शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
3
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
4
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
5
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
6
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
7
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
8
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
9
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
10
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
11
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
12
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
13
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
14
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
15
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
16
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
17
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
18
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
19
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ

इटियाडोह प्रकल्पातून पाणी सोडावे

By admin | Updated: July 10, 2017 00:45 IST

एक-दोन दिवस बरसलेल्या पावसाने आता दडी मारल्याने भातलावणी लांबली असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

शेतकऱ्यांची मागणी : भातलावणी लांबली लोकमत न्यूज नेटवर्कइटखेडा : एक-दोन दिवस बरसलेल्या पावसाने आता दडी मारल्याने भातलावणी लांबली असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. पाऊस लांबल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम पडणार असल्याने भातलावणीसाठी इटियाडोह प्रकल्पातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत. हमखास पाऊस देणारी रोहीणी, मृग व आर्द्रा नक्षत्रे कोरडी गेलीत. मधल्या काळात एक-दोन दिवस पावसाच्या सरी कोसळल्या. वातावरणात गारवा निर्माण झाला. शेतकरीबांधवानी मोठ्या लगबगीने बियाणांची जुळवाजुळव करीत धानाची नर्सरी टाकली. बियाणे रुजले व उगवले व आता लावणीच्या योग्यतेचे झाले तथापी हवामान खात्याच्या पर्जन्यविषयक अंदाजाला पार ठेंगा दाखवत पावसाने दडी मारली. वातावरणात मोठा उष्मा सुरु झाला. शेतकऱ्याच्या नजरा आशाळभूतपणे आकाशाकडे वळल्या आहेत पण पावसाचा पत्ताच नाही. गेलेला पाऊस येईलही पण गेलेला हंगाम येत नाही, असे जुन्या जाणत्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर धानाची नर्सरी रोवण्यायोग्य झाली असतांना शेतशिवारात पाणी नसल्याने भातलावणीचे काम लांबणीवर पडल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत इटियाडोह सिंचन व्यवस्थापनाने त्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा हंगाम मागे पडू नये यासाठी इटियाडोह प्रकल्पातून रोवण्यासाठी पाणी सोडावे अशी मागणी आहे. आजच्या स्थितीत ज्यांना पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी विहीरी, तलाव व बोड्यातून पंपाद्वारे पाण्याचा उपसा करुन भातलावणीचे काम सुरु केले आहे. परंतु याचे प्रमाण अत्यल्प आहे. सर्वच शेतकऱ्यांच्या भात लावणीचे काम सुरु होण्याच्या दृष्टीने इटियाडोह सिंचन व्यवस्थापनाने कालव्याद्वारे पाणी सोडावे अशी मागणी करीत पाणी वापर संस्थांनी यासाठी पाठपुरावा करावा असे शेतकरी बांधव बोलत आहेत. पाण्याअभावी भातलागवडीचे काम करणारा मंजूर वर्ग हाताला काम नसल्याने रिकामा आहे. त्यांनाही रोजगार उपलब्ध होईल ही बाब सिंचन व्यवस्थापनाने लक्षात घ्यावी.