तापलेच नाही : १४ व १५ मे रोजी सर्वाधिक तापमानाची नोंदगोंदिया : नवतपा म्हणताच अंगाला घाम फुटू लागतो व जीवाला धसका बसतो. मात्र यंदाच्या नवतपाला पावसाचा थंडावा मिळाल्याने नवतपा पाहिजे तसा तापलाच नाही. विशेष २५ मे ते २ जूनपर्यंतच्या नवतपाच्या कार्यकाळातील तापमानापेक्षा जास्त तापमान मे महिन्यात आधीच म्हणजे १४ व १५ मे रोजी नोंदल्या गेले होते. त्यामुळे यावेळचा नवतपा बऱ्याच प्रमाणात सुसह्य झाला.निसर्गाने उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असे तीन ऋतूंचे चक्र बांधून दिले आहे. मात्र मानवाच्या स्वार्थीपणामुळे झाडांचे जंगल नष्ट होऊन सिमेंट कॉंक्रीटचे जंगल वाढू लागले आहे. याचा परिणाम ऋतूचक्रावर झाला असून पर्यावरण प्रदूषित झाले आहे. उन्हाची दाहकता वाढत चालली असून पावसाळ््यात पाहिजे तसा पाऊस पडत नाही. निसर्गाशी छेडखानीचे हे परिणाम आता आपल्या समोर येवू लागले आहेत. हेच कारण आहे की पूर्वी ४० डिग्रीच्या वर न जाणारे तापमान आता ४५ अंशांपेक्षा वर जाऊ लागले आहे. नवतपा म्हटला म्हणजे रविराज पृथ्वीच्या जवळ येऊन आग ओकू लागल्याचा काळच म्हटला जातो. अवघ्या उन्हाळ््यातील उन्ह या नऊ दिवसांत पडत असल्याचेही नवतपाबाबत बोलले जाते. यामुळेच नवतपा म्हटला की सुर्यदेव सर्व काही भाजून काढणार एवढ्या तापमानाची कल्पना केली जाते. नवतपाच्या या नऊ दिवसांत नशिबाने सुर्यदेव खरोखरच आग ओकून आपली ताकत दाखवून देतात. यंदा मात्र २५ मे पासून सुरू झालेल्या नवतपाला पावसाने आपला थंडावा दिल्याने नवतपा पाहिजे तसा तापला नाही. कारण यंदा नवतपाच्या काळात बहुतांश दिनी वरूणराजाने आपली हजेरी लावून तापमान नियंत्रणात आणले. २ जून पर्यंत असलेल्या नवतपातील तापमानाची नोंद जाणून घेतली असता १ मे रोजी सर्वाधीक ४३.५ डिग्री होते. नवतपाच्या पूर्वीच्या काळात यापेक्षा जास्त नोंद घेण्यात आली असल्याने यंदाच्या नवतपावर पावसाने पाणी फेरल्याचे दिसले. (शहर प्रतिनिधी)
नवतपाच्या उष्णतेवर पावसाचा उतारा
By admin | Updated: June 3, 2016 01:39 IST