणाऱ्या तरुणांची नैतिकता ढासळत आहे. याचे कारण आजच्या काळात तरुणांमध्ये संस्कारक्षम अशी वातावरण निर्मिती नाही. आई-वडिलांकडून मुलांना ध्येयपुर्तीचे धडे दिले जात नसल्यामुळे तरुण भरकटला आहे. जगाकडे पाहताना प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. पण युवा वर्गाने भरकटून जाणे योग्य नाही. स्वत:वर लगाम घालण्याची आणि चांगल्या कामाची सुरूवात स्वत:पासून केल्यास चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकते, असा सूर युवक-युवतींनी लावला.लोकमत कार्यालयात मंगळवारी आयोजित परिचर्चेत हे महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षणासोबतच स्पर्धा परिक्षेत कसा टिकाव धरता येईल यासाठी सुरुवातीपासूनच शाळेत शिकवले गेले पाहिजे. आधी शाळांमध्ये देशभक्तीचे धडे दिले जात होते. परंतू आता देशभक्ती सोडा इतिहासही आपण विसरत चालल्याची खंत तरुणांनी व शिक्षकांनी व्यक्त केली. सुरुवातीपासून विद्यार्थी वर्गाला संस्कारमय व देशभक्तीची भावना जागृत करणारे शिक्षण दिले गेले पाहिजे. तरुणांनी शिक्षणाप्रती प्रामाणिकता दाखवून चांगल्या गुणांनी पुढे आले तरी त्यांना येथील व्यवस्थेपुढे हतबल व्हावे लागते. प्रत्येकाला नोकरी मिळणे शक्य नाही. त्यामुळे स्वत: आपल्यात व्यवसाईक अभ्यासक्रमाकडे वळले पाहिजे. आई-वडिलांनी आपल्या पालकांवर आपल्या ईच्छा लादू नये. त्यांना त्यांच्या ईच्छेप्रमाणे त्या-त्या क्षेत्रात जाऊ द्यावे. शिक्षणाची बाजारीकरण झाले असून शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये ही व भाषेमध्येही दुजाभाव केल्या जातो. नोकरी व पैशांमुळे गुणवत्तेची कदर राहिली नाही. शिक्षण महत्वाचे साधन असले तरी आज शिक्षणाला पैशापुढे नतमस्तक व्हावे लागते. शिक्षणामुळे विवेकवादी व्यक्ती घडतो. या व्यवस्थेने गुणवत्तेला स्तब्ध केले. समाजात वावरताना अनेक तरुणांना समस्यांची जाणीव आहे. परंतु कळते पण वळत नाही या म्हणीप्रमाणे तरुणांनी समाजातील समस्यांकडे लक्षपुर्व दुर्लक्ष केले. समाज सेवेचे किंवा देशसेवेचे व्रत अंगीकारावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु आई-वडिलांना वाटतो भगतसिंगाने जन्म घ्यावा, परंतु तो माझ्या घरी नाही शेजारच्या घरी व्हावा या वृत्तीमुळे आज देशभक्ती तरुणांमधून कमी होत असल्याचे ते म्हणाले.तरुणांना सामाजिक नेतृत्व नसल्यामुळे आज तरुण वर्ग भरकटला जात असून देशाची मोठी हाणी होत आहे. आजचा तरुण व्यवसानांना फॅशन करुन बसला आहे. आपण व्यसन केले तर आपली मोजणी उच्चभ्रू लोकांमध्ये होते असा गैरसमज आज नवतरुणांना होत आहे. जो सिगारेट ओढत नाही, दारु पीत नाही अशा तरुणांना ‘ओल्ड फॅशन’चा तरुण म्हणून त्याची टिंगल उडवली जाते. परंतु जिवनाचे सार्थक करण्यासाठी व्यसनांना दूर ठेवणारा तरुण देशाचे उज्वल भविष्य घडवू शकतो. हे आज तरुण विसरला आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा बचाव करण्यासाठी वृक्ष संवर्धनाकडे तरुणांनी लक्ष घालून समाज सेवेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कौटुंबिक वातावरणामुळे व मित्रांच्या सहवासामुळे तरुण व्यसनाकडे वळतो. त्यामुळे आई वडिलांनी मुलांच्या सहवासाकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. आज स्मार्ट फोन प्रत्येकाच्या हातात आहे. परंतु बोटावर मोजण्याइतके या फोनचा उपयोग चांगल्या कामासाठी करतात. परंतु या स्मार्ट फोनचा वापर वाईट कामासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. वॉट्स अ‍ॅप वर ग्रुपमध्ये चॅटिंग करताना त्या ग्रुपमध्ये त्या तरुणांच्या आई-वडिलांनाही जोडले तर या ग्रुपवर चुकीचे संदेश टाकले जाणार नाही. व तरुणांना दिशाहिन करण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. या परिचर्चेत नमाद महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.बबन मेश्राम, गोंदिया पब्लिक स्कूलच्या शिक्षिका वर्षा भांडारकर, नुतन खोब्रागडे, निखिल बोरकर, करुणा कडव, भारत टेंभुर्णेकर, वैभव शहारे, शाम नागज्योती, गुणेश्वर बिजेवार, भुपेंद्र गजभिये, अक्षय चव्हाण, प्रतिक सोनवाने आदी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)