शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

जनता दरबारातून जाणल्या समस्या ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:02 IST

अर्जुनी : अर्जुनी - मोरगाव ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होऊन पाच वर्षे झाली. कोरोना महामारीमुळे नगरपंचायत वर प्रशासकराज आहे. शहरात ...

अर्जुनी : अर्जुनी - मोरगाव ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होऊन पाच वर्षे झाली. कोरोना महामारीमुळे नगरपंचायत वर प्रशासकराज आहे. शहरात घरकूल, आरोग्य, शौचालय, विविध मूलभूत सुविधा, अंगणवाडी दुरुस्ती, घरकूल भूखंड वाटप, पाणीपुरवठा यासारख्या समस्या आवासून उभ्या आहेत.

या समस्यांना मार्गी लावण्यासाठी आ. चंद्रिकापुरे यांनी जनता दरबाराचे आयोजन नगरपंचायत भवनात केले. या वेळी नगरपंचायत मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव, प्रशासकीय अधिकारी अमोल जाधव, सुशांत अरु, प्रफुल गाबैल उपस्थित होते. सिंगल टोली आणि बरड टोली येथील नागरिकांना अतिक्रमणाच्या जाचक अटीमुळे घरकूल योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. ग्रामपंचायत काळात याच परिसरातील नागरिकांना घरकुलांचा लाभ मिळाला. मात्र नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले आणि नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळणे बंद झाले. या रहिवाशांना घरकुलांचा लाभ देण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश आमदारांनी दिले. यावेळी उपस्थित नागरिकांनी आमदारांसमोर स्थानिक समस्यांचा पाढा वाचला. आमदारांनी घरकूल, प्रधानमंत्री आवास योजना, भुखंडाचे, प्रलंबित वनहक्क पट्टे संदर्भात त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्याधिकारी जाधव यांना दिले. जिल्हा सचिव राकेश जायस्वाल, शहर अध्यक्ष महेंद्र शहारे, आर.के. जांभुळकर, माजी नगरसेविका प्रज्ञा गणवीर, नाना शहारे, नगरातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.