शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

गोंदिया तालुक्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:31 IST

रावणवाडी : तालुक्यातील अनेक गावांतील सार्वजनिक बोअरवेल बंद पडल्या आहेत, तर गावातील विहिरी कोरड्या पडल्या असल्याने, भीषण पाणीटंचाईची समस्या ...

रावणवाडी : तालुक्यातील अनेक गावांतील सार्वजनिक बोअरवेल बंद पडल्या आहेत, तर गावातील विहिरी कोरड्या पडल्या असल्याने, भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी, गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.

सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. अशातच मागील पंधरा दिवसांपासून तालुक्यात टायफाइड आजाराची साथ सुरू आहे, तर दुसरीकडे गावकऱ्यांना सध्या पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तालुक्यातील बऱ्याच गावांमधील सार्वजनिक बोअरवेल बंद आहेत, तर गावातील विहिरींनी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तळ गाठला आहे. त्यामुळे महिलांना सकाळपासूनच पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. काही गावांतील नागरिक शेतातील विहिरीचे पाणी आणून आपली तहान भागवित आहे. मात्र, काही ठिकाणी दूषित स्रोतांचे पाणी पित असल्याने, गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले, तर काही गावांमध्ये सध्या कोरोनासह टायफाइड आजाराची साथ सुरू आहे. त्यामुळे एकाच वेळी गावकऱ्यांना पाणीटंचाई आणि साथरोग अशा दोन्ही संकटांना तोंड द्यावे लागत आहे. बंद पडलेले बोअरवेल अद्यापही सुरू करण्यासाठी पंचायत समितीच्या तांत्रिक विभागाने अद्यापही कुठलेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे गावात पाणीटंचाईची समस्या कायम असून, महिलांची पाण्यासाठी पायपीट कायम आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.