शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे शपथपत्र घेण्यास नकार

By admin | Updated: January 16, 2017 00:26 IST

पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासन सेवेत विनाअट घेण्याचे आश्वासन दिले असले

गोठणगाव : पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासन सेवेत विनाअट घेण्याचे आश्वासन दिले असले तरी ज्या कर्मचाऱ्यांचे तीन वर्षापेक्षा कमी कालावधी आहे त्यांचे शपथपत्र घेण्यास सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र गोंदिया यांनी मनाई केली आहे. त्यामुळे तीन वर्षापेक्षा कमी कालावधी असलेल्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारातच समजते. ज्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी आपले शपथपत्र ३० जूनपर्यंत भरून दिले नाही अशा कर्मचाऱ्यांनी दिनांक २० जानेवारी २०१७ पर्यंत शपथपत्र जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गोंदिया येथे भरून द्यावे असे सूचनापत्र सूचना फलकावर ९ डिसेंबर २०१६ ला लावण्यात आले. तीन वर्षापेक्षा कमी कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांच्याबाबत काही उल्लेख नाही. कमी कालवधी असलेले कर्मचारी शपथपत्र भरूण देण्यासाठी गेले असता सबंधीत कार्यालयाकडून असभ्य वागणूक दिल्या जाते. भविष्यामध्ये कमी कालावधी असलेल्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासन सेवेतून वगळण्यात येण्याची दाट शक्यता आहे. कारण त्या कर्मचाऱ्यांचे कमी कालावधी करण्याचे काम तत्कालीन संबंधीत शासकीय लिपीकांचेच होते. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची नोंद करून त्यांना वेळेवर काम न देणे, आर्थिक प्रलोभन घेऊन काम देणे, तोंड पाहून कामावर नेमणूक करणे असे प्रकार होत गेले. ज्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी या प्रकाराला विरोध केला त्यांना हेतूपुरस्सर कमी काम केल्याचे प्रमाणपत्र दिले. वास्तविक त्यांचा कालवधी नोंदणी दिनांकापासून धरण्यात यावा, काम करवून घेणे तत्कालीन लिपीकाचे होते त्यात दोष पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा कसा? असा सवाल तीन वर्षापेक्षा कमी कालावधी असलेल्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी केला आहे. तीन वर्षापेक्षा कमी कालावधी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवेदनावर एकाच वेळी आदेश काढण्याचे आश्वासन पदवीधर आ. अनिल सोले यांनी दिले. तरी शासकीय कर्मचारी मात्र याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप कमी कालावधी असणाऱ्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी केला आहे. शपथपत्र भरून घेण्यास सहायक संचालक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गोंदिया यांना हरकत दर्शविली आहे. कमी कालावधी असलेल्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासनसेवेत समाविष्ट करावे किंवा नाही हे शासन ठरवेल. कमी कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांना शपथपत्र भरू द्यावे, अशी मागणी तीन वर्षापेक्षा कमी कालावधी असलेल्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)