शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

शांती व सलोख्यासह विधायक कार्याला प्राधान्य

By admin | Updated: September 11, 2015 02:10 IST

गावकऱ्यांनी एकमेकाबद्दलची हाडवैराची भूमिका स्वीकारू नये. लहान-मोठ्या कारणांवरून होणाऱ्या भांडणाला वाव न देता सृजनशीलता ...

बोंडगावदेवी : गावकऱ्यांनी एकमेकाबद्दलची हाडवैराची भूमिका स्वीकारू नये. लहान-मोठ्या कारणांवरून होणाऱ्या भांडणाला वाव न देता सृजनशीलता अंगिकारून गावातील वाद गावातच मिटविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीकडे धाव घेऊन सामोपचाराने तंट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. गावात शांती व सलोखा निर्मिती करण्याबरोबरच गावातील समस्या मार्गी लावण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार, अशी ग्वाही तंमुसचे अध्यक्ष तुळशीदास बोरकर यांनी दिली. येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाल्यानंतर ग्रामपंचायतच्या सभागृहात झालेल्या पहिल्या बैठकीत पदग्रहण केल्यानंतर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तुुळशीदास बोरकर होते. याप्रसंगी समितीचे जेष्ठ पदाधिकारी सरपंच राधेश्याम झोळे, उपसरपंच वैशाली मानकर, निमंत्रक पोलीस पाटील मंगला रामटेके, माजी अध्यक्ष डॉ. शामकांत नेवारे, मु.धो. मानकर, भिवाजी शहारे, कुकसू मेश्राम, शेवंता मानकर, ग्रामसेवक एल.एम. ब्राम्हणकर, पतीराम मेश्राम उपस्थित होते. बोरकर पुढे म्हणाले, गावातील तंटे गावाबाहेर न जाता गावामध्ये सामोपचाराने निराकरण करून गावात शांतता कायम राहण्यासाठी सदस्यांनी सहकार्य करावे. न्यायनिवाडा प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रथम प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. येत्या काही दिवसांत येणाऱ्या पोळा, गणपती उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, भाऊबंदकी व एकोप्याने उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. काही असामाजिक तत्त्वांवर पायबंद घालण्यासाठी सामाजिक सुरक्षा दलाची नेमणूक करण्यासाठी युवकांनी पुढे यावे. गावात शांतता तसेच सलोखा वातावरण निर्मिती तंमुस प्रयत्न करेल, अशी ग्वाही देऊन संबंधिताना निवेदन देऊन समस्या मार्गी लावण्याला प्राधान्य देण्यात येईल. येथील आरोग्य केंद्रात, जि.प. आयुर्वेदिक दवाखान्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून डॉक्टर नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. डॉक्टरांच्या पूर्ततेसाठी तंमुसच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले जाईल, असे बोरकर यांनी सांगितले. बैठकीला तंमुसचे अमरचंद ठवरे, संतोष टेंभुणेर, साधू मेश्राम, कृष्णा खंडाईत, अनिरूध्द रामटेके, द्वारका भैसारे, विजया मानकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)वजने झाली गायबतिरोडा : प्रत्येक आठवडी बाजारातून आता वजने गायब झाली आहेत. त्याऐवजी चक्क दगड, आलू, कांदे आदी जिन्नसांचा वापर वजन म्हणून केला जात आहे. यामुळे ग्राहकांची आर्थिक लुबाडणूक होत आहे.