शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

इटियाडोह प्रकल्पातून पाणी सोडावे

By admin | Updated: July 10, 2017 00:45 IST

एक-दोन दिवस बरसलेल्या पावसाने आता दडी मारल्याने भातलावणी लांबली असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

शेतकऱ्यांची मागणी : भातलावणी लांबली लोकमत न्यूज नेटवर्कइटखेडा : एक-दोन दिवस बरसलेल्या पावसाने आता दडी मारल्याने भातलावणी लांबली असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. पाऊस लांबल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम पडणार असल्याने भातलावणीसाठी इटियाडोह प्रकल्पातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत. हमखास पाऊस देणारी रोहीणी, मृग व आर्द्रा नक्षत्रे कोरडी गेलीत. मधल्या काळात एक-दोन दिवस पावसाच्या सरी कोसळल्या. वातावरणात गारवा निर्माण झाला. शेतकरीबांधवानी मोठ्या लगबगीने बियाणांची जुळवाजुळव करीत धानाची नर्सरी टाकली. बियाणे रुजले व उगवले व आता लावणीच्या योग्यतेचे झाले तथापी हवामान खात्याच्या पर्जन्यविषयक अंदाजाला पार ठेंगा दाखवत पावसाने दडी मारली. वातावरणात मोठा उष्मा सुरु झाला. शेतकऱ्याच्या नजरा आशाळभूतपणे आकाशाकडे वळल्या आहेत पण पावसाचा पत्ताच नाही. गेलेला पाऊस येईलही पण गेलेला हंगाम येत नाही, असे जुन्या जाणत्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर धानाची नर्सरी रोवण्यायोग्य झाली असतांना शेतशिवारात पाणी नसल्याने भातलावणीचे काम लांबणीवर पडल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत इटियाडोह सिंचन व्यवस्थापनाने त्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा हंगाम मागे पडू नये यासाठी इटियाडोह प्रकल्पातून रोवण्यासाठी पाणी सोडावे अशी मागणी आहे. आजच्या स्थितीत ज्यांना पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी विहीरी, तलाव व बोड्यातून पंपाद्वारे पाण्याचा उपसा करुन भातलावणीचे काम सुरु केले आहे. परंतु याचे प्रमाण अत्यल्प आहे. सर्वच शेतकऱ्यांच्या भात लावणीचे काम सुरु होण्याच्या दृष्टीने इटियाडोह सिंचन व्यवस्थापनाने कालव्याद्वारे पाणी सोडावे अशी मागणी करीत पाणी वापर संस्थांनी यासाठी पाठपुरावा करावा असे शेतकरी बांधव बोलत आहेत. पाण्याअभावी भातलागवडीचे काम करणारा मंजूर वर्ग हाताला काम नसल्याने रिकामा आहे. त्यांनाही रोजगार उपलब्ध होईल ही बाब सिंचन व्यवस्थापनाने लक्षात घ्यावी.