शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

जलदूत होऊन भागवितो ३०० कुटुंबांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:20 IST

सौंदड : जिल्ह्यात प्रशासनाच्या नियोजनशून्य धोरण आणि कोरोनाच्या संकटामुळे पाणीटंचाईची समस्या उद्‌भवत आहे. जिल्ह्यातील अनेक गावे तहानलेली आहेत. सडक ...

सौंदड : जिल्ह्यात प्रशासनाच्या नियोजनशून्य धोरण आणि कोरोनाच्या संकटामुळे पाणीटंचाईची समस्या उद्‌भवत आहे. जिल्ह्यातील अनेक गावे तहानलेली आहेत. सडक अर्जुनी तालु्क्यातील सौंदड येथे पाणीटंचाई आहे. या गावाजवळ चूलबंद नदी आहे. मात्र, ती कोरडीठाक पडल्याने गावातील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गावाची पाणीटंचाई दूर करण्यासाठी ३० वर्षीय रोशन शिवणकर हा जलदूत म्हणून धावून आला आहे.

दररोज तो तब्बल तीनशे कुटुंबीयांना टँकरद्वारे तब्बल दीड लाख लीटर पाणी मोफत पुरवितो. पाणीटंचाई गोंदिया जिल्ह्याच्या पाचवीला पुजलेली आहे. मागील तीन वर्षांत ही समस्या भीषण रूप धारण करू लागली आहे. लोकांनाच पिण्यासाठी पाणी नसल्याने जनावरांना काय पाजणार, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशीच भीषण परिस्थिती सौंदडची आहे. या गावाला पाणीपुरवठा करणारी चूलबंद नदीच कोरडीठाक पडल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांपासून तर लहान बालकांमध्येही आणीबाणी दिसून येत आहे. ही बाब रोशन शिवणकर या तरुणाच्या लक्षात आली. तेव्हा त्याने प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेत, गावातील शेतकऱ्यांच्या शेतातून टँकरद्वारे पाणी आणून तो नागरिकांची तहान भागवत आहे. दरवर्षीच्या उन्हाळा हा सौंदड गावासाठी सर्वात कठीण काळ असतो. या वर्षी ही पाणीटंचाई आहे, पण ती निव्वळ उन्हाळ्यामुळे नाही, नियोजनाचा अभाव आणि पाण्याचा अवास्तव वापर या कारणामुळे आहे. सोबतच कोरोनाच्या संकटामुळे पाणीटंचाईकडे दुर्लक्ष झाल्याचे अधिकारी सांगतात, परंतु यंदा रोशनसारखा जलयुवक नागरिकांसाठी जलदूत म्हणून धावून आला नसता, तर नक्कीच पाण्यासाठी मोठी आणीबाणी निर्माण झाली असती, हे मात्र खरे. त्यामुळे प्रशासनाने कायमस्वरूपी सौंदड येथील पाणीटंचाईवर उपाय शोधल्यास रोशन शिवणकरसारख्या जलदूताला नागरिकांवर आलेली पाणीटंचाई दूर करण्यास धावून येण्याची गरज पडणार नाही.