शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

दहावीची परीक्षा घ्या नाही तर शुल्क परत करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:30 IST

तिरोडा: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भरलेली परीक्षा शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांना परत करण्यात ...

तिरोडा: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भरलेली परीक्षा शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांना परत करण्यात यावी, अशी मागणी तिरोडा तालुका भाजप विद्यार्थी आघाडीच्यावतीने शिक्षण मंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

सध्या महाराष्ट्रात मागील वर्षीपेक्षाही यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळे अनेकांना नको त्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यातून विद्यार्थी सुद्धा सुटलेले नाहीत. या सर्व बिंदूचा विचार करून महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा घेतली जाणार नाही म्हणून नुकतीच घोषणा केली आहे. परंतु नियमानुसार परीक्षेला बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेमार्फत परीक्षा शुल्क बोर्डाला दिले आहे. शुल्क भरणारे महाराष्ट्रात एकूण विद्यार्थी १७ लाखाहून अधिक असून ६८ कोटीपेक्षा जास्त शुल्क परीक्षा बोर्डाच्या खात्यात जमा झाले आहे. त्यामुळे जमा झालेल्या शुल्काचे काय करणार? कोरोनाच्या काळात व्यवसाय ठप्प पडल्याने पालकांचे आर्थिक नुकसान बघता सदर सर्वच दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत देण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन तिरोडा शहर भाजप विद्यार्थी आघाडीतर्फे तहसीलदारांना देण्यात आले. शिष्टमंडळात शहराध्यक्ष नितेश हिंगे, तालुकाध्यक्ष रजत पटले, भाजप मोर्चा शहराध्यक्ष अमोल तितीरमारे, अतुल सिंगनजुडे, गौरव कडव, उमेश रहांगडाले यांचा समावेश होता.

..........

अकरावीच्या प्रवेशाबाबत उपाययोजना काय

दहावीची परीक्षा रद्द झाली असली तरीपण पुढील शिक्षणासाठी तथा इयत्ता ११ वीच्या प्रवेशाबाबत उपाययोजना काय. कोणत्या आधारावर किंवा कोणत्या गुणवत्तेवर प्रवेश मिळणार आहे. याची घोषणा राज्याच्या शिक्षण विभागाकडून करण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील तयारी करायला मदत होईल.