शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

शेंडा मार्गावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:14 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा ते सडक-अर्जुनी डांबरीकरण मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना आपले जीव मुठीत धरुन वाहने चालवावी लागत आहे.

ठळक मुद्देगवतामुळे घडताहेत अपघात :सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा ते सडक-अर्जुनी डांबरीकरण मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना आपले जीव मुठीत धरुन वाहने चालवावी लागत आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही कडेला वाढलेल्या गवतामुळे अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.शेंडा ते सडक-अर्जुनीचे अंतर १४ किमी आहे. सडक-अर्जुनी हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे लोकांना कार्यालयीन कामासाठी येथे जावे लागते. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी रस्त्याची दुर्दशा होवून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहन चालकांना आपली बाजू सोडून कधी कधी उजव्या बाजूने वाहन चालवावे लागते. अशावेळी जीव मुठीत धरुन मोठीच कसरत करावी लागते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तालुक्यातील सर्व रस्त्यांपेक्षा याच मार्गावर वळणाचे सर्वात जास्त प्रमाण आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने वाढलेले ५ ते ७ फुट उंचीचे गवत आहे. त्यामुळे समोरुन येणारे वाहन एकमेकांना दिसत नाही. परिणामी अपघात होवून काहींना जखमी व्हावे लागते. काहींना अपंगत्व तर काहींना जीवसुध्दा गमवावा लागला आहे. याच मार्गावर खोल ढोढीवरील झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत.याच पुलापासून शंभर मीटर अंतरावर जीवघेणे वळण असून त्या वळणावर वाढलेल्या गवताच्या जवळ आलेले वाहन दिसत नाही. त्यामुळेच तेथे एकाच महिन्यात ९ अपघात घडले आहेत. त्याचप्रमाणे उशीखेडा गावापासून मार्कंड परिहार यांच्या शेतापर्यंत या रस्त्याची समस्या अधिकच बिकट आहे. रस्त्यावर खड्डे तर आजूबाजूला बोरीच्या काट्या आहेत. चारचाकी वाहन आले तर पायी चालणाºयांना कुठून चालावे असा प्रश्न पडतो. या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. या परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या दुरूस्ती मागणी अनेकदा केली. मात्र या विभागाच्या अधिकाºयांनी त्याची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांची समस्या कायम आहे. परिणामी वाहन चालकांना गैरसोयीला समोर जावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने परिसरातील नागरिकांच्या समस्येचे दखल घेत रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजविण्याची मागणी केली. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशार या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.