शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसली वीज वितरण कंपनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:20 IST

गोरेगाव : एकीकडे रब्बीचे धान पीक विक्रीसाठी शेतकरी आधारभूत धान खरेदी केंद्राचे चकरा मारत आहे. यातच खरीप हंगामातील धानाची ...

गोरेगाव : एकीकडे रब्बीचे धान पीक विक्रीसाठी शेतकरी आधारभूत धान खरेदी केंद्राचे चकरा मारत आहे. यातच खरीप हंगामातील धानाची चुकारे व बोनस अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाही. यातच वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती कशी करावी असा प्रश्न तालुक्यातील व हिरापूर येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

तालुक्यात सध्या शेतकऱ्यांनी थकीत आणि चालू बिल भरले नसल्यामुळे वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यातच हिरापूर येथील काही शेतकऱ्यांचे चालू वीज बिल भरले नसल्यामुळे वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात हिरापूर येथील शेतकऱ्यांनी गुरूवारी (दि.१) सहाय्यक अभियंता वहाने यांना निवेदन देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. चालू वीज बिल भरण्यासाठी २५ दिवसांची मुदत देण्याची मागणी केली. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतात खार टाकली आहे. वीजपुरवठा खंडित केल्यामुळे शेतातील पऱ्हे वाळण्याच्या स्थितीत आहे. एकीकडे वीज नसल्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. वीज वितरण कंपनीने बऱ्याच शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांचा जवळपास वीज बिल पाठविले आहे. अशावेळी लागवड खर्च व विद्युत बिल शेतकऱ्यांना एकाच वेळी करणे शक्य नाही. त्या दिशेने संबंधित विभागाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी हिरापूर येथील शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात माजी उपसभापती बबलू बिसेन, राजाराम चव्हाण, भेजेंद्र रहांगडाले, विकास कटरे, भैयालाल डोहळे उपस्थित होते.