शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

८४७ शेतकऱ्यांना दिलासा

By admin | Updated: May 25, 2016 01:58 IST

गेल्यावर्षी दुष्काळाची झळ सोसलेल्या १०९ गावांतील शेतकऱ्यांना शासनाच्या पीक कर्ज पुनर्गठन योजनेमुळे दिलासा मिळाला आहे.

कर्जाचे पुनर्गठन : २.८५ कोटींचे कृषीकर्ज भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढकपिल केकत गोंदियागेल्यावर्षी दुष्काळाची झळ सोसलेल्या १०९ गावांतील शेतकऱ्यांना शासनाच्या पीक कर्ज पुनर्गठन योजनेमुळे दिलासा मिळाला आहे. यात जिल्हा मध्यवर्ती बँकेंतर्गत जिल्ह्यातील ८४७ शेतकरी पात्र ठरले असून त्यांच्या दोन कोटी ८५ लाख ६५ हजार रूपयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. शासनाचा हा निर्णय त्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला असून त्यांना खरिपाचे नियोजन करण्यास मदत होणा आहे. मात्र या योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असून त्यांना जुने कर्जच फेडता न आल्याने नवीन कर्ज कसे मिळवायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.‘पोट दिले आहे, तर पोळीही तोच देणार’ ही म्हण आहे. त्यानुसार सर्वांना दोन वेळच्या भाकरीची व्यवस्था होते. मात्र रक्ताचे पाणी करून अवघ्या जगाचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्यावरच उपाशी मरण्याची पाळी आली आहे. दुष्काळ व नापिकीच्या झळांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे होते. उशिरा का होईना, राज्य सरकारने १०९ गावे दुष्काळी गावे म्हणून जाहीर केली. वास्तविक बिकट परिस्थिती असणारी त्यापेक्षाही जास्त गावे जिल्ह्यात आहेत. पण शासन दरबारी नोंद झालेल्या त्या १०९ गावांमधील शेतकऱ्यांनाच दुष्काळी परिस्थितीचा फायदा घेता येणार आहे.दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याने खचून गेलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दारी पोहोचण्यापूर्वी शासनाने शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची पुनर्गठन करून कर्जवसुलीच्या तगाद्यातून त्यांची सुटका केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली असून कर्जावरील व्याज दरातही सवलत दिली जाणार आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या मागे कर्ज परतफेडीसाठी तगादा लावला जाणार नाही. या पुनर्गठन योजनेंतर्गत जिल्ह्यातील १०९ गावांतील ८४७ शेतकरी पुनर्गठनासाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांचे दोन कोटी ८५ लाख ६५ हजार रूपयांचे पिक कर्ज पुनर्गठीत करण्यात आले आहे. आता खरिप हंगामाला सुरूवात झाली आहे. अगोदरचे कर्ज अंगावर असताना शेतकऱ्यांना खरिपाची तयारी करणे अवघड होते. मात्र पुनर्गठनाने त्यांच्यावरील कर्जाचे ओझे काही प्रमाणात कमी करण्यात दिलासा मिळाला आहे. दुष्काळी भागात सात कोटींची परतफेड५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १०९ गावातील दोन हजार ९९० शेतकऱ्यांना खरिप हंगाम २०१५ अंतर्गत नऊ कोटी ८९ लाख ३७ हजार रूपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले होते. त्यातील दोन हजार १४३ शेतकऱ्यांनी सात कोटी ३ लाख ७२ हजार रूपयांचा भरणा केला. परिणामी उरलेले ८४७ शेतकरी पुनर्गठनासाठी पात्र ठरले. बँकांच्या तगाद्यातून सुटकाकर्जधारक शेतकऱ्यांना त्यांच्याकडील कर्जाची परतफेड करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत असते. त्यानंतर उरलेल्या कर्जावर व्याजदर वाढविण्यात येतो. मात्र पिक कर्ज पुनर्गठन योजनेंतर्गत दुष्काळग्रस्त भागातील पात्र शेतकऱ्यांना दिलासा देत कर्ज परतफेड करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या उर्वरीत कर्ज रकमेवर व्याज लावण्यात येणार नाही. शिवाय कर्जवसुलीसाठी बँकांकडून तगादा लावला जाणार नाही.