शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

राज्य महामार्गावर खड्ड्यांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 21:39 IST

प्रमुख राज्य महामार्ग ११ वर सुकी फाटा ते बरडटोली दरम्यान रस्त्याचे काम सहा महिन्यापूर्वी झाले होते. आता रस्त्याला पुन्हा मोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देअपघात वाढले : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : प्रमुख राज्य महामार्ग ११ वर सुकी फाटा ते बरडटोली दरम्यान रस्त्याचे काम सहा महिन्यापूर्वी झाले होते. आता रस्त्याला पुन्हा मोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेविषयी शंका व्यक्त केली जात आहे. या रस्त्याने वाहने चालविणे म्हणजे तारेवरची कसरत झालेली आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.अर्जुनी मोरगाव येथून कोहमाराच्या दिशेने जाताना ठिकठिकाणी खड्डे दिसून येत आहेत. या खड्ड्यांची खोली मोठी आहे. सदर दुहेरी रस्त्याच्या एका बाजूचे अर्धवट काम गतवर्षी झाले. डांबराच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले.या रस्त्याने वाहतूक करताना वाहनाने हेलकावे घेतले नाही तर नवलच. याच रस्त्याच्या दुसºया बाजूला सुद्धा खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना वाहन कुठून हाकावे, हा मोठा प्रश्न पडतो. खड्ड्यात वाहन आदळून वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात छोटे मोठे अपघात होत आहेत.अर्जुनी शहराबाहेरील मोरगाव रोड टी पॉर्इंटपासून तर बरडटोलीपर्यंत ठिकठिकाणी रस्त्यावर लांबच लांब खड्डे आहेत. संबंधित विभागाला हे खड्डे कसे दिसत नाही, हा प्रश्न आहे. खड्डे बुजवून त्यावर हॉट मिक्सिंगचे काम केले जात असतानाही परत काही कालावधीतच पुन्हा खड्डे पडण्याच्या प्रकाराला प्रवाशी कंटाळले आहेत.या मार्गाची रुंदी कमी असून या रस्त्यावर सतत वर्दळ असते. अनेकदा अपघातही होतात. त्यामुळे या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची नितांत आवश्यकता आहे. याकडे लोपकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. एखाद्याच्या जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे.