शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

धानाच्या चुकाऱ्यासाठी ६७८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:28 IST

गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्याचे ६७८ कोटी ...

गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्याचे ६७८ कोटी रुपयांचे चुकारे मागील दोन महिन्यापासून थकले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती. हीच बाब आ. मनाेहर चंद्रिकापुरे यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी लगेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. यानंतर शुक्रवारी थकीत चुकारे करण्यासाठी ६७८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत खरीप हंगामात एकूण १३६ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आला. खरेदी केलेल्या धानाची एकूण किंमत २५५४.४५ कोटी रुपये यापैकी आतापर्यंत १८७६ कोटी ४३ लाख रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना करण्यात आले होेते. मात्र ६७८ कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले नव्हते. त्यामुळे मागील तीन महिन्यापासून बँका आणि शासकीय धान खरेदी केंद्राच्या पायऱ्या झिजवीत होते. ही बाब आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर खा. पटेल यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची २७ एप्रिल रोजी मंत्रालयात भेट घेऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली. तसेच शेतकऱ्यांची होणारी कोंडी आणि अडचण त्यांच्या लक्षात आणून दिली. यानंतर शासनाने याची दखल घेत आदिवासी विकास महामंडळाला १९७ कोटी व मार्केटिंग फेडरेशनला ४८१ कोटी असे एकूण ६७८ कोटी रुपयांचा निधी शुक्रवारी उपलब्ध करून दिला. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांना धानाच्या चुकाऱ्यांची थकीत रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी पायपीट थांबणार असल्याने शेतकऱ्यांनी खा. प्रफुल्ल पटेल व आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. राजेंद्र जैन यांचे आभार मानले आहेत.

...............

बोनसची रक्कम १५ दिवसात मिळणार

शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० बोनस ५० क्विंटलपर्यंत देण्याची घोषणा शासनाने केली होती. यानंतर जिल्ह्यातील दोन लाखांवर शेतकरी यासाठी प्राप्त ठरले असून बोनसची रक्कमसुध्दा १५ दिवसात त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. यासंदर्भात सुध्दा खा. प्रफुल्ल पटेल यांचा पाठपुरावा सुरु आहे.