शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
2
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
3
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
4
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
5
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
6
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
7
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
8
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
9
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
10
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
11
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
12
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
13
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
14
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
15
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
16
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
17
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
19
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
20
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
Daily Top 2Weekly Top 5

शांती व सलोख्यासह विधायक कार्याला प्राधान्य

By admin | Updated: September 11, 2015 02:10 IST

गावकऱ्यांनी एकमेकाबद्दलची हाडवैराची भूमिका स्वीकारू नये. लहान-मोठ्या कारणांवरून होणाऱ्या भांडणाला वाव न देता सृजनशीलता ...

बोंडगावदेवी : गावकऱ्यांनी एकमेकाबद्दलची हाडवैराची भूमिका स्वीकारू नये. लहान-मोठ्या कारणांवरून होणाऱ्या भांडणाला वाव न देता सृजनशीलता अंगिकारून गावातील वाद गावातच मिटविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीकडे धाव घेऊन सामोपचाराने तंट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. गावात शांती व सलोखा निर्मिती करण्याबरोबरच गावातील समस्या मार्गी लावण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार, अशी ग्वाही तंमुसचे अध्यक्ष तुळशीदास बोरकर यांनी दिली. येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाल्यानंतर ग्रामपंचायतच्या सभागृहात झालेल्या पहिल्या बैठकीत पदग्रहण केल्यानंतर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तुुळशीदास बोरकर होते. याप्रसंगी समितीचे जेष्ठ पदाधिकारी सरपंच राधेश्याम झोळे, उपसरपंच वैशाली मानकर, निमंत्रक पोलीस पाटील मंगला रामटेके, माजी अध्यक्ष डॉ. शामकांत नेवारे, मु.धो. मानकर, भिवाजी शहारे, कुकसू मेश्राम, शेवंता मानकर, ग्रामसेवक एल.एम. ब्राम्हणकर, पतीराम मेश्राम उपस्थित होते. बोरकर पुढे म्हणाले, गावातील तंटे गावाबाहेर न जाता गावामध्ये सामोपचाराने निराकरण करून गावात शांतता कायम राहण्यासाठी सदस्यांनी सहकार्य करावे. न्यायनिवाडा प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रथम प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. येत्या काही दिवसांत येणाऱ्या पोळा, गणपती उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, भाऊबंदकी व एकोप्याने उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. काही असामाजिक तत्त्वांवर पायबंद घालण्यासाठी सामाजिक सुरक्षा दलाची नेमणूक करण्यासाठी युवकांनी पुढे यावे. गावात शांतता तसेच सलोखा वातावरण निर्मिती तंमुस प्रयत्न करेल, अशी ग्वाही देऊन संबंधिताना निवेदन देऊन समस्या मार्गी लावण्याला प्राधान्य देण्यात येईल. येथील आरोग्य केंद्रात, जि.प. आयुर्वेदिक दवाखान्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून डॉक्टर नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. डॉक्टरांच्या पूर्ततेसाठी तंमुसच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले जाईल, असे बोरकर यांनी सांगितले. बैठकीला तंमुसचे अमरचंद ठवरे, संतोष टेंभुणेर, साधू मेश्राम, कृष्णा खंडाईत, अनिरूध्द रामटेके, द्वारका भैसारे, विजया मानकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)वजने झाली गायबतिरोडा : प्रत्येक आठवडी बाजारातून आता वजने गायब झाली आहेत. त्याऐवजी चक्क दगड, आलू, कांदे आदी जिन्नसांचा वापर वजन म्हणून केला जात आहे. यामुळे ग्राहकांची आर्थिक लुबाडणूक होत आहे.