शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

प्रबोधनाला साहित्याचा जोर, फुलला काव्याचा गुलमोहर

By admin | Updated: February 9, 2016 01:35 IST

परिवर्तनशील साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात शनिवारी दुपारी कवी संमेलन साजरे झाले.

युवा वर्गाचा सहभाग : कवी व साहित्यिकांची हजेरीबाराभाटी : परिवर्तनशील साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात शनिवारी दुपारी कवी संमेलन साजरे झाले. त्यावेळी अध्यक्ष हरिश्चंद्र लाडे, डॉ. नूरजहा पठान, प्रा. मिलिंद रंगारी व अनिल मेश्राम यांच्या उपस्थितीत राज्याभरातील कवींनी हजेरी लावली. यामध्ये जास्तीत जास्त युवा कवींचा सहभाग होता. यावेळी नागपूरचे प्रा. प्रवीण कावळे, प्रकाश कावळे, जगदिश राऊत, सुरेश वंजारी, शीला आठवले, प्रा. मंगेश जनबंधू, डॉ. गुलाब मुळे, एकनाथ बुध्दे, सिध्दार्थ वालदे, रोशन पिल्लेवान, संजय सायरे, दिगांबर चनकापुरे, पुरूषोत्तम डोंगरे, सुरेश करणासे, करूणा मून, अस्मिता मेश्राम, अहल्या रंगारी, पांडुरंग नंदागवळी, नामदेश कानेकर, मनोज बोरकर, प्रकाश गायकवाड, शैलेंद्र बोरकर, नंदकुमार खोब्रागडे, सरिता रामटेके, के.ए. रंगारी असे अनेक कवी उपस्थित होते. त्यांनी प्रेम, शेतकऱ्यांच्या व्यथा, माय-आई आणि चळवळीच्या संदर्भात चारोळी, कविता सादर केल्या. मिळाली राजगादी तुम्हाला नाही बहुजनांचा राजा, माय-बाप आपला झालाहा बाबासाहेब समजा... जीव भाटतया...तिथेच ओवावा धागाग,बाई दुखाच्या कष्टाने लिपाव्या भेगा ग...त्याचप्रमाणे मुलांसाठी पाळणासुध्दा गायला. अशा विविध विषयांच्या कविता ऐकवून पिंपळगाववासीयांना मंत्रमुग्ध केले. कविसंमेलनाचे संचालन प्रा. रेवाराम खोब्रागडे यांनी केले. आभार मुन्नाभाई नंदागवळी यांनी मानले. कविसंमेलनामध्ये प्रबोधन करणाऱ्या कविता, व्यथा दु:ख, वेदना, आई तर मनमोहक बेधुंद असणारे प्रेम या विषयांवर कवितांच्या सादरीकरणाने काव्य गुलमोहर बहरला.-हरिश्चंद्र लाडे, कवी, पालांदूर (भंडारा)मी शिक्षण घेताना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडल्या जाण्याचे कारण असे की, माझा अभ्यास, चळवळीच्या खाणा-खुणा, मी सहन केलेल्या वेदना व्यथा, आमच्या समाजातील सामान्य जनतेचे दु:ख, वेदना आणि चळवळीची स्थिती याची मुख्य कारणे आहेत. सामाजिक नीतिमूल्ये रुजवताना मी साहित्यातून, विचारातून व्यक्त करून आम्ही परिवर्तन नक्कीच घडवून आणणार. हे काम फक्त तरूणच करू शकतात. जागा हो, तरूणा जागा हो.प्रा. वैशाली रामटेके, साहित्यिक, संमेलनाध्यक्ष.