शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

मुलांना जि.प.च्या शाळेतच टाका

By admin | Updated: July 5, 2017 00:35 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना आता त्यांचे पाल्य जिल्हा परिषदेच्या शाळांतच टाकावे लागतील.

जिल्हा परिषदेचे फर्मान : अन्यथा शिक्षकांना सोयींना मुकावे लागणार लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना आता त्यांचे पाल्य जिल्हा परिषदेच्या शाळांतच टाकावे लागतील. असे न केल्यास शिक्षकांना मिळणाऱ्या सोयींपासून मुकावे लागणार असा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजिटल झाल्या. आता या शाळांतील पटसंख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या शाळांत कार्यरत शिक्षकांची पाल्ये खाजगी शाळेत शिक्षत घेत आहेत. यामुळे शिक्षकांचे विद्यार्थ्यांकडे लक्ष नसून परिणामी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे. यामुळे पालकही आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठविण्यात इच्छूक नाहीत. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून एक हजारांपेक्षा अधिक प्राथमिक तर २२ माध्यमिक शाळा आहेत. या प्राथमिक शाळांत चार हजार तर माध्यमिक शाळांमध्ये २५० शिक्षक कार्यरत आहेत. जिल्ह्यातील बहुतांश भाग आदिवासी व नक्षलग्रस्त आहे. ९० टक्के बालके जि.प. शाळात शिक्षण घेतात.परंतु या शाळांची दैनावस्था आहे. अशात शिक्षकांची मुलेही जिल्हा परिषदेच्या शाळांत शिक्षणासाठी आल्यास एकतर शाळांची पटसंख्या वाढणार. शिवाय शिक्षकांचेही शिक्षणाकडे लक्ष लागून राहील व शिक्षणाचा दर्जा वधारणार. त्यामुळे जि.प.शाळांची स्थिती बदलविण्यासाठी शाळांतील शिक्षकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकवावे अशी सक्ती करण्यात आली आहे. यामुळे मात्र शिक्षकांची गोची झाली आहे. तीन हायस्कूल होणार क. महाविद्यालयजि.प.शाळांतील शिक्षकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांतच शिकवावे या आमसभेच्या विषयाला मंजूरी देण्यात आली असून सदर प्रस्ताव शासनाला मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. या व्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या कावराबांध, साखरीटोला व सडक-अर्जुनी येथील हायस्कूलला कनिष्ठ महाविद्यालयाचा दर्जा दिला जाणार आहे. जिल्ह्यात राज्य सरकार द्वारे चालविण्यात येणारे २१ पशू वैद्यकीय दवाखाने जि.प. सोपवावे, यांत्रिकी कर्मचाऱ्यांना स्थायी करा, शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या डीबीटी योजनेला बंद करून जूनी योजना लागू करण्याच्या मागणीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. जून्या योजनांमुळे शेतकऱ्यांना जास्त लाभ होईल. वेळेवर शासनाचा पैसा खर्च होईल असे जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांचे म्हणणे आहे. जि.प. सदस्यांना कर्जमुक्ती द्यासरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यात आली. परंतु जिल्हा परिषद सदस्यांना वंचित ठेवण्यात आले आहे. जि.प. सदस्यांना कर्जमुक्ती देण्यात यावी यासंदर्भातील प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. जि.प. सदस्यांना सरकारकडून अनुदान दिले जात नाही. जि.प.शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांनी आपल्या मुलांना जि.प. शाळेतच शिकविले तर ते जास्त मेहनत करतील. त्याचा लाभ इतर विद्यार्थ्यांनाही निश्चीत होईल. जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल्या मुलांना न शिकविणाऱ्या शिक्षकांना घरभाडे भत्ता व इतर सोयीसुविधा दिल्या जाणार नाही.उषा मेंढेअध्यक्ष, जिल्हा परिषद, गोंदिया