शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

योग्य वापर व पाण्याची बचत हाच उपाय

By admin | Updated: May 28, 2016 01:50 IST

‘लोकमत’ समूहाने सामाजिक बांधिलकीतून संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू केलेल्या जलमित्र अभियानाला आता शहरासोबत ग्रामीण भागातूनही प्रतिसाद मिळत आहे.

पाणी जिरवा : मान्यवरांकडून ‘जलमित्र अभियाना’चे कौतुकगोंदिया : ‘लोकमत’ समूहाने सामाजिक बांधिलकीतून संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू केलेल्या जलमित्र अभियानाला आता शहरासोबत ग्रामीण भागातूनही प्रतिसाद मिळत आहे. पाण्याचे महत्व प्रत्येकाला कळण्यासाठी आणि जे लोक पाण्याची बचत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकमतचे हे पाऊल महत्वपूर्ण ठरणार, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.पाणी वाया घालवू नकापाण्याची टंचाई हा सर्वांसाठीच गंभीर प्रश्न होत आहे. आता पाणी वाया जाणार नाही यासाठी मोठे हॉटेल मालक, मोठे बंगले बांधणारे नागरिक यांनी पुढाकार घ्यावा. ग्रामीण भागातील विहीरी किंवा हातपंपाच्या जवळ खड्डा खोदून पाणी वाया जाणार नाही अशी व्यवस्था करावी. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीत मुरविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. लोकमतचे जलमित्र अभियान अत्यंत वाखाणण्याजोगे आहे. हे अभियान जिल्ह्यासाठी मैलाचा दगड ठरो, हीच शुभेच्छा.-डॉ. विजय सूर्यवंशी जिल्हाधिकारी, गोंदियापाणी हे जीवन आहे, ते वाचवाजि.प.कडून पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम राबविली जाते. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घ्यावा. पाणी बचत भविष्याचे जीवन फुलविणारी आहे. यासाठी लोकमतच्या उपक्रमाला नागरिकांनी हातभार लावावा, तसेच पाणी बचतीची कास धरावी.- उषाताई मेंढेजि.प. अध्यक्ष, गोंदिया.दुर्भिक्ष्य टाळण्यासाठी अत्यावश्यकपाण्यावाचून जीवन विनाशाकडे वाटचाल करेल. मराठवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. ही परिस्थिती आता हळूहळू सगळीकडे येत आहे. त्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे हा मार्ग प्रत्येकाने अवलंबणे आवश्यक आहे. ‘लोकमत’ने दिलेल्या दिशेचा समाजमनावर चांगला प्रभाव पडत आहे. भविष्याच्या सुखासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. - डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार मुख्य कार्यपालन अधिकारी, जि.प. गोंदिया- तर उद्या तहानच घेईल जीव आज पाणी वाया जाईल तर उद्या तहान जीव घेईल. यासाठी प्रत्येकाने ‘जल ही जीवन है’ या वाक्प्रचारातून अर्थबोध घ्यावा. दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत आहे. पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात आहे. परंतु पाण्याचा संचय होत नाही. पावसाचे पाणी वाया जाऊ नये यासाठी आता प्रत्येकाने ही चळवळ हातात घेऊन राष्ट्रीय कामात सहकार्य करायला हवे.-लीलाधर पाथोडेराज्य सहसचिव, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनावेळ आहे, आताच सावरागोंदिया जिल्ह्यात चांगला पाऊस पडतो. परंतु त्या पाण्याला संचय करून ठेवण्यासाठी नागरिकांनी वेळीच सावरले पाहिजे. अन्यथा एक दिवस पाणी जीव घेईल. लोकमचा उपक्रम दिशा देणारा आहे. मराठवाड्यासारखी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी पावसाचे पाणी जमीनीत कसे मुरविता येईल, यासाठी प्रयत्न करायला हवे.-मुकुंद धुर्वेसंवर्धन अधिकारी, सातपुडा फाऊंडेशन गोंदिया.दखल घेतली नाही तर पुढील पिढीचे मरणगोंदियासारख्या तलावांच्या जिल्ह्यात पाण्याची पातळी खालावली आहे. गावोगावचे छोटे तलाव नष्ट होत आहेत. हा संदेश बरेच काही सांगणारा आहे. त्यामुळे आताच सावध होणे गरजेचे आहे. लोकमतने त्यासाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. - तीर्थराज उकेविस्तार अधिकारी‘लोकमत’चे अभियान प्रेरणादायीगोंदिया शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यातच यापूर्वी कधीही जाणवले नाही एवढी पाणीटंचाई यावर्षी जाणवत आहे. यामागील कारण म्हणजे अनेक लोकांनी जमिनीत बोअरवेल खोदल्या आहेत. त्यामुळे ते लोक पाण्याचा वापरही अनियंत्रितपणे करतात. बोअरवेल किती खोदायच्या यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाचा स्वतंत्र विभाग असला तरी त्यांचे त्यावर नियंत्रण नाही. त्यामुळे वेळीच सावरले नाही तर मराठवाड्यासारखी स्थिती पुढील पाच वर्षानंतर गोंदियातही पहायला मिळेल. पाणी हे अमूल्य आहे. ते तयार करता येत नाही. त्याचे मोल सर्वांना जाणून काटकसरीने पाण्याचा वापर केला पाहीजे. आज शहराच्या मध्यवस्थीत नागरिकांच्या नळांना पुरेसे पाणी येत नाही. त्यामुळे खासगी टँकर लावून मी लोकांना पाणी पुरविण्याची व्यवस्था करीत आहे. पण केवळ पाणी पुरवठा करणे एवढाच माझा उद्देश नसून लोकांना पाण्याचे महत्व कळावे यासाठीही जनजागृती केली जात आहे. लोकमतचे जलमित्र अभियान खरंच प्रेरणादायी आहे. प्रत्येकाने या अभियात स्वत:ला झोकून द्यावे.- अशोक ऊर्फ गप्पू गुप्तानगरसेवक, गोंदिया