शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

९६ गावांना पुराचा संभाव्य धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:18 IST

गोंदिया : मान्सून कालावधी सुरू झाला असून, जिल्ह्यातील ९६ गावांना पुराचा संभाव्य धोका आहे. यासाठी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी ...

गोंदिया : मान्सून कालावधी सुरू झाला असून, जिल्ह्यातील ९६ गावांना पुराचा संभाव्य धोका आहे. यासाठी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शनिवारी (दि. १०) संभाव्य पूरपरिस्थिती असलेल्या गोंदिया तालुक्यातील बिरसोला, भदयाटोला, कासा, पुजारीटोला, मरारटोला, ब्राह्मणटोला व काटी या गावांना भेट देऊन मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने केलेले नियोजन व भौगोलिक परिस्थितीची पाहणी केली.

जिल्ह्यात मागीलवर्षी २०२०मध्ये ऑगस्ट महिन्यात गोंदिया व तिरोडा या दोन तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पूरपरिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे, घर, गोठे इत्यादींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी प्रत्यक्ष पूरप्रवण गावांना भेट देऊन तेथील भौगोलिक परिस्थिती व पूर येण्याची कारणे तसेच शोध व बचाव करण्याकरिता

प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती उपस्थित प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून घेतली. वैनगंगा व बाघ नदीच्या काठावर असलेली गावे व त्यातील खोलगट भागातील घरांमध्ये पुराच्या पाण्यामुळे होणारे नुकसान व शासनाकडून तत्काळ मदत देण्याकरिता बोटीची व मनुष्यबळाची पुरेशी व्यवस्था इत्यादींबाबत जिल्हाधिकारी यांनी विस्तृत माहिती घेतली. यावेळी उपस्थित गावकऱ्यांशी जिल्हाधिकारी यांनी संवाद साधून त्यांच्यादेखील समस्या जाणून घेतल्या. अपर तहसीलदार अनिल खडतकर, नायब तहसीलदार जी. पी. शिंगाडे, पूर नियंत्रण अधिकारी रमेश मेश्राम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, रावणवाडी पोलीस निरीक्षक उमेश पाटील, मंडल अधिकारी एन. बी. वर्मा, डी. एच. पोरचेट्टीवार, तलाठी जी. पी. सोनवाने व ए. एल. वालोदे, बिरसोलाचे सरपंच सरोजिनी दांदळे, उपसरपंच देवलाल जंभरे, पोलीसपाटील दिलीप तुरकर, कासा गावचे सरपंच कृष्णी मरठे, पोलीसपाटील रमेश येसने, कोतवाल पिंटू बागडे उपस्थित होते.

.............

पावसाळ्यात तुटतो संपर्क

या भागात पूल व रस्त्यांची उंची कमी असल्यामुळे पूरपरिस्थितीच्या वेळेस एका गावाचा दुसऱ्या गावाशी संपर्क पूर्णपणे तुटतो. म्हणून या भागात असलेल्या पुलांची व रस्त्यांची उंची वाढविण्यासाठी गावकऱ्यांनी विनंती केली. उन्हाळी पीक घेण्यासाठी या भागात पाणी

पुरविण्यासाठी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची यावेळी गावकऱ्यांनी मागणी केली.

.............

जिल्हाधिकारी यांनी केला त्या आजीचा सत्कार...

गोंदिया तालुक्यातील मरारटोला या गावातील जमरे कुटुंब यांचे निवास अत्यंत खोलगट भागात असून, दरवर्षी पूरपरिस्थितीमध्ये पुराचे पाणी त्यांच्या घरात शिरते. त्यामुळे या कुटुंबीयांना दरवर्षी सुरक्षित स्थळी हलविण्यात येते. हे कुटुंब संयुक्त कुटुंब पध्दतीने राहात असून, कुटुंबातील सदस्यांची संख्या ४४ एवढी आहे. या कुटुंबातील प्रमुख ८५ वर्षांची वयोवृध्द आजी कारीबाई रामचंद जमरे यांनी मागीलवर्षी

उदभवलेल्या पूरपरिस्थितीवर मात करून कुटुंबीयांचे व स्वत:चे संरक्षण केल्यामुळे जिल्हाधिकारी खवले यांनी त्या आजीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

.............