शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

समस्यांनी ग्रस्त दवनीवाडा अविकसितच

By admin | Updated: May 30, 2015 01:20 IST

इंग्रजांच्या राजवटीत जिल्ह्यातून सर्वात मोठे गाव दवनीवाडा होते. त्या काळात पोलीस ठाणे, जनपद काळातील शाळा व ग्रामपंचायत असूनही हे गाव आज अविकसितच आहे.

गोंदिया : इंग्रजांच्या राजवटीत जिल्ह्यातून सर्वात मोठे गाव दवनीवाडा होते. त्या काळात पोलीस ठाणे, जनपद काळातील शाळा व ग्रामपंचायत असूनही हे गाव आज अविकसितच आहे. कोणत्याही प्रकारे विकास झाला नसून त्याकडे राजकीय पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे अनेक समस्यांशी आजही हे गाव झुंझ देत आहे.मागील ३० वर्षांपासून दवनीवाडा जिल्हा परिषद क्षेत्र होते. परंतु जिल्हा परिषदेत ५२ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र वाढविण्यात आले. दवनीवाडा क्षेत्र तोडून नव्याने धापेवाडा जिल्हा परिषद क्षेत्र बनविण्यात आले. तर दवनीवाडाला रतनारा जिल्हा परिषद क्षेत्र नाव देण्यात आले. दवनीवाडा क्षेत्रातील वळद, खातीटोला, झाडुटोला हे गाव कमी करण्यात आले होते. परंतु दवनीवाडा येथील काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदारांसह जिल्हाधिकाऱ्यांना केवळ वळद गावाला दवनीवाडा क्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी केली. यात जिल्हाधिकाऱ्यांनी दवनीवाडा क्षेत्रात समाविष्ट गाव महालगाव, मुरदाडा, लोधीटोला, धापेवाडा, नवेगाव, देवरी मिळून धापेवाडाला वेगळे जिल्हा परिषद क्षेत्र केले. तर दवनीवाडा जुने क्षेत्र असून रतनारा या मोठ्या गावाला त्यात समाविष्ट करून रतनारा गावाला वेगळे जि.प. क्षेत्र बनविण्यात आले. येणाऱ्या जि.प. व पं.स. निवडणुकीत दवनीवाडा क्षेत्र बदलले. त्यामुळे सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. त्यात सांगण्यात आले की, दवनीवाडा क्षेत्र बदलून रतनारा नावाने दिलेल्या क्षेत्रात दवनीवाडा गावाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे हे गाव विविध योजनांपासून वंचित राहणार काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणाचा बहिष्कार करू, असे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले. मात्र तेच आता एकीकडे बहिष्कार तर दुसरीकडे जि.प. महिला राखीव उमेवारीसाठी गावोगावी फिरत आहेत. दवनीवाडा येथे राकाँ, काँग्रेसकडून जि.प. महिला उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांचे सोंग पुढे येत आहे.तिरोडा व गोंदिया या दोन्ही तालुक्यांच्या मध्यभागी दवनीवाडा गाव असून गोंदिया तालुक्यात मोडते. विधानसभा क्षेत्र तिरोडा असून संभावित नवनिर्माण दवनीवाडा तालुक्यात तिरोडा-गोंदिया तालुक्यातील एकूण ६५ गावांचा समावेश राहणार आहे. येथे २५ वर्षांपूर्वी तालुका निर्माण समिती गठित करण्यात आली. यात अध्यक्ष आसाराम कटरे, सचिव जे.बी. मंद्रेले, डॉ. ललन पांडे, मुन्नालाल चौधरी, विष्णू दोनोडे, शफी शेख, टेकचंद लिल्हारे, माधोराव भोयर आदींचा समावेश होता. सदर समितीमार्फत विधानसभेत दवनीवाडाला तालुका बनविण्याचा नियमित पाठपुरावा केला. मुख्यमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री तसेच शासनाचे सचिव यांनी दवनीवाडाला तालुका बनविण्याच्या मागणीला सिफारस देवून सहमती दर्शविली. परंतु काही वर्षांपूर्वी समितीचे अध्यक्ष, सचिव व सहसचिव यांचा मृत्यू झाल्यानंतर नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली नाही. नवीन अध्यक्ष, सचिव व सदस्य केवळ कागदोपत्री मर्यादित आहेत. त्यामुळे सदर समितीच आता मृतावस्थेत दिसून येत आहे. त्यामुळे तालुका बनविण्याच्या मागणीलाच विराम लागल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)