शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

पावसाने मारली दडी

By admin | Updated: August 31, 2014 23:59 IST

तिरोडा तालुक्यात खरीप भात पिकाचे क्षेत्र २९८१४.५८ हेक्टर आहे. यात ओलिताचे क्षेत्र २३ हजार ६२५ हेक्टर असून बिनओलिताचे ६०६९.८८ हेक्टर क्षेत्र आहे. पावसाने दडी मारल्याने बिनओलिताखाली

काचेवानी : तिरोडा तालुक्यात खरीप भात पिकाचे क्षेत्र २९८१४.५८ हेक्टर आहे. यात ओलिताचे क्षेत्र २३ हजार ६२५ हेक्टर असून बिनओलिताचे ६०६९.८८ हेक्टर क्षेत्र आहे. पावसाने दडी मारल्याने बिनओलिताखाली असलेले क्षेत्रातील धानपीक पूर्णत: नष्ट होण्याची शक्यता आहे. खंडित पावसाने बळीराजा आजही घाबरलेला आहे. पंधरा दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी लोटूनही पाऊस न आल्याने शेतात भेगा (फटी) पडायला लागल्या होत्या. आॅगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात अचानक आलेल्या पावसामुळे शेतातील धानपिकाला संजीवनी मिळाली आहे. मात्र आता पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. पावसाळ्याच्या सुरूवातीपासूनच हे वर्ष शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार नाही, अशी भीती त्यांच्यात होती. ती खरी ठरली. तरी पावसाने उशिरा हजेरी लावल्याने पुन्हा शेतकऱ्यांना उत्साह आला. आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा पावसाने दडी मारली. काही भागात पाऊस आला तर काही भागात काहीच पाऊस नाही. अशास्थितीत धानपिकांचे काय होणार, अशी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तिरोडा तालुक्यातील तिरोडा, वडेगाव, मुंडीकोटा व ठाणेगाव या महसूल मंडळांतर्गत पावसाचे प्रमाण आजही कमी आहे. अशीच परिस्थिती राहिली तर बिनओलितामध्ये असलेले पीक नाहिसे होण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. रोवणीचे काम पूर्ण होईपर्यंत पाऊस बरोबर राहिला. शेतकऱ्यांनी सतत येणारा पाऊस बघत शेतात जमा झालेला पाणी बाहेर काढला. तीनचार दिवसांनी पाऊस पडणे बंद झाले. त्यामुळे बांध्यांतील पाणी आटले आणि जमिनीला भेगा पडू लागल्या. गेल्या आठवड्यात दोन दिवसांच्या पावसाने काहिसा दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा तीच परिस्थिती दोन दिवसांनी येणार आहे. दोन दिवसांत पावसाने हजेरी लावली नाही तर धानपिके पुन्हा धोक्यात येणार आहेत. (वार्ताहर)