शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
4
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
5
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
6
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
7
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
8
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
10
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
11
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
12
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
13
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
14
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
15
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
16
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
17
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
18
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
20
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?

येरंडी-देव मामा तलावातील शेतजमिनीचे अतिक्रमण हटवा

By admin | Updated: March 6, 2015 01:44 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील येरंडी-देव येथील माजी मालगुजार तलावातील शेतजमिनीचे अतिक्रमण विनाविलंब हटविण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ तथा वनअधिकार समिती...

बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील येरंडी-देव येथील माजी मालगुजार तलावातील शेतजमिनीचे अतिक्रमण विनाविलंब हटविण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ तथा वनअधिकार समिती येरंडीच्या वतीने सबंधितांना करण्यात आली आहे. मामा तलावामध्ये शेतजमीन काढून अतिक्रमण करणाऱ्या दहा शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढण्यात यावे, असा ठराव ग्रामसभेत बहुमताने नोव्हेंबर २०१४ मध्ये पारित करण्यात आला. परंतु ठरावाची अंमलबजावणी न होता, त्या ठरावाला केराची टोपली दाखविण्यातच सबंधितांनी धन्यता मानली. त्वरित अतिक्रमण हटविण्यात आले नाही तर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गावातील शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे. येरंडी-देव येथील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गावामध्ये १९६२ ते ६५ च्या दरम्यान मामा तलावाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी तलावाची आराजी ३२ ते ३३ एकर होती. सदर तलावावर वेळोवेळी शासनाच्या वतीने माती काम करण्यात आले. पर्यायाने तलावाच्या पाळीची लांबी व रूंदी वाढत गेल्याने तलावातील आतील भाग विस्तीर्ण झाले. गावातील दहा लोकांनी तलावाच्या पोटामध्ये शेतजमीन काढून अतिक्रमण केले. गावातील मोजक्या लोकांनी काढलेल्या अतिक्रमण शेतजमिनीमुळे तलाव पाण्याने तुडूंब भरले. यानंतर अतिक्रमण धारकांच्या पिकांमध्ये पाणी शिरून धानाचे नुकसान होत असल्याचे दिसताच अतिक्रमणधारक शेतकरी स्वत:च्या मर्जीने वेळी-अवेळी तलावाचे गेट उघडून पाणी सोडतात. त्यामुळे मालकी हक्काच्या शेतकऱ्यांना पाण्याअभावी धान उत्पादनापासून वंचित रहावे लागते. तलावामध्ये अतिक्रमण करून शेतजमीन काढणाऱ्यांचे विनाविलंब अतिक्रमण काढण्यात यावे. यासाठी ग्रामस्थांच्या वतीने संबंधित अधिकारी तसेच येरंडी-विहीरगाव गट ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले. ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल घेऊन ग्रामपंचायतच्या वतीने १९ नोव्हेंबर २०१४ रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. येरंडी (देवी) येथील सार्वजनिक चौकातील हनुमान मंदिर परिसरात झालेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी हेमंत बारसे होते. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तलावातील अतिक्रमण काढण्यात यावा या एकमेव मुद्यावर चर्चा करण्यात आली. विषयाच्या अनुषंगाने एकमत न झाल्याने मतदानाने निर्णय घेण्यात आला.अंमलबजावणी न झाल्यामुळे मालकी हक्काच्या जमीन धारकांत पाणी कुठे तरी मुरत आहे, असा सशंय निर्माण होत आहे. संबंधितांनी ठरावाची अंमलबजावणी केली नसल्याने त्या ग्रामसभेच्या ठरावाला अधिकारी वर्गाकडून केराची टोपली मिळाली असावी, असा सूर ग्रामस्थांमध्ये आहे. मामा तलावातील अतिक्रमण करून शेतजमीन करणाऱ्यांचे अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे अन्यथा ग्रामस्थ तसेच वन अधिकार समिती येरंडी-देवच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर)