शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

वनकर्मचाऱ्यांकडून नियमांची व आदेशाची पायमल्ली

By admin | Updated: May 21, 2015 01:01 IST

वनविभागाकून जंगलातील लाकूड चोरी करण्याच्या प्रमाणावर आळा घालण्यासाठी जंगलव्याप्त परिसरातील गावा-गावात वनसमित्या तयार करून लाकूड चोरीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला.

केशोरी परिसर : जळाऊ लाकडांचा ट्रॅक्टर वनकर्मचाऱ्यांच्या घरीकेशोरी : वनविभागाकून जंगलातील लाकूड चोरी करण्याच्या प्रमाणावर आळा घालण्यासाठी जंगलव्याप्त परिसरातील गावा-गावात वनसमित्या तयार करून लाकूड चोरीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आदिवासी कुटूंबाना गॅस कनेक्शन पुरवून सरपनासाठी लागणाऱ्या लाकडांचा उपयोग होऊ नये म्हणून उपाययोजना कार्यान्वित केल्या अर्थात या योजनांमुळे जंगलातील लाकूड चोरीचे प्रमाण निश्चितच कमी झाले असले तरीही वन कर्मचारीच नियमांची पायमल्ली करून वनमजुरांच्या सहकार्याने सरपणासाठी लागणारी लाकडे ट्रॅक्टरव्दारे आपल्या घरी बोलावित असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुंपणच शेत खात असल्याचे यावरून दिसून येते. सरपणासाठी लागणारे जलावू लाकुड आणि मौल्यवान लाकूड जंगलातून चोरी करण्याचा प्रमाणावर आळा बसण्यासाठी शासनाच्या वनविभागाकडून विविध उपाययोजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जंगलव्याप्त भागातील गावा-गावात वनसमित्या निर्माण करून लाकुड चोरीवर नियंत्रण ठेवण्यास शासनाला यश आले. त्याच बरोबर आदिवासी कुटूंबाना गॅस कनेक्शन पुरवून दर महिन्याला सिलींडरचा पुरवठा करण्यामुळे निश्चितच जंगलातील लाकूड चोरी करण्यावर आळा बसला आहे. परंतु केशोरी परिसरातील वनकर्मचाऱ्यांनीच वनमजुरांच्या मार्फत ट्रॅक्टरव्दारे आपल्या घरी जलावू लाकडे आणण्याचे प्रकार सुरू आहे. आदिवासी कुटूंबाना शासनाकडून कमी दरात दर महिन्याला मिळणाऱ्या गॅस सिलींडरचा उपयोग वनकर्मचारी घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या अधिनस्त काम करत असणाऱ्या लहान कर्मचाऱ्यांना खाजगी कामे किंवा घरगुती कामे सांगू नये? असे शासनाने फर्मावली असतांना सुध्दा वनमजुरांकडून आपल्या घरी जलावू लाकडे पोहचविण्याचे कामे करवून घेतली जात आहेत. याला शासकीय काम म्हणता येईल काय? वनकर्मचाऱ्यांनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. तसेच इतर लोकांनी किंवा महिलांनी जंगलातून मोळीभर काड्या आणणे या कर्मचाऱ्यांना खपत नाही तर आपल्या घरी ट्रॅक्टरभर जलावू लाकडे आणण्याचा अधिकार यांना कोणी दिला. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन वनविभागाच्या नियमांची आदेशाची पायमल्ली करून अवहेलना करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)