शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना जि.प.च्या शाळेतच टाका

By admin | Updated: July 5, 2017 00:35 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना आता त्यांचे पाल्य जिल्हा परिषदेच्या शाळांतच टाकावे लागतील.

जिल्हा परिषदेचे फर्मान : अन्यथा शिक्षकांना सोयींना मुकावे लागणार लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना आता त्यांचे पाल्य जिल्हा परिषदेच्या शाळांतच टाकावे लागतील. असे न केल्यास शिक्षकांना मिळणाऱ्या सोयींपासून मुकावे लागणार असा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजिटल झाल्या. आता या शाळांतील पटसंख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या शाळांत कार्यरत शिक्षकांची पाल्ये खाजगी शाळेत शिक्षत घेत आहेत. यामुळे शिक्षकांचे विद्यार्थ्यांकडे लक्ष नसून परिणामी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे. यामुळे पालकही आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठविण्यात इच्छूक नाहीत. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून एक हजारांपेक्षा अधिक प्राथमिक तर २२ माध्यमिक शाळा आहेत. या प्राथमिक शाळांत चार हजार तर माध्यमिक शाळांमध्ये २५० शिक्षक कार्यरत आहेत. जिल्ह्यातील बहुतांश भाग आदिवासी व नक्षलग्रस्त आहे. ९० टक्के बालके जि.प. शाळात शिक्षण घेतात.परंतु या शाळांची दैनावस्था आहे. अशात शिक्षकांची मुलेही जिल्हा परिषदेच्या शाळांत शिक्षणासाठी आल्यास एकतर शाळांची पटसंख्या वाढणार. शिवाय शिक्षकांचेही शिक्षणाकडे लक्ष लागून राहील व शिक्षणाचा दर्जा वधारणार. त्यामुळे जि.प.शाळांची स्थिती बदलविण्यासाठी शाळांतील शिक्षकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकवावे अशी सक्ती करण्यात आली आहे. यामुळे मात्र शिक्षकांची गोची झाली आहे. तीन हायस्कूल होणार क. महाविद्यालयजि.प.शाळांतील शिक्षकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांतच शिकवावे या आमसभेच्या विषयाला मंजूरी देण्यात आली असून सदर प्रस्ताव शासनाला मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. या व्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या कावराबांध, साखरीटोला व सडक-अर्जुनी येथील हायस्कूलला कनिष्ठ महाविद्यालयाचा दर्जा दिला जाणार आहे. जिल्ह्यात राज्य सरकार द्वारे चालविण्यात येणारे २१ पशू वैद्यकीय दवाखाने जि.प. सोपवावे, यांत्रिकी कर्मचाऱ्यांना स्थायी करा, शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या डीबीटी योजनेला बंद करून जूनी योजना लागू करण्याच्या मागणीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. जून्या योजनांमुळे शेतकऱ्यांना जास्त लाभ होईल. वेळेवर शासनाचा पैसा खर्च होईल असे जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांचे म्हणणे आहे. जि.प. सदस्यांना कर्जमुक्ती द्यासरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यात आली. परंतु जिल्हा परिषद सदस्यांना वंचित ठेवण्यात आले आहे. जि.प. सदस्यांना कर्जमुक्ती देण्यात यावी यासंदर्भातील प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. जि.प. सदस्यांना सरकारकडून अनुदान दिले जात नाही. जि.प.शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांनी आपल्या मुलांना जि.प. शाळेतच शिकविले तर ते जास्त मेहनत करतील. त्याचा लाभ इतर विद्यार्थ्यांनाही निश्चीत होईल. जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल्या मुलांना न शिकविणाऱ्या शिक्षकांना घरभाडे भत्ता व इतर सोयीसुविधा दिल्या जाणार नाही.उषा मेंढेअध्यक्ष, जिल्हा परिषद, गोंदिया