शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

गावातील विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:35 IST

साखरीटोला : मागील बऱ्याच दिवसांपासून गावातील पथदिवे बंद असल्याने गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गावकरी त्रस्त असून ...

साखरीटोला : मागील बऱ्याच दिवसांपासून गावातील पथदिवे बंद असल्याने गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गावकरी त्रस्त असून वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली जात आहे. त्यावर सोमवारी (दि.६) जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जियालाल पंधरे यांच्या नेतृत्वात विविध गावातील सरपंच-उपसरपंच व गावकऱ्यांनी येथील शाखा अभियंता बिसेन यांची भेट घेऊन वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली.

आमगाव विधानसभा क्षेत्रांतर्गत देवरी, आमगाव व सालेकसा या तिन्ही तालुक्यांतील बऱ्याच गावांना साखरीटोला येथील वीज केंद्रातून वीजपुरवठा केला जातो. साखरीटोला, तिरखेडी यासारख्या तीन फिडर अंतर्गत असलेल्या कारुटोला, अंजोरा, येरमडा, सोनेखारी, कवडी, वळद, पानगाव, साखरीटोला, गांधीटोला, कोपीटोला, तिगाव व इतर काही गावांतील पथदिवे बंद आहे. कोरोनाकाळात ग्रामपंचायतींचे वीज बिल लाखो रुपयांवर गेल्याने बिल भरण्यात अडचणी आली तसेच पूर्वी पथदिव्यांचे बिल जिल्हा परिषद भरत होती. मात्र, सध्या तरी सदर बिल भरण्यात न आल्याने वीज मंडळाने पथदिव्यांची जोडणी कापली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.

पथदिवे बंद राहत असल्याने रात्रीला गावात अंधार राहत असून पावसाळ्यामुळे साप, विंचू व किड्यांची भीती निर्माण झाली आहे. अशात अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनासुद्धा सरपंच संघटनेकडून विनंती करण्यात आली आहे. अन्य विधानसभा क्षेत्रातील पथदिवे सुरू झाल्याची माहिती आहे. आमगाव विधानसभा क्षेत्राचे का नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तिन्ही फिडरमध्ये असलेल्या गावातील स्टेट लाईट सुरू करावी, अशी मागणी कारूटोलाचे सरपंच उमराज बोहरे, साखरीटोलाचे सरपंच नरेश कावरे, पानगाव सरपंच मालदेव दोनोडे, सरपंच योगेश्वरी तुरकर, सरपंच कमलेश्वरी भेलावे, नरेंद्र शिवणकर, उपसरपंच अरविंद फुंडे, बबलू बिसेन, अनिल परसमोडे, ललीत ठाकुर, लखन भलावी, दुर्गेश पटले, संतोष फुंडे, कुमार तुरकर, राजेश किरसान यांनी केली आहे.

------------------------------

ग्रामपंचायतींवर लाखो रुपये वीज बिल थकून आहे. वीज बिल पूर्वीपासून शासन भरत होते तसेच आतासुद्धा शासनाने भरायला पाहिजे व गावकऱ्यांना अंधारातून उजेडात आणायला पाहिजे.

जियालाल पंधरे, माजी जि. प. सदस्य