शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
3
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
4
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
5
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
6
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
7
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
8
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
9
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
10
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
11
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
12
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
13
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
14
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
15
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
16
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
17
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
18
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
19
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
20
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?

वनांचे संरक्षण व संवर्धन काळाची गरज

By admin | Updated: July 16, 2016 02:14 IST

जंगलतोड थांबवून वनांचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येकाचेच आद्यकर्तव्य आहे. सरकार वृक्ष लागवड करून व त्यांचे संगोपन करून

वृक्षतोड थांबवा : गॅस वाटप कार्यक्रम इसापूर : जंगलतोड थांबवून वनांचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येकाचेच आद्यकर्तव्य आहे. सरकार वृक्ष लागवड करून व त्यांचे संगोपन करून पर्यावरण संतुलीत राखण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन अर्जुनी-मोरगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी. रहांगडाले यांनी केले. ते खामखुरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी १३ जुलैला गॅस वाटप कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले, १ ते ७ जुलैपर्यंत शासनाने पर्यावरण संतुलन सप्ताह राबवून राज्यात २ कोटी वृक्ष लागवड केली आहे. त्यांचे संगोपन करणे आपले कर्तव्य आहे. आजघडीला ग्रामीण भागात इंधन म्हणून जलाऊ लाकडे जंगलातून आणून स्वयंपाक केले जाते. त्या वृक्षतोडीने पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे शासनाच्या वतीने अनुदानीत गॅस कनेक्शन वाटप होत आहे. इंधनासाठी गॅसचा वापर करून वृक्षतोड थांबवा, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले. अध्यक्षस्थानी सरपंच संजय राऊत होते. प्रमुख अतिथी म्हणून क्षेत्रसहायक व्ही.जे. दखने, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओमेश्वर संग्रामे, शीतल लाडे, परसराम जांभुळकर, रविंद्र मिसार व गणमान्य नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी सरपंच संजय राऊत यांनी, पर्यावरणाचे संतुलन टिकविण्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणे हे गावातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. इंधनासाठी गॅसचा वापर करून वृक्षतोड थांबविण्यासाठी त्यांनी आवाहन केले. या वेळी अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना २९ कनेक्शन तर इतर वर्गाला १८ असे एकूण ४७ गॅस कनेक्शन अनुदानावर वाटप करण्यात आले. संचालन पोलीस पाटील जयप्रकाश लाडे यांनी केले. आभार वन व्यवस्थापन समितीचे सचिव पी.एम. केळवतकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी वन व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)