शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
3
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
4
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
5
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
6
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
7
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
8
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
9
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
10
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
11
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
12
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
13
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
14
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
15
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
16
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
17
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
18
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
19
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
20
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाची पुन्हा हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:31 IST

गोंदिया : मागील चार-पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस जिल्ह्यात सातत्याने हजेरी लावत आहे. सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाने ...

गोंदिया : मागील चार-पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस जिल्ह्यात सातत्याने हजेरी लावत आहे. सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले होेते. तर या पावसाचा सर्वाधिक फटका कापणी केलेल्या धानाला बसला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंते वातावरण आहे. जिल्ह्यात यंदा ६६ हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड करण्यात आली आहे. तर मागील आठ दिवसांपासून धानाची कापणी सुरू असून जवळपास ६ ते ७ हजार हेक्टरमधील धान कापणी करून शेतातील बांध्यामध्ये पडला आहे. अवकाळी पावसामुळे धानाच्या कडपा भिजल्याने धान मोठ्या प्रमाणात पाखड होण्याची शक्यता वर्तविली आहे. हवामान विभागाने पुढील तीन-चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील संकट कायम आहे. कृषी विभागाने हवामान विभागाच्या अंदाजानंतर शेतकऱ्यांना काही दिवस धानाची कापणी न करण्याचा सल्ला दिला. तसेच कापणी केलेला धान सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास सांगितले. मात्र सोमवारी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने धानाच्या नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे.

...........

नुकसानीचे पंचनाम करणे सुरू

कृषी विभागाने मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. ६६ हजार हेक्टरमधील धानापैकी जवळपास ७ हजार हेक्टरमधील धानाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र सोमवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान वाढण्याची शक्यता आहे.

.............

शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

यंदा रब्बी हंगामातील धान बाजारपेठेत येण्यास सुरुवात झाली, तर शासकीय धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. तर मागील चार-पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

...........