शहरं
Join us  
Trending Stories
1
साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार?
2
मोठी बातमी! टेकऑफनंतर चीनजवळ गायब झाले रशियन विमान, ५० प्रवाशांचे काय झाले? जाणून घ्या...
3
११ वर्षाच्या मुलीवर ३७ वर्षापूर्वी केला होता अत्याचार; शिक्षाही झाली, पण सुप्रीम कोर्टाने आरोपीला आता ठरवलं अल्पवयीन
4
भीषण अपघात! मंडीमध्ये HRTC बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २० जण जखमी
5
कोणाला हवा सोनम-राजचा जामीन?, राजा रघुवंशी हत्याकांडात नवा ट्विस्ट; ४० लाखाबाबत खुलासा
6
निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी घेरलं; संसद भवनात 'जय महाराष्ट्र'ची घोषणा, लॉबीत काय घडलं?
7
'बिग बीं'पासून ते SRK पर्यंत अनेकांची गुंतवणूक, आता कंपनीचा येणार IPO; पाहा काय आहेत डिटेल्स?
8
१ कोटी कॅश, ७९ ATM कार्ड, ३० मोबाईल...; ऑनलाईन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश, १६ जणांना अटक
9
अनिल अंबानी ग्रुपवर ED ची कारवाई, ३००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ५० ठिकाणी छापे
10
चॉकलेट, कार, व्हिस्की...; FTA करारानंतर स्वस्त होणार 'या' वस्तू; पण इंग्लंडला काय फायदा होणार?
11
कुणाल खेमूच्या 'कलयुग'मधली रेणुका आठवतेय का? इंडस्ट्रीला केला रामराम अन् बनली पोल डान्सर
12
Janhvi Kapoor : कल्याणमधील तरुणीला मारहाणीचा व्हिडिओ बघून संतापली जान्हवी कपूर, म्हणाली....
13
Jivati Puja 2025 : जिवतीचा कागद अमावस्येला लावावा की श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी? वाचा व्रतविधी आणि माहिती!
14
दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक
15
हृदयद्रावक! वडिलांना चहा देऊन गेली अन्...; मासिक पाळीचा त्रास असह्य, मुलीने संपवलं आयुष्य
16
ऑनलाईन रमीच्या नादात शिक्षिका चोर बनली,बुरखा घालून ८ लाखांवर डल्ला मारला; चेहऱ्यावरील तीळामुळे सापडली
17
दौंड गोळीबार: आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना अटक; प्रकरण अखेर बाहेर आलेच...
18
आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाहीत; RBI नं रद्द केला या बँकेचा लायसन्स, पुढे काय होणार?
19
‘ती’ मुलगी घरातच ठरली असुरक्षित; वडील, भावांसह चौघांचा ११ महिने लैंगिक अत्याचार
20
गुरुपुष्यामृतयोगात श्रावणारंभ: श्रावणी सोमवारी शिवामूठ कशी वाहावी? योग्य पद्धत, दानमहात्म्य

विजेच्या कमी दाबाची समस्या सुटणार

By admin | Updated: April 8, 2017 00:44 IST

सततच्या नापिकी व दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी विजेच्या कमी दाबाचा जबरदस्त शॉक लागला आहे.

एस.एम.वाकडे : शेतकऱ्यांना दिलासा शेंडा (कोयलारी) : सततच्या नापिकी व दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी विजेच्या कमी दाबाचा जबरदस्त शॉक लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उन्हाळी धान पीक बऱ्याच अंशी नष्ट झाले आहे. अशातच ९ एप्रिलपासून पूर्ववत विजेचा पुरवठा केला जाईल असे आश्वासन उपविभागीय अभियंता एस.एम. वाकडे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. कर्जाचा बोजा व दुष्काळाच्या हानीतून बाहेर पडण्यासाठी या परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात आली. मात्र धान निसव्यावर येताना विजेच्या कमी दाबाने मोटारी सुरुच होत नाही. त्यामुळे धान पीक नष्ट होत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी वारंवार वीज विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन धानपिकाची समस्या मांडली. यावर तांत्रीक अडचण समोर करुन हात वर करण्यात आले. याची दखल घेऊन जि.प. सदस्य सरिता कापगते, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा उषा शहारे, विलास कापगते, पुतळीचे उपसरपंच कापगते, हेमराज कापगते, शेंड्याचे उपसरपंच छत्रपाल परतेकी, ग्रा.पं.सदस्य पुस्तोडे व शेकडो शेतकऱ्यांनी आधी कनिष्ठ अभियंता टेंभुर्णीकर व नंतर उपविभागीय अभियंता वाकडे यांच्याशी या समस्येवर चर्चा केली. यावर ९ एप्रिल पासून पूर्ववत विजेचा पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन अभियंता वाकडे यांनी शेतकऱ्यांना दिल्याचे सांगण्यात आले. तर भ्रमणध्वनीवरुन संपर्क केला असता कनिष्ठ अभियंता टेंभुर्णीकर यांनी डोंगरगाव, सालेधारणी व खुर्शीॅपार ही गावे डुग्गीपार फिडरवर टाकले आहेत. तसेच देवरी विभागातील २० गावे ककोडी फिडरवर टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. शेंडा परिसरातील सर्वच गावांना विज पुरवठा पूर्ववत सुरु होईल असे सांगीतले.(वार्ताहर)