शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शिकण्याचा आमचा हक्क परत मिळवून द्या; विद्यार्थ्यांची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 14:33 IST

Gondia News मागील मार्च महिन्यापासून कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात वर्ग ९ ते १२ वीपर्यंतच्या काही २८ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. मात्र, ज्या शाळा बंद आहेत, तेथील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना लागली आता शाळेची ओढ

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया: मागील मार्च महिन्यापासून कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात वर्ग ९ ते १२ वीपर्यंतच्या काही २८ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. मात्र, ज्या शाळा बंद आहेत, तेथील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होत आहे. अशा विद्यार्थ्यांनी काय करावे, असा प्रश्न पालकांसह विद्यार्थ्यांनाही पडला आहे. आता वर्ष होत असल्याने विद्यार्थीही वैतागले असून, त्यांना शाळेची ओढ लागली आहे. करिता शाळा सुरू करून शिकण्याचा आमचा हक्क आम्हाला परत मिळवून द्या, अशी मागणी ते करीत आहेत.

राज्यात शासनाने २८ नोव्हेंबरपासून वर्ग ९ ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे, पण यामध्ये खासगी शाळा काही प्रमाणात सुरू झाल्या. मात्र, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा व निवासी शाळांना अजूनही मुहूर्त निघालाच नाही. कोरोना काळात अनेक शाळांनी ऑनलाइन क्लास चालविले आणि काहींचे सुरू आहेत. अशा शिकवणी प्रकाराने विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीवर थोडाही परिणाम झालेला नाही. १० टक्केही विद्यार्थ्यांच्या अभ्यास झालेला नाही. अलीकडे कोरोना प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येतो. यावर लस तयार होऊन लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आता सर्वच कामकाज पूर्ववत सुरू झाले असून, शाळाच का अर्धवट सुरू झाल्या, असा प्रश्न पालकांना पडला आहे.

 

------------------------

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र