शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

रिमझिम पावसात गणरायाचे आगमन

By admin | Updated: September 18, 2015 01:31 IST

गुरूवारी सकाळपासूनच बरसत असलेल्या रिमझिम पावसातही जिल्ह्यात गणरायाचे मोठ्या जल्लोषात आगमन होऊन १० दिवसांकरिता प्रतिष्ठापणा करण्यात आली.

उत्साह कायम : ९९० सार्वजनिक मंडळांची श्रीची स्थापनागोंदिया : गुरूवारी सकाळपासूनच बरसत असलेल्या रिमझिम पावसातही जिल्ह्यात गणरायाचे मोठ्या जल्लोषात आगमन होऊन १० दिवसांकरिता प्रतिष्ठापणा करण्यात आली. भर पावसातही गणरायांना वाजतगाजत आणण्यासाठी तरूणाई उत्साहित दिसून आली. ढोल-ताश्यांच्या तालावर सार्वजनिक मंडळांनी गणरायाला मंडपापर्यंत आणून विराजमान केले. दोन दिवसांपासून बरसत असलेल्या पावसामुळे उत्सवावर थोडाफार परिणाम जाणवणार असला तरी पावसाची नितांत गरज असल्याने आनंदाचे वातावरण बघावयास मिळत आहे.राज्याचे आद्यदैवत गणरायांचा १० दिवसांचा उत्सव गोंदिया शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या थाटा-माटात साजरा केला जातो. सुमारे ९९० सार्वजनिक तर चार हजारांवर खाजगी गणेशमूर्तींची स्थापना यावेळी केली जात आहे. गणरायाच्या या उत्सवासाठी मागील महिनाभरापासून तयारी सुरू होती. गणेश मंडळांकडून मूर्ती व मंडप उभारण्यासाठी धावपळ सुरू होती. याशिवाय घराघरांत गणराय येणार असल्याने बालगोपालांपासून वृद्धांपर्यंत सर्वच गणपतीची वाट पाहात होते. गुरूवारी (दि.१७) गणरायांच्या आगमनाचा दिवस उजाडला. सकाळपासूनच सायकल, दुचाकी व चारचाकीतून लाडके गणराय भाविकांच्या घरी आणले जात होते. दुपारनंतर सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती आणण्यास वेग आला. ढोल-ताशांच्या गजरात तरूण नाचत-गात व जयघोष करीत गणरायांना मंडपापर्यंत आणले जात होते. मात्र पावसामुळे डिजे आणि ढोलताशांना काहीसा लगाम लागल्याचे दिसून आले. पावसाचा थेंबही मूर्तीला लागणार नाही यासाठी प्लॅस्टिक कव्हरने झाकले जात होते. मात्र स्वत: तरुणांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. (शहर प्रतिनिधी)