शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

धानाच्या चुकाऱ्यासाठी ६७८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:28 IST

गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्याचे ६७८ कोटी ...

गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्याचे ६७८ कोटी रुपयांचे चुकारे मागील दोन महिन्यापासून थकले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती. हीच बाब आ. मनाेहर चंद्रिकापुरे यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी लगेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. यानंतर शुक्रवारी थकीत चुकारे करण्यासाठी ६७८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत खरीप हंगामात एकूण १३६ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आला. खरेदी केलेल्या धानाची एकूण किंमत २५५४.४५ कोटी रुपये यापैकी आतापर्यंत १८७६ कोटी ४३ लाख रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना करण्यात आले होेते. मात्र ६७८ कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले नव्हते. त्यामुळे मागील तीन महिन्यापासून बँका आणि शासकीय धान खरेदी केंद्राच्या पायऱ्या झिजवीत होते. ही बाब आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर खा. पटेल यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची २७ एप्रिल रोजी मंत्रालयात भेट घेऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली. तसेच शेतकऱ्यांची होणारी कोंडी आणि अडचण त्यांच्या लक्षात आणून दिली. यानंतर शासनाने याची दखल घेत आदिवासी विकास महामंडळाला १९७ कोटी व मार्केटिंग फेडरेशनला ४८१ कोटी असे एकूण ६७८ कोटी रुपयांचा निधी शुक्रवारी उपलब्ध करून दिला. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांना धानाच्या चुकाऱ्यांची थकीत रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी पायपीट थांबणार असल्याने शेतकऱ्यांनी खा. प्रफुल्ल पटेल व आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. राजेंद्र जैन यांचे आभार मानले आहेत.

...............

बोनसची रक्कम १५ दिवसात मिळणार

शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० बोनस ५० क्विंटलपर्यंत देण्याची घोषणा शासनाने केली होती. यानंतर जिल्ह्यातील दोन लाखांवर शेतकरी यासाठी प्राप्त ठरले असून बोनसची रक्कमसुध्दा १५ दिवसात त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. यासंदर्भात सुध्दा खा. प्रफुल्ल पटेल यांचा पाठपुरावा सुरु आहे.