शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

वनांचे संरक्षण व संवर्धन काळाची गरज

By admin | Updated: July 16, 2016 02:14 IST

जंगलतोड थांबवून वनांचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येकाचेच आद्यकर्तव्य आहे. सरकार वृक्ष लागवड करून व त्यांचे संगोपन करून

वृक्षतोड थांबवा : गॅस वाटप कार्यक्रम इसापूर : जंगलतोड थांबवून वनांचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येकाचेच आद्यकर्तव्य आहे. सरकार वृक्ष लागवड करून व त्यांचे संगोपन करून पर्यावरण संतुलीत राखण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन अर्जुनी-मोरगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी. रहांगडाले यांनी केले. ते खामखुरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी १३ जुलैला गॅस वाटप कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले, १ ते ७ जुलैपर्यंत शासनाने पर्यावरण संतुलन सप्ताह राबवून राज्यात २ कोटी वृक्ष लागवड केली आहे. त्यांचे संगोपन करणे आपले कर्तव्य आहे. आजघडीला ग्रामीण भागात इंधन म्हणून जलाऊ लाकडे जंगलातून आणून स्वयंपाक केले जाते. त्या वृक्षतोडीने पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे शासनाच्या वतीने अनुदानीत गॅस कनेक्शन वाटप होत आहे. इंधनासाठी गॅसचा वापर करून वृक्षतोड थांबवा, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले. अध्यक्षस्थानी सरपंच संजय राऊत होते. प्रमुख अतिथी म्हणून क्षेत्रसहायक व्ही.जे. दखने, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओमेश्वर संग्रामे, शीतल लाडे, परसराम जांभुळकर, रविंद्र मिसार व गणमान्य नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी सरपंच संजय राऊत यांनी, पर्यावरणाचे संतुलन टिकविण्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणे हे गावातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. इंधनासाठी गॅसचा वापर करून वृक्षतोड थांबविण्यासाठी त्यांनी आवाहन केले. या वेळी अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना २९ कनेक्शन तर इतर वर्गाला १८ असे एकूण ४७ गॅस कनेक्शन अनुदानावर वाटप करण्यात आले. संचालन पोलीस पाटील जयप्रकाश लाडे यांनी केले. आभार वन व्यवस्थापन समितीचे सचिव पी.एम. केळवतकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी वन व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)