शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

रब्बीतील धानाला कवडीमोल भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:29 IST

रावणवाडी : रब्बी हंगामातील धानाची विक्री करण्यासाठी अद्याप परिसरात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकरी ...

रावणवाडी : रब्बी हंगामातील धानाची विक्री करण्यासाठी अद्याप परिसरात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना धान विकत असून, व्यापारी कवडीमोल भाव देऊन त्यांची अक्षरश: आर्थिक लूट करीत आहेत.

सिंचनाच्या सोयी असलेल्या शेतकऱ्यांनी खरिपाला पर्याय म्हणून रब्बी हंगामात धानपिकाची लागवड केली. या धानाची काही दिवसांपूर्वी कापणी झाली असून बहुतेक शेतकऱ्यांनी मळणीसुद्धा केली आहे. परंतु अजूनही शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू होण्याचा मार्ग दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक अडचण लक्षात घेऊन खासगी व्यापाऱ्यांना धान विकणे सुरू केले आहे. व्यापारी शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेऊन प्रति क्विंटल १४०० रुपये भाव देऊन शेतकऱ्यांची अक्षरश: आर्थिक लूट करीत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, शेतकऱ्यांना या रकमेतून कर्जाची परतफेड अन्‌ दैनंदिन खर्च करणे कठीण झाले आहे. दरम्यान, खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कोट

खरिपातील विकलेल्या धानाची रक्कम वेळेत मिळाली नाही. त्यामुळे बँकेचे कर्ज निर्धारित वेळेत भरता आले नाही. परिणामी, अधिक व्याज द्यावे लागणार आहे. याचाही फटका बसणार आहे.

प्रभु लिल्हारे, शेतकरी रावणवाडी

शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे अद्याप सुरू झाली नाहीत. त्यामुळे आम्हाला खासगी व्यापाऱ्यांना धान विकावे लागत आहे. हे व्यापारी अल्प भाव देऊन आर्थिक लूट करीत आहेत. त्यामुळे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे लवकर सुरू होणे गरजेचे आहे.

सोहिद कोहारे, मुरपार