शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाऊस

By admin | Updated: September 19, 2015 02:46 IST

पंधरवड्यापासून दडी मारलेल्या पावसाचे आणि यावर्षी बऱ्यात अंतराअंतराने हजेरी लावत असलेल्या पावसाने सर्वांचाच जीव टांगणीला लागला होता....

तीन दिवसात बॅकलॉग भरला : आतापर्यंत ८१.६ टक्के, मागील वर्षी होता ७४.६ टक्केगोंदिया : पंधरवड्यापासून दडी मारलेल्या पावसाचे आणि यावर्षी बऱ्यात अंतराअंतराने हजेरी लावत असलेल्या पावसाने सर्वांचाच जीव टांगणीला लागला होता. मात्र १५, १६ व १७ सप्टेंबर रोजी झालेल्या जोरदार पावसाने बॅकलॉग भरून काढत गेल्यावर्षीची सरासरी पार केली. मागील वर्षी जिल्ह्यात १८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ९४०.१ मिमी (७४.६ टक्के) पाऊस झाला होता. यंदा १०२८.३ मिमी (८१.६ टक्के) पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.पावसाच्या अभावाने काही ठिकाणी धानपीक वाळण्याच्या मार्गावर होते. दमट वातावरणामुळे पिकांवर अनेक रोग पसरले होते. परंतु तीन दिवसाच्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले. त्यातच गादमाशी व खोडकिड्यांच्या प्रादुर्भाव कमी झाला. आता आणखी १० ते १२ दिवस पाऊस पडला नाही तरी पिकांवर विपरित परिणाम होणार नाही, असे कृषी विभागातून सांगण्यात आले. सदर तीन दिवसांत आलेल्या पावसाचा लाभ सर्व प्रकारच्या पिकांना झाला आहे. मागील वर्षी ज्या-ज्या वेळी पाण्याची पिकांना गरज होती, त्या-त्या वेळी पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न झाले होते. यंदा आतापर्यंतची स्थिती पाहता पाऊस पडण्याच्या काळात मोठा कालखंड दिसून येत आहे. सतत दोन दिवस पाऊस आल्यानंतर १५ ते २० दिवसपर्यंत पाऊस पडत नाही. पिकांना गरजेच्या वेळीच पाणी मिळत नसल्याने उत्पन्नात घटसुद्धा होवू शकते. यंदाच्या पावसाने मागील वर्षाची सरासरी ओलांडली असली तरी गॅप मोठी असल्याने शेतकरी वर्ग काहिसा चिंतीत दिसून येत आहे. (प्रतिनिधी)