शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

९६ गावांना पुराचा संभाव्य धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:18 IST

गोंदिया : मान्सून कालावधी सुरू झाला असून, जिल्ह्यातील ९६ गावांना पुराचा संभाव्य धोका आहे. यासाठी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी ...

गोंदिया : मान्सून कालावधी सुरू झाला असून, जिल्ह्यातील ९६ गावांना पुराचा संभाव्य धोका आहे. यासाठी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शनिवारी (दि. १०) संभाव्य पूरपरिस्थिती असलेल्या गोंदिया तालुक्यातील बिरसोला, भदयाटोला, कासा, पुजारीटोला, मरारटोला, ब्राह्मणटोला व काटी या गावांना भेट देऊन मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने केलेले नियोजन व भौगोलिक परिस्थितीची पाहणी केली.

जिल्ह्यात मागीलवर्षी २०२०मध्ये ऑगस्ट महिन्यात गोंदिया व तिरोडा या दोन तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पूरपरिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे, घर, गोठे इत्यादींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी प्रत्यक्ष पूरप्रवण गावांना भेट देऊन तेथील भौगोलिक परिस्थिती व पूर येण्याची कारणे तसेच शोध व बचाव करण्याकरिता

प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती उपस्थित प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून घेतली. वैनगंगा व बाघ नदीच्या काठावर असलेली गावे व त्यातील खोलगट भागातील घरांमध्ये पुराच्या पाण्यामुळे होणारे नुकसान व शासनाकडून तत्काळ मदत देण्याकरिता बोटीची व मनुष्यबळाची पुरेशी व्यवस्था इत्यादींबाबत जिल्हाधिकारी यांनी विस्तृत माहिती घेतली. यावेळी उपस्थित गावकऱ्यांशी जिल्हाधिकारी यांनी संवाद साधून त्यांच्यादेखील समस्या जाणून घेतल्या. अपर तहसीलदार अनिल खडतकर, नायब तहसीलदार जी. पी. शिंगाडे, पूर नियंत्रण अधिकारी रमेश मेश्राम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, रावणवाडी पोलीस निरीक्षक उमेश पाटील, मंडल अधिकारी एन. बी. वर्मा, डी. एच. पोरचेट्टीवार, तलाठी जी. पी. सोनवाने व ए. एल. वालोदे, बिरसोलाचे सरपंच सरोजिनी दांदळे, उपसरपंच देवलाल जंभरे, पोलीसपाटील दिलीप तुरकर, कासा गावचे सरपंच कृष्णी मरठे, पोलीसपाटील रमेश येसने, कोतवाल पिंटू बागडे उपस्थित होते.

.............

पावसाळ्यात तुटतो संपर्क

या भागात पूल व रस्त्यांची उंची कमी असल्यामुळे पूरपरिस्थितीच्या वेळेस एका गावाचा दुसऱ्या गावाशी संपर्क पूर्णपणे तुटतो. म्हणून या भागात असलेल्या पुलांची व रस्त्यांची उंची वाढविण्यासाठी गावकऱ्यांनी विनंती केली. उन्हाळी पीक घेण्यासाठी या भागात पाणी

पुरविण्यासाठी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची यावेळी गावकऱ्यांनी मागणी केली.

.............

जिल्हाधिकारी यांनी केला त्या आजीचा सत्कार...

गोंदिया तालुक्यातील मरारटोला या गावातील जमरे कुटुंब यांचे निवास अत्यंत खोलगट भागात असून, दरवर्षी पूरपरिस्थितीमध्ये पुराचे पाणी त्यांच्या घरात शिरते. त्यामुळे या कुटुंबीयांना दरवर्षी सुरक्षित स्थळी हलविण्यात येते. हे कुटुंब संयुक्त कुटुंब पध्दतीने राहात असून, कुटुंबातील सदस्यांची संख्या ४४ एवढी आहे. या कुटुंबातील प्रमुख ८५ वर्षांची वयोवृध्द आजी कारीबाई रामचंद जमरे यांनी मागीलवर्षी

उदभवलेल्या पूरपरिस्थितीवर मात करून कुटुंबीयांचे व स्वत:चे संरक्षण केल्यामुळे जिल्हाधिकारी खवले यांनी त्या आजीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

.............