शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:30 IST

इसापूर : कोरोना संक्रमणामुळे देशात व राज्यात आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. मागील वर्षभरापासून अनेकांचा रोजगार हिरावला आहे. कारखान्यात ...

इसापूर : कोरोना संक्रमणामुळे देशात व राज्यात आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. मागील वर्षभरापासून अनेकांचा रोजगार हिरावला आहे. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची नोकरी गेल्याने त्यांना घरी बसण्याची वेळ आली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून बचत केलेले पैसेसुद्धा शिल्लक राहिले नाहीत.

महिलांनी बचत केलेले पैसे व बँकेत जमा असलेले पैसे काढून दैनंदिन व्यवहार करत आहेत. पण सद्य:स्थितीत बचत केलेले पैसे व बँकेत जमा असलेले पैसेसुद्धा शिल्लक नसल्याने दैनंदिन व्यवहार कसा करावा, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. हाताला रोजगार नाही, गळ्याला गाठी व हाताला माती नाही अशी अवस्था सर्वसामान्य नागरिकांची झाली आहे. शासनाने व लोकप्रतिनिधींनी कोरोना काळात नागरिकांना काम नाही म्हणून तीन महिने रेशन कार्डवर धान्य दिले. तर मागील एक वर्षापासून पेट्रोल व डिझेलवर महिना पंधरा दिवसांत २-२ रुपये वाढ करून पेट्रोलचे दर प्रति लीटर १०० रुपयांवर गेले आहेत. सत्तेत असलेले लोकप्रतिनिधी व विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी स्वयंपाकाच्या गॅसचे दर व डिझेल, पेट्रोलची भाववाढ झाल्याचे सांगत आहेत. मात्र या भाववाढीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्यास तयार नाहीत. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे संसाराचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

.....

खाद्य तेलाचे दर १६० रुपये प्रति लीटर

दैनंदिन वापरात येणाऱ्या खाद्य तेलाचे भाव नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात ७० रुपये होते. ते भाव आज १६०-१७० रुपये प्रति लीटर झाले आहेत. पूर्वी खाद्य तेलाचे एक टिन १२००-१३०० रुपयांना मिळत होते. त्याला आज २१०० रुपये मोजावे लागत आहेत. वाढत्या महागाईच्या विरोधात बोलण्यास शासन व विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या तोंडून एकही शब्द निघत नाही.

......

गॅस सिलिंडरच्या दराने बिघडले बजेट

कोरोना संक्रमणामुळे मागील एक वर्षापासून केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक होते, पण तसे केले नाही. उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत केंद्र सरकारने १०० रुपयांत महिलांना सिलिंडर देऊन स्वत:ची वाहवा करून घेतली. पण गॅस सिलिंडरचे दर ९०० रुपयांवर पोहोचले आहेत. गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने महिला स्वयंपाकासाठी गॅसचा वापर न करता चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहेत. तर गृहिणींचे बजेट बिघडले असून खर्चाचा ताळमेळ जुळविताना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे.