शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST

बिरसी फाटा : महावितरणकडून कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा करण्यात येत नसल्याने कृषी पंपधारक शेतकरी अडचणीत आले असून उन्हाळी धान पिकांवर ...

बिरसी फाटा : महावितरणकडून कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा करण्यात येत नसल्याने कृषी पंपधारक शेतकरी अडचणीत आले असून उन्हाळी धान पिकांवर सुद्धा संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा,अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरणला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

मागील काही दिवसापासून गोंडेगाव फिडरवरील काही गावातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा झाला आहे. या विषयात वारंवार संबंधितांना सांगूनही सुधारणा न झाल्याने कनिष्ठ अभियंता महावितरण पालांदूर यांना समस्येचे निवारण करण्याच्या अनुषंगाने निवेदन देण्यात आहे. पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. गुरढा,गोंडेगाव परिसरासह गावातील वीज समस्या मागील पंधरा दिवसापासून ऐरणीवर आलेली आहे. धान पिकासह बागायतीचे क्षेत्र अधिक असल्याने पाण्याची नितांत गरज आहे. दिवसेंदिवस उन्ह वाढत असल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. कृषिपंपांना नियमित वीज मिळत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषिपंपांना किमान १२ तास वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच या परिसरातील वीज कर्मचाऱ्याची बदली करण्यात यावी. या मागण्यांचे निवेदन कनिष्ठ सहाय्यक अभियंता मयंक सिंह यांना देण्यात आले आहे. यावर तोडगा न काढल्यास महावितरणच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.