शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

वाईट गोष्टींना लगाम स्वत:पासूनच घाला

By admin | Updated: August 12, 2015 02:16 IST

तरुणांमध्ये सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. पाहिजे तसा तरुणाचा ज्ञानार्जनाकडे कल नाही. उच्चपणाचा

लोकमत परिचर्चा : युवा वर्गाने दाखविले जागरूक आणि सामाजिक भानगोंदिया : तरुणांमध्ये सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. पाहिजे तसा तरुणाचा ज्ञानार्जनाकडे कल नाही. उच्चपणाचा आव दाखवून समाजात वावरणाऱ्या तरुणांची नैतिकता ढासळत आहे. याचे कारण आजच्या काळात तरुणांमध्ये संस्कारक्षम अशी वातावरण निर्मिती नाही. आई-वडिलांकडून मुलांना ध्येयपुर्तीचे धडे दिले जात नसल्यामुळे तरुण भरकटला आहे. जगाकडे पाहताना प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. पण युवा वर्गाने भरकटून जाणे योग्य नाही. स्वत:वर लगाम घालण्याची आणि चांगल्या कामाची सुरूवात स्वत:पासून केल्यास चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकते, असा सूर युवक-युवतींनी लावला.लोकमत कार्यालयात मंगळवारी आयोजित परिचर्चेत हे महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षणासोबतच स्पर्धा परिक्षेत कसा टिकाव धरता येईल यासाठी सुरुवातीपासूनच शाळेत शिकवले गेले पाहिजे. आधी शाळांमध्ये देशभक्तीचे धडे दिले जात होते. परंतू आता देशभक्ती सोडा इतिहासही आपण विसरत चालल्याची खंत तरुणांनी व शिक्षकांनी व्यक्त केली. सुरुवातीपासून विद्यार्थी वर्गाला संस्कारमय व देशभक्तीची भावना जागृत करणारे शिक्षण दिले गेले पाहिजे. तरुणांनी शिक्षणाप्रती प्रामाणिकता दाखवून चांगल्या गुणांनी पुढे आले तरी त्यांना येथील व्यवस्थेपुढे हतबल व्हावे लागते. प्रत्येकाला नोकरी मिळणे शक्य नाही. त्यामुळे स्वत: आपल्यात व्यवसाईक अभ्यासक्रमाकडे वळले पाहिजे. आई-वडिलांनी आपल्या पालकांवर आपल्या ईच्छा लादू नये. त्यांना त्यांच्या ईच्छेप्रमाणे त्या-त्या क्षेत्रात जाऊ द्यावे. शिक्षणाची बाजारीकरण झाले असून शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये ही व भाषेमध्येही दुजाभाव केल्या जातो. नोकरी व पैशांमुळे गुणवत्तेची कदर राहिली नाही. शिक्षण महत्वाचे साधन असले तरी आज शिक्षणाला पैशापुढे नतमस्तक व्हावे लागते. शिक्षणामुळे विवेकवादी व्यक्ती घडतो. या व्यवस्थेने गुणवत्तेला स्तब्ध केले. समाजात वावरताना अनेक तरुणांना समस्यांची जाणीव आहे. परंतु कळते पण वळत नाही या म्हणीप्रमाणे तरुणांनी समाजातील समस्यांकडे लक्षपुर्व दुर्लक्ष केले. समाज सेवेचे किंवा देशसेवेचे व्रत अंगीकारावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु आई-वडिलांना वाटतो भगतसिंगाने जन्म घ्यावा, परंतु तो माझ्या घरी नाही शेजारच्या घरी व्हावा या वृत्तीमुळे आज देशभक्ती तरुणांमधून कमी होत असल्याचे ते म्हणाले.तरुणांना सामाजिक नेतृत्व नसल्यामुळे आज तरुण वर्ग भरकटला जात असून देशाची मोठी हाणी होत आहे. आजचा तरुण व्यवसानांना फॅशन करुन बसला आहे. आपण व्यसन केले तर आपली मोजणी उच्चभ्रू लोकांमध्ये होते असा गैरसमज आज नवतरुणांना होत आहे. जो सिगारेट ओढत नाही, दारु पीत नाही अशा तरुणांना ‘ओल्ड फॅशन’चा तरुण म्हणून त्याची टिंगल उडवली जाते. परंतु जिवनाचे सार्थक करण्यासाठी व्यसनांना दूर ठेवणारा तरुण देशाचे उज्वल भविष्य घडवू शकतो. हे आज तरुण विसरला आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा बचाव करण्यासाठी वृक्ष संवर्धनाकडे तरुणांनी लक्ष घालून समाज सेवेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कौटुंबिक वातावरणामुळे व मित्रांच्या सहवासामुळे तरुण व्यसनाकडे वळतो. त्यामुळे आई वडिलांनी मुलांच्या सहवासाकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. आज स्मार्ट फोन प्रत्येकाच्या हातात आहे. परंतु बोटावर मोजण्याइतके या फोनचा उपयोग चांगल्या कामासाठी करतात. परंतु या स्मार्ट फोनचा वापर वाईट कामासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. वॉट्स अ‍ॅप वर ग्रुपमध्ये चॅटिंग करताना त्या ग्रुपमध्ये त्या तरुणांच्या आई-वडिलांनाही जोडले तर या ग्रुपवर चुकीचे संदेश टाकले जाणार नाही. व तरुणांना दिशाहिन करण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. या परिचर्चेत नमाद महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.बबन मेश्राम, गोंदिया पब्लिक स्कूलच्या शिक्षिका वर्षा भांडारकर, नुतन खोब्रागडे, निखिल बोरकर, करुणा कडव, भारत टेंभुर्णेकर, वैभव शहारे, शाम नागज्योती, गुणेश्वर बिजेवार, भुपेंद्र गजभिये, अक्षय चव्हाण, प्रतिक सोनवाने आदी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)