शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या कमी दाबाची समस्या सुटणार

By admin | Updated: April 8, 2017 00:44 IST

सततच्या नापिकी व दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी विजेच्या कमी दाबाचा जबरदस्त शॉक लागला आहे.

एस.एम.वाकडे : शेतकऱ्यांना दिलासा शेंडा (कोयलारी) : सततच्या नापिकी व दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी विजेच्या कमी दाबाचा जबरदस्त शॉक लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उन्हाळी धान पीक बऱ्याच अंशी नष्ट झाले आहे. अशातच ९ एप्रिलपासून पूर्ववत विजेचा पुरवठा केला जाईल असे आश्वासन उपविभागीय अभियंता एस.एम. वाकडे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. कर्जाचा बोजा व दुष्काळाच्या हानीतून बाहेर पडण्यासाठी या परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात आली. मात्र धान निसव्यावर येताना विजेच्या कमी दाबाने मोटारी सुरुच होत नाही. त्यामुळे धान पीक नष्ट होत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी वारंवार वीज विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन धानपिकाची समस्या मांडली. यावर तांत्रीक अडचण समोर करुन हात वर करण्यात आले. याची दखल घेऊन जि.प. सदस्य सरिता कापगते, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा उषा शहारे, विलास कापगते, पुतळीचे उपसरपंच कापगते, हेमराज कापगते, शेंड्याचे उपसरपंच छत्रपाल परतेकी, ग्रा.पं.सदस्य पुस्तोडे व शेकडो शेतकऱ्यांनी आधी कनिष्ठ अभियंता टेंभुर्णीकर व नंतर उपविभागीय अभियंता वाकडे यांच्याशी या समस्येवर चर्चा केली. यावर ९ एप्रिल पासून पूर्ववत विजेचा पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन अभियंता वाकडे यांनी शेतकऱ्यांना दिल्याचे सांगण्यात आले. तर भ्रमणध्वनीवरुन संपर्क केला असता कनिष्ठ अभियंता टेंभुर्णीकर यांनी डोंगरगाव, सालेधारणी व खुर्शीॅपार ही गावे डुग्गीपार फिडरवर टाकले आहेत. तसेच देवरी विभागातील २० गावे ककोडी फिडरवर टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. शेंडा परिसरातील सर्वच गावांना विज पुरवठा पूर्ववत सुरु होईल असे सांगीतले.(वार्ताहर)