शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे शपथपत्र घेण्यास नकार

By admin | Updated: January 16, 2017 00:26 IST

पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासन सेवेत विनाअट घेण्याचे आश्वासन दिले असले

गोठणगाव : पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासन सेवेत विनाअट घेण्याचे आश्वासन दिले असले तरी ज्या कर्मचाऱ्यांचे तीन वर्षापेक्षा कमी कालावधी आहे त्यांचे शपथपत्र घेण्यास सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र गोंदिया यांनी मनाई केली आहे. त्यामुळे तीन वर्षापेक्षा कमी कालावधी असलेल्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारातच समजते. ज्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी आपले शपथपत्र ३० जूनपर्यंत भरून दिले नाही अशा कर्मचाऱ्यांनी दिनांक २० जानेवारी २०१७ पर्यंत शपथपत्र जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गोंदिया येथे भरून द्यावे असे सूचनापत्र सूचना फलकावर ९ डिसेंबर २०१६ ला लावण्यात आले. तीन वर्षापेक्षा कमी कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांच्याबाबत काही उल्लेख नाही. कमी कालवधी असलेले कर्मचारी शपथपत्र भरूण देण्यासाठी गेले असता सबंधीत कार्यालयाकडून असभ्य वागणूक दिल्या जाते. भविष्यामध्ये कमी कालावधी असलेल्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासन सेवेतून वगळण्यात येण्याची दाट शक्यता आहे. कारण त्या कर्मचाऱ्यांचे कमी कालावधी करण्याचे काम तत्कालीन संबंधीत शासकीय लिपीकांचेच होते. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची नोंद करून त्यांना वेळेवर काम न देणे, आर्थिक प्रलोभन घेऊन काम देणे, तोंड पाहून कामावर नेमणूक करणे असे प्रकार होत गेले. ज्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी या प्रकाराला विरोध केला त्यांना हेतूपुरस्सर कमी काम केल्याचे प्रमाणपत्र दिले. वास्तविक त्यांचा कालवधी नोंदणी दिनांकापासून धरण्यात यावा, काम करवून घेणे तत्कालीन लिपीकाचे होते त्यात दोष पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा कसा? असा सवाल तीन वर्षापेक्षा कमी कालावधी असलेल्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी केला आहे. तीन वर्षापेक्षा कमी कालावधी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवेदनावर एकाच वेळी आदेश काढण्याचे आश्वासन पदवीधर आ. अनिल सोले यांनी दिले. तरी शासकीय कर्मचारी मात्र याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप कमी कालावधी असणाऱ्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी केला आहे. शपथपत्र भरून घेण्यास सहायक संचालक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गोंदिया यांना हरकत दर्शविली आहे. कमी कालावधी असलेल्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासनसेवेत समाविष्ट करावे किंवा नाही हे शासन ठरवेल. कमी कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांना शपथपत्र भरू द्यावे, अशी मागणी तीन वर्षापेक्षा कमी कालावधी असलेल्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)