शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रबीसाठी अधिक मिळाले पाणी

By admin | Updated: June 4, 2015 00:57 IST

रबी धान पिकाचे उत्पन्न जिल्ह्यातील आठही तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात घेण्यात येत आहे. रबी पिकामुळे उत्पन्न चांगले येणार असल्याने शेतकारी आनंदित झाले आहे.

कापणी-मळणी जोमात : चांगले उत्पन्न येण्याचे संकेतगोंदिया : रबी धान पिकाचे उत्पन्न जिल्ह्यातील आठही तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात घेण्यात येत आहे. रबी पिकामुळे उत्पन्न चांगले येणार असल्याने शेतकारी आनंदित झाले आहे. ज्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार नव्हते त्यांनाही पाणी मिळाल्यामुळे शेतकरी आनंदीत झाले आहेत. बाघ ईटीयाडोह आमगाव व गोंदिया तालुक्यात सिंचनाचे नियोजन करुन ९६० हेक्टर शेतीला पाणी देण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु बाघ ईटियाडोहने दीड हजार हेक्टर शेतीला पाणी दिले. ५४० हेक्टर शेतीत रबी पिकाचे अधिक उत्पादन घेतल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदित झाला आहे. सालेकसा तालुक्यात २१० हेक्टर शेती सिंचनाखाली आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. बाघ पाटबंधारेच्या पाण्यातून १२०० हेक्टर शेती सिंचनाखाली आणली. सालेकसा तालुक्यात ९९० हेक्टर शेती अधिक सिंचनाखाली आणण्यात आली. उशिरा लावलेली रबी पिके आठवडाभरात कापून त्यांची मळणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व मोठ्या जलाशयांमध्ये मुबलक पाणी असल्यामुळे जणावरांनाही याचा फायदा होत आहे. धरण व तलावांमध्ये काही प्रमाणात पाणी असल्यामुळे मान्सून थोडा लांबला तरी शेतकऱ्यांना चिंता करावी लागणार नाही. मागील वर्षी पाऊस कमी पडला होता. त्या मानाने जिल्ह्यात रबी पीक जास्त क्षेत्रात घेण्यात आले. यावर्षी सुरवातीला आलेल्या अकाली पावसाने रबी धान पिकाला संजीवनी दिली. परंतु गर्भावस्थेत धान असताना तसेच कापणीवर धान येताच पावसाने झोडपल्यामुळे चांगले उत्पन्न ही आशा उराशी बाळगून असलेल्या शेतकऱ्यांच्या मनात निराशा निर्माण झाली. (तालुका प्रतिनिधी)अकाली पावसाने झाले नुकसानअर्जुनी-मोरगाव येथे सोमवारच्या पहाटे झालेल्या पावसामुळे धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांचे धान शेतात पडले आहेत त्यांचे नुकसान झाले आहे. धानाच्या ढिगाऱ्यावरही पाणी गेल्यामुळे तेही धान खराब झाले आहे. १५ दिवसांपूर्वी सडक-अर्जुनी तालुक्यात गारपिटीसह आलेल्या पावसाने धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चांगले उत्पन्न हातात येईल, अशी अपेक्षा असताना शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसर्गाने हिरावण्याचा प्रयत्न केला. सतत चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्याला निसर्गानेही बुचकळ्यात टाकले आहे.शेतीत महिलांचा पुढाकारसालेकसा तालुक्यात राज्य सरकारद्वारे संचालित महिला आर्थिक विकास महामंडळाने केंद्राच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची साथ घेऊन सालेकसा तालुक्यात ७७ हेक्टर शेतीत धान पिकाची लागवड केली. या अभियानात २३४ महिलांचा समावेश आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी या २३४ महिलांचे काम पाहून आनंद व्यक्त करीत आहे. आता खरीप पिकासाठी ३०० हेक्टर जमिनीत धान पीक लावले जाणार आहे. यामध्ये ५०० पेक्षा अधिक महिलांना या योजनेने जोडले जाणार आहेत.