शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

पथदिव्यांची वीज जोडणी त्वरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:20 IST

आमगाव : वीज वितरण कंपनीकडून गावातील पथदिव्यांची वीज जोडणी कापली जात असल्याने रात्रीला गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ...

आमगाव : वीज वितरण कंपनीकडून गावातील पथदिव्यांची वीज जोडणी कापली जात असल्याने रात्रीला गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अशात पथदिव्यांची जोडणी त्वरित करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी सरपंच सेवा संघाच्यावतीने पालकमंत्री नवाब मलिक यांना निवेदन देण्यात आले आहे.

तालुका सरपंच सेवा संघाच्यावतीने गावातील पथदिव्यांची जोडणी आणि इतर विविध समस्यांसंदर्भात पंचायत समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सभेत वीज महावितरणने कपात केलेली पथदिव्यांची जोडणी त्वरित करावी व थकीत वीज देयक राज्य सरकारने वहन करावे. तसेच मनरेगाच्या कुशल आणि अकुशल कामांची देयके जनतेला त्वरित देण्यात यावीत. संगणक ऑपरेटरला देण्यात येणारे मानधन हे वित्त आयोगातून न देता शासनाने ग्रामपंचायतीच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे यांना द्यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांचेमार्फत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. तसेच पालकमंत्री नवाब मलिक आणि आमदार विनोद अग्रवाल यांना सुद्धा देण्यात आले. यावर येत्या पावसाळी अधिवेशनात तोडगा काढला जाईल, असे आश्वासन नामदार मलिक यांनी दिले आहे.

शिष्टमंडळात तालुका सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष सरपंच सुनील ब्राम्हणकर, नरेंद्र शिवणकर, हंसराज चूटे, सुनंदा ऊके, सुनील खोब्रागडे, गोदावरी हत्तीमारे, प्रमिला चकोले, दुर्गेश पटले, राजकुमार चव्हाण, नामदेव दोनोडे, लखन भलावी, भेजलाल पटले, सरिता डोये, उपसरपंच ललित ठाकूर यांचा समावेश होता.

-----------------------

दिला आंदोलनाचा इशारा

वीज कंपनीने जोडणी कापल्याने गावात अंधार असून आता पावसाळ्यात गावातील जनतेला रहदारी करण्यास त्रास होत आहे. तसेच विषारी साप व कीटकांपासून धोका निर्माण झाला आहे. अशात गावातील जनतेला कोणत्याही अप्रिय घटनेला सामोरे जावे लागल्यास यासाठी सर्वस्वी जिल्हा परिषद आणि सोबतच महावितरण कंपनीला जबाबदार धरले जाईल. करिता कपात केलेली पथदिव्यांची जोडणी त्वरित पूर्ववत करण्यात यावी, अन्यथा सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.