शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांनी ग्रस्त दवनीवाडा अविकसितच

By admin | Updated: May 30, 2015 01:20 IST

इंग्रजांच्या राजवटीत जिल्ह्यातून सर्वात मोठे गाव दवनीवाडा होते. त्या काळात पोलीस ठाणे, जनपद काळातील शाळा व ग्रामपंचायत असूनही हे गाव आज अविकसितच आहे.

गोंदिया : इंग्रजांच्या राजवटीत जिल्ह्यातून सर्वात मोठे गाव दवनीवाडा होते. त्या काळात पोलीस ठाणे, जनपद काळातील शाळा व ग्रामपंचायत असूनही हे गाव आज अविकसितच आहे. कोणत्याही प्रकारे विकास झाला नसून त्याकडे राजकीय पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे अनेक समस्यांशी आजही हे गाव झुंझ देत आहे.मागील ३० वर्षांपासून दवनीवाडा जिल्हा परिषद क्षेत्र होते. परंतु जिल्हा परिषदेत ५२ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र वाढविण्यात आले. दवनीवाडा क्षेत्र तोडून नव्याने धापेवाडा जिल्हा परिषद क्षेत्र बनविण्यात आले. तर दवनीवाडाला रतनारा जिल्हा परिषद क्षेत्र नाव देण्यात आले. दवनीवाडा क्षेत्रातील वळद, खातीटोला, झाडुटोला हे गाव कमी करण्यात आले होते. परंतु दवनीवाडा येथील काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदारांसह जिल्हाधिकाऱ्यांना केवळ वळद गावाला दवनीवाडा क्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी केली. यात जिल्हाधिकाऱ्यांनी दवनीवाडा क्षेत्रात समाविष्ट गाव महालगाव, मुरदाडा, लोधीटोला, धापेवाडा, नवेगाव, देवरी मिळून धापेवाडाला वेगळे जिल्हा परिषद क्षेत्र केले. तर दवनीवाडा जुने क्षेत्र असून रतनारा या मोठ्या गावाला त्यात समाविष्ट करून रतनारा गावाला वेगळे जि.प. क्षेत्र बनविण्यात आले. येणाऱ्या जि.प. व पं.स. निवडणुकीत दवनीवाडा क्षेत्र बदलले. त्यामुळे सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. त्यात सांगण्यात आले की, दवनीवाडा क्षेत्र बदलून रतनारा नावाने दिलेल्या क्षेत्रात दवनीवाडा गावाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे हे गाव विविध योजनांपासून वंचित राहणार काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणाचा बहिष्कार करू, असे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले. मात्र तेच आता एकीकडे बहिष्कार तर दुसरीकडे जि.प. महिला राखीव उमेवारीसाठी गावोगावी फिरत आहेत. दवनीवाडा येथे राकाँ, काँग्रेसकडून जि.प. महिला उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांचे सोंग पुढे येत आहे.तिरोडा व गोंदिया या दोन्ही तालुक्यांच्या मध्यभागी दवनीवाडा गाव असून गोंदिया तालुक्यात मोडते. विधानसभा क्षेत्र तिरोडा असून संभावित नवनिर्माण दवनीवाडा तालुक्यात तिरोडा-गोंदिया तालुक्यातील एकूण ६५ गावांचा समावेश राहणार आहे. येथे २५ वर्षांपूर्वी तालुका निर्माण समिती गठित करण्यात आली. यात अध्यक्ष आसाराम कटरे, सचिव जे.बी. मंद्रेले, डॉ. ललन पांडे, मुन्नालाल चौधरी, विष्णू दोनोडे, शफी शेख, टेकचंद लिल्हारे, माधोराव भोयर आदींचा समावेश होता. सदर समितीमार्फत विधानसभेत दवनीवाडाला तालुका बनविण्याचा नियमित पाठपुरावा केला. मुख्यमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री तसेच शासनाचे सचिव यांनी दवनीवाडाला तालुका बनविण्याच्या मागणीला सिफारस देवून सहमती दर्शविली. परंतु काही वर्षांपूर्वी समितीचे अध्यक्ष, सचिव व सहसचिव यांचा मृत्यू झाल्यानंतर नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली नाही. नवीन अध्यक्ष, सचिव व सदस्य केवळ कागदोपत्री मर्यादित आहेत. त्यामुळे सदर समितीच आता मृतावस्थेत दिसून येत आहे. त्यामुळे तालुका बनविण्याच्या मागणीलाच विराम लागल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)