शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

शिकण्याचा आमचा हक्क परत मिळवून द्या; विद्यार्थ्यांची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 14:33 IST

Gondia News मागील मार्च महिन्यापासून कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात वर्ग ९ ते १२ वीपर्यंतच्या काही २८ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. मात्र, ज्या शाळा बंद आहेत, तेथील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना लागली आता शाळेची ओढ

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया: मागील मार्च महिन्यापासून कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात वर्ग ९ ते १२ वीपर्यंतच्या काही २८ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. मात्र, ज्या शाळा बंद आहेत, तेथील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होत आहे. अशा विद्यार्थ्यांनी काय करावे, असा प्रश्न पालकांसह विद्यार्थ्यांनाही पडला आहे. आता वर्ष होत असल्याने विद्यार्थीही वैतागले असून, त्यांना शाळेची ओढ लागली आहे. करिता शाळा सुरू करून शिकण्याचा आमचा हक्क आम्हाला परत मिळवून द्या, अशी मागणी ते करीत आहेत.

राज्यात शासनाने २८ नोव्हेंबरपासून वर्ग ९ ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे, पण यामध्ये खासगी शाळा काही प्रमाणात सुरू झाल्या. मात्र, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा व निवासी शाळांना अजूनही मुहूर्त निघालाच नाही. कोरोना काळात अनेक शाळांनी ऑनलाइन क्लास चालविले आणि काहींचे सुरू आहेत. अशा शिकवणी प्रकाराने विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीवर थोडाही परिणाम झालेला नाही. १० टक्केही विद्यार्थ्यांच्या अभ्यास झालेला नाही. अलीकडे कोरोना प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येतो. यावर लस तयार होऊन लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आता सर्वच कामकाज पूर्ववत सुरू झाले असून, शाळाच का अर्धवट सुरू झाल्या, असा प्रश्न पालकांना पडला आहे.

 

------------------------

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र