शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया तालुक्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:31 IST

रावणवाडी : तालुक्यातील अनेक गावांतील सार्वजनिक बोअरवेल बंद पडल्या आहेत, तर गावातील विहिरी कोरड्या पडल्या असल्याने, भीषण पाणीटंचाईची समस्या ...

रावणवाडी : तालुक्यातील अनेक गावांतील सार्वजनिक बोअरवेल बंद पडल्या आहेत, तर गावातील विहिरी कोरड्या पडल्या असल्याने, भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी, गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.

सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. अशातच मागील पंधरा दिवसांपासून तालुक्यात टायफाइड आजाराची साथ सुरू आहे, तर दुसरीकडे गावकऱ्यांना सध्या पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तालुक्यातील बऱ्याच गावांमधील सार्वजनिक बोअरवेल बंद आहेत, तर गावातील विहिरींनी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तळ गाठला आहे. त्यामुळे महिलांना सकाळपासूनच पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. काही गावांतील नागरिक शेतातील विहिरीचे पाणी आणून आपली तहान भागवित आहे. मात्र, काही ठिकाणी दूषित स्रोतांचे पाणी पित असल्याने, गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले, तर काही गावांमध्ये सध्या कोरोनासह टायफाइड आजाराची साथ सुरू आहे. त्यामुळे एकाच वेळी गावकऱ्यांना पाणीटंचाई आणि साथरोग अशा दोन्ही संकटांना तोंड द्यावे लागत आहे. बंद पडलेले बोअरवेल अद्यापही सुरू करण्यासाठी पंचायत समितीच्या तांत्रिक विभागाने अद्यापही कुठलेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे गावात पाणीटंचाईची समस्या कायम असून, महिलांची पाण्यासाठी पायपीट कायम आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.