शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

वनांचे संरक्षण व संवर्धन काळाची गरज

By admin | Updated: July 16, 2016 02:14 IST

जंगलतोड थांबवून वनांचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येकाचेच आद्यकर्तव्य आहे. सरकार वृक्ष लागवड करून व त्यांचे संगोपन करून

वृक्षतोड थांबवा : गॅस वाटप कार्यक्रम इसापूर : जंगलतोड थांबवून वनांचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येकाचेच आद्यकर्तव्य आहे. सरकार वृक्ष लागवड करून व त्यांचे संगोपन करून पर्यावरण संतुलीत राखण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन अर्जुनी-मोरगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी. रहांगडाले यांनी केले. ते खामखुरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी १३ जुलैला गॅस वाटप कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले, १ ते ७ जुलैपर्यंत शासनाने पर्यावरण संतुलन सप्ताह राबवून राज्यात २ कोटी वृक्ष लागवड केली आहे. त्यांचे संगोपन करणे आपले कर्तव्य आहे. आजघडीला ग्रामीण भागात इंधन म्हणून जलाऊ लाकडे जंगलातून आणून स्वयंपाक केले जाते. त्या वृक्षतोडीने पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे शासनाच्या वतीने अनुदानीत गॅस कनेक्शन वाटप होत आहे. इंधनासाठी गॅसचा वापर करून वृक्षतोड थांबवा, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले. अध्यक्षस्थानी सरपंच संजय राऊत होते. प्रमुख अतिथी म्हणून क्षेत्रसहायक व्ही.जे. दखने, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओमेश्वर संग्रामे, शीतल लाडे, परसराम जांभुळकर, रविंद्र मिसार व गणमान्य नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी सरपंच संजय राऊत यांनी, पर्यावरणाचे संतुलन टिकविण्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणे हे गावातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. इंधनासाठी गॅसचा वापर करून वृक्षतोड थांबविण्यासाठी त्यांनी आवाहन केले. या वेळी अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना २९ कनेक्शन तर इतर वर्गाला १८ असे एकूण ४७ गॅस कनेक्शन अनुदानावर वाटप करण्यात आले. संचालन पोलीस पाटील जयप्रकाश लाडे यांनी केले. आभार वन व्यवस्थापन समितीचे सचिव पी.एम. केळवतकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी वन व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)