शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांची किंमत ठरतेय वजनावर

By admin | Updated: May 31, 2015 00:47 IST

काही वर्षापूर्वी जनावरांची किमत ही दुधावर आणि त्यांच्या जातीवरुन ठरत होती.

कत्तलीसाठी विक्री : शेकडो जनावरे बाजारातून कत्तलखान्याकडे; दलालांची कमाईगोंदिया : काही वर्षापूर्वी जनावरांची किमत ही दुधावर आणि त्यांच्या जातीवरुन ठरत होती. पण सध्या तीच किंमत आता जनावरांच्या वजनावरून ठरत असल्याने पालनाऐवजी कत्तलीसाठी जनावरांची खरेदी होत असल्याचे चित्र दिसून येते.एखाद्या गाईला वासरु झाल्यानंतर त्याच दिवशी त्या गावातील एखादा दलाल येऊन वासरू देणारा का, असा प्रश्न शेतकऱ्याला विचारतो. शेतकरीही या निरुपयोगी प्राण्यास दररोज किमान दोन लिटर दूध घालण्याऐवजी देऊन टाकतो. याचे कारण म्हणजे किमान दोन महिने याला दूध घातल्यास पाच हजार रुपयांचे नुकसान होणार, शिवाय वैरण व इतर खर्च वेगळा. असा विचार करुन तो ते लहान वासरु दलालाला देतो. तो दलाल अशी चार-पाच वासरे जमा करुन कसायाला विकतो. असे या कसायाचे गावोगावी जाळे पसरले आहे.सध्या जनावरांच्या मांसाला चांगली किंमत व मुबलक मागणी असल्याने भाकड जनावरांसह दुधाळ आणि गाभण जनावरे कत्तलखान्याकडे जात आहेत. यावरुन मोठ्या शहरात किती जनावरे लागत असतील, याची कल्पना न करणे बरे. दर आठवड्याला प्रत्येक बाजारातून शेकडो जनावरे कत्तलखान्याकडे जात आहेत. बाजारात जास्तीत जास्त धष्ठपुष्ठ असणाऱ्या जनावरांवर या व्यापाऱ्यांचा डोळा असतो. मग ते जनावर गाभण असले तरी कापण्यासाठी नेले जाते. एखाद्या जनावराची किमत तिचे दूध पाहता १५ हजार असेल तर तेच जनावर कत्तलखान्यासाठी तीन हजार रुपयांत खरेदी केले जाते. त्यात जनावरांचे मांस, हाडे, चरबी, चमडे याची किंमत एकत्रित केली असता त्याची किंमत ६० हजार होते. म्हणजे जनावराची किंमत चौपट होते. एक जनावर कमीत कमी चाळीस किलो ते सहाशे किलोपर्यंत वजनाचे असते. त्यामुळे किमत दीड लाखांपर्यंत जाते. एखाद्या चांगल्या जनावरांची किंमत देऊन ते घेण्यासाठी शेतकरी असमर्थ आहे. तर एकीकडे जनावराला अधिक किमत येत असल्याने आनंदाने विकणारा शेतकरीच आहे.त्यामुळे जनावरांची संख्या रोडावत चालली आहे. शासनाने कत्तलखान्यांवर निर्बंध घालणे आवश्यक आहे. गाभण, दुध देणारे जनावर कापण्यावर दंड आकारणे गरजेचे आहे. तर कत्तलखाने चालविणाऱ्यांनी उपयोगी जनावरे न घेता केवळ भाकड व निरुपयोगी अशी जनावरे खरेदी करावीत. अशी सक्त ताकीद या दलालांना देण्यात यावी. (तालुका प्रतिनिधी)