शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

पाऊस व वादळाने झोडपले

By admin | Updated: June 3, 2015 01:11 IST

तालुक्यात ३१ मे रोजी ४६ डिग्री सेल्सिअस तापमान भिषण गर्मीची दाहक होती. अशातच रात्री ११.३० वाजता निसर्गाने आपले रंग बदलविले.

अर्जुनी-मोरगाव : तालुक्यात ३१ मे रोजी ४६ डिग्री सेल्सिअस तापमान भिषण गर्मीची दाहक होती. अशातच रात्री ११.३० वाजता निसर्गाने आपले रंग बदलविले. प्रचंड विजेच्या कडकडासह अवकाळी पावसाने व वादळाने थैमान घातले. या वादळी पावसात रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात शेकडो वृक्षासह शेकडो घरे अंशत: पडली असून महसूल विभागाच्या वतीने पंचनामे सुरू आहेत. गेल्या ६० ते ७० वर्षाच्या काळातही एवढा विजांचा कडकडाट कुणी ऐकल्याचे सांगत नाही. या कडकडामुळे तालुक्यातील नागरिक भयभीत झाले होते. यात जिवीतहाणी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे निदर्शनास येत आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ३१ मे ची रात्र सदैव आठवणीत राहील असा प्रचंड विजेचा कडकडाट लोकांनी पहिल्यांदाच अनुभवला. या वादळी पावसात तालुक्यातील रबीचे पिकांचे व फळभाजी पिकांचे लाखोचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील कुंभीटोला येथील प्रगतशील शेतकरी विजयसिंह राठोड यांचे शेतातील १७ केळीची बाग या वादळामुळे पूर्णत: उध्वस्त झाली. ऐन केळी लागण्याच्या उंबरठ्यावर असतांना या वादळाने केळीचे झाडे उन्मळून पडली. त्यामुळे सदर शेतकऱ्यांचे दोन लाखाचे जवळपास नुकसान झाले आहे. बोंडगावदेवी येथील कुशन झोळे, विहीरगाव येथील विश्वनाथ वालदे यांनी आपल्या शेतात तयार केलेले शेडनेट खांबासह उडाल्याने दोघाही शेतकऱ्यांचे दिड लाख रूपये प्रत्येकी असे तिन लाखाचे नुकसान झाले. शेडनेट मध्ये असणारी कारले पिक पूर्णत: उध्दवस्त झाले. मागील वर्षीसुध्दा याच शेतकऱ्यांचे गारपिटीने लाखो रुपयाचे टरबूज पिक नेस्तनाबूत झाले. या वादळात तालुक्यातील अनेक गावात शेकडो वृक्ष कोसळले. अर्जुनी-मोरगाव मंडळात देवलगाव ३ घरे, बाराभाटी ५ घरे, मोरगाव ३० घरे, अर्जुनी-मोरगाव ४० घरे, निमगाव ३० घरे, धाबेटेकडी १० घरे अंशत: पडली आहेत. ३ लाख ३ लाख २७ हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पूर्ण गावातील पंचनामे मंगळवारी दुपारी २ वाजतापर्यंत तहसील कार्यालयाला येण्यास असल्याने नुकसानीचा आकडा बरोबर मिळू शकला नाही. मात्र संपूर्ण तालुक्यातच शेकडो घरे पडल्याची माहिती आहे. चान्ना/बाक्टी येथे जगन रेवतीराम लोगडे यांचे घरावर विज पडल्याने घरातील सामानाचे बरेच नुकसान झाले आहे. ६० ते ७० हजाराचे नुकसान प्राथमिक अंदाज आहे. अर्जुनी-मोरगाव शहरात लघु व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांचे दुकाने वादळाने उडवून नेली. यात हजारोचे नुकसान झाले आहे. अर्जुनी-मोरगाव येथे रामदेव राईस मिल तथा श्रीकृष्ण राईस मिलच्या गोदामातील टीन उडाल्याने लाखो रुपयाच्या तांदळावर पाणी गेल्याने तांदूळ खराब झाले आहे. या वादळामुळे रात्री १२ वाजतापासूनच विज पुरवठा खंडीत झाला आहे. अवकाळी पाऊस व प्रचंड वादळी पावसाने अक्षरश: अर्जुनी-मोरगाव तालुक्याला झोडपून काढले. (तालुका प्रतिनिधी)