शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस व वादळाने झोडपले

By admin | Updated: June 3, 2015 01:11 IST

तालुक्यात ३१ मे रोजी ४६ डिग्री सेल्सिअस तापमान भिषण गर्मीची दाहक होती. अशातच रात्री ११.३० वाजता निसर्गाने आपले रंग बदलविले.

अर्जुनी-मोरगाव : तालुक्यात ३१ मे रोजी ४६ डिग्री सेल्सिअस तापमान भिषण गर्मीची दाहक होती. अशातच रात्री ११.३० वाजता निसर्गाने आपले रंग बदलविले. प्रचंड विजेच्या कडकडासह अवकाळी पावसाने व वादळाने थैमान घातले. या वादळी पावसात रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात शेकडो वृक्षासह शेकडो घरे अंशत: पडली असून महसूल विभागाच्या वतीने पंचनामे सुरू आहेत. गेल्या ६० ते ७० वर्षाच्या काळातही एवढा विजांचा कडकडाट कुणी ऐकल्याचे सांगत नाही. या कडकडामुळे तालुक्यातील नागरिक भयभीत झाले होते. यात जिवीतहाणी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे निदर्शनास येत आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ३१ मे ची रात्र सदैव आठवणीत राहील असा प्रचंड विजेचा कडकडाट लोकांनी पहिल्यांदाच अनुभवला. या वादळी पावसात तालुक्यातील रबीचे पिकांचे व फळभाजी पिकांचे लाखोचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील कुंभीटोला येथील प्रगतशील शेतकरी विजयसिंह राठोड यांचे शेतातील १७ केळीची बाग या वादळामुळे पूर्णत: उध्वस्त झाली. ऐन केळी लागण्याच्या उंबरठ्यावर असतांना या वादळाने केळीचे झाडे उन्मळून पडली. त्यामुळे सदर शेतकऱ्यांचे दोन लाखाचे जवळपास नुकसान झाले आहे. बोंडगावदेवी येथील कुशन झोळे, विहीरगाव येथील विश्वनाथ वालदे यांनी आपल्या शेतात तयार केलेले शेडनेट खांबासह उडाल्याने दोघाही शेतकऱ्यांचे दिड लाख रूपये प्रत्येकी असे तिन लाखाचे नुकसान झाले. शेडनेट मध्ये असणारी कारले पिक पूर्णत: उध्दवस्त झाले. मागील वर्षीसुध्दा याच शेतकऱ्यांचे गारपिटीने लाखो रुपयाचे टरबूज पिक नेस्तनाबूत झाले. या वादळात तालुक्यातील अनेक गावात शेकडो वृक्ष कोसळले. अर्जुनी-मोरगाव मंडळात देवलगाव ३ घरे, बाराभाटी ५ घरे, मोरगाव ३० घरे, अर्जुनी-मोरगाव ४० घरे, निमगाव ३० घरे, धाबेटेकडी १० घरे अंशत: पडली आहेत. ३ लाख ३ लाख २७ हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पूर्ण गावातील पंचनामे मंगळवारी दुपारी २ वाजतापर्यंत तहसील कार्यालयाला येण्यास असल्याने नुकसानीचा आकडा बरोबर मिळू शकला नाही. मात्र संपूर्ण तालुक्यातच शेकडो घरे पडल्याची माहिती आहे. चान्ना/बाक्टी येथे जगन रेवतीराम लोगडे यांचे घरावर विज पडल्याने घरातील सामानाचे बरेच नुकसान झाले आहे. ६० ते ७० हजाराचे नुकसान प्राथमिक अंदाज आहे. अर्जुनी-मोरगाव शहरात लघु व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांचे दुकाने वादळाने उडवून नेली. यात हजारोचे नुकसान झाले आहे. अर्जुनी-मोरगाव येथे रामदेव राईस मिल तथा श्रीकृष्ण राईस मिलच्या गोदामातील टीन उडाल्याने लाखो रुपयाच्या तांदळावर पाणी गेल्याने तांदूळ खराब झाले आहे. या वादळामुळे रात्री १२ वाजतापासूनच विज पुरवठा खंडीत झाला आहे. अवकाळी पाऊस व प्रचंड वादळी पावसाने अक्षरश: अर्जुनी-मोरगाव तालुक्याला झोडपून काढले. (तालुका प्रतिनिधी)