शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाऊस

By admin | Updated: September 19, 2015 02:46 IST

पंधरवड्यापासून दडी मारलेल्या पावसाचे आणि यावर्षी बऱ्यात अंतराअंतराने हजेरी लावत असलेल्या पावसाने सर्वांचाच जीव टांगणीला लागला होता....

तीन दिवसात बॅकलॉग भरला : आतापर्यंत ८१.६ टक्के, मागील वर्षी होता ७४.६ टक्केगोंदिया : पंधरवड्यापासून दडी मारलेल्या पावसाचे आणि यावर्षी बऱ्यात अंतराअंतराने हजेरी लावत असलेल्या पावसाने सर्वांचाच जीव टांगणीला लागला होता. मात्र १५, १६ व १७ सप्टेंबर रोजी झालेल्या जोरदार पावसाने बॅकलॉग भरून काढत गेल्यावर्षीची सरासरी पार केली. मागील वर्षी जिल्ह्यात १८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ९४०.१ मिमी (७४.६ टक्के) पाऊस झाला होता. यंदा १०२८.३ मिमी (८१.६ टक्के) पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.पावसाच्या अभावाने काही ठिकाणी धानपीक वाळण्याच्या मार्गावर होते. दमट वातावरणामुळे पिकांवर अनेक रोग पसरले होते. परंतु तीन दिवसाच्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले. त्यातच गादमाशी व खोडकिड्यांच्या प्रादुर्भाव कमी झाला. आता आणखी १० ते १२ दिवस पाऊस पडला नाही तरी पिकांवर विपरित परिणाम होणार नाही, असे कृषी विभागातून सांगण्यात आले. सदर तीन दिवसांत आलेल्या पावसाचा लाभ सर्व प्रकारच्या पिकांना झाला आहे. मागील वर्षी ज्या-ज्या वेळी पाण्याची पिकांना गरज होती, त्या-त्या वेळी पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न झाले होते. यंदा आतापर्यंतची स्थिती पाहता पाऊस पडण्याच्या काळात मोठा कालखंड दिसून येत आहे. सतत दोन दिवस पाऊस आल्यानंतर १५ ते २० दिवसपर्यंत पाऊस पडत नाही. पिकांना गरजेच्या वेळीच पाणी मिळत नसल्याने उत्पन्नात घटसुद्धा होवू शकते. यंदाच्या पावसाने मागील वर्षाची सरासरी ओलांडली असली तरी गॅप मोठी असल्याने शेतकरी वर्ग काहिसा चिंतीत दिसून येत आहे. (प्रतिनिधी)