शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेंडा मार्गावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:14 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा ते सडक-अर्जुनी डांबरीकरण मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना आपले जीव मुठीत धरुन वाहने चालवावी लागत आहे.

ठळक मुद्देगवतामुळे घडताहेत अपघात :सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा ते सडक-अर्जुनी डांबरीकरण मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना आपले जीव मुठीत धरुन वाहने चालवावी लागत आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही कडेला वाढलेल्या गवतामुळे अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.शेंडा ते सडक-अर्जुनीचे अंतर १४ किमी आहे. सडक-अर्जुनी हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे लोकांना कार्यालयीन कामासाठी येथे जावे लागते. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी रस्त्याची दुर्दशा होवून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहन चालकांना आपली बाजू सोडून कधी कधी उजव्या बाजूने वाहन चालवावे लागते. अशावेळी जीव मुठीत धरुन मोठीच कसरत करावी लागते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तालुक्यातील सर्व रस्त्यांपेक्षा याच मार्गावर वळणाचे सर्वात जास्त प्रमाण आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने वाढलेले ५ ते ७ फुट उंचीचे गवत आहे. त्यामुळे समोरुन येणारे वाहन एकमेकांना दिसत नाही. परिणामी अपघात होवून काहींना जखमी व्हावे लागते. काहींना अपंगत्व तर काहींना जीवसुध्दा गमवावा लागला आहे. याच मार्गावर खोल ढोढीवरील झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत.याच पुलापासून शंभर मीटर अंतरावर जीवघेणे वळण असून त्या वळणावर वाढलेल्या गवताच्या जवळ आलेले वाहन दिसत नाही. त्यामुळेच तेथे एकाच महिन्यात ९ अपघात घडले आहेत. त्याचप्रमाणे उशीखेडा गावापासून मार्कंड परिहार यांच्या शेतापर्यंत या रस्त्याची समस्या अधिकच बिकट आहे. रस्त्यावर खड्डे तर आजूबाजूला बोरीच्या काट्या आहेत. चारचाकी वाहन आले तर पायी चालणाºयांना कुठून चालावे असा प्रश्न पडतो. या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. या परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या दुरूस्ती मागणी अनेकदा केली. मात्र या विभागाच्या अधिकाºयांनी त्याची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांची समस्या कायम आहे. परिणामी वाहन चालकांना गैरसोयीला समोर जावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने परिसरातील नागरिकांच्या समस्येचे दखल घेत रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजविण्याची मागणी केली. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशार या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.