शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

पाच दिवसांपासून पॉझिटिव्हिटी रेट एक टक्केच्या आतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:20 IST

गोंदिया : जिल्ह्याभोवतीचा कोरोनाचा विळखा आता पूर्णपणे शिथिल होत आहे. बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून, कोरोनावर मात करणाऱ्यांचा ...

गोंदिया : जिल्ह्याभोवतीचा कोरोनाचा विळखा आता पूर्णपणे शिथिल होत आहे. बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून, कोरोनावर मात करणाऱ्यांचा आलेख वाढत आहे. मागील पाच दिवसांपासून कोरोना बाधितांचा पाॅझिटिव्हिटी रेट एक टक्केच्या आतच असल्याचे दिलासादायक चित्र आहे, तर कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ २८१ वर आली आहे.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी (दि. ९) जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने एकूण २,८१३ आरटीपीसीआर आणि अँटिजन स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात २३ स्वॅब नमुने कोरोना पाॅझिटिव्ह आले. याचा पॉझिटिव्हिरेट ०.८२ टक्के आहे, तर ४४ बाधितांनी कोरोनावर मात केली असून, दोन बाधितांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १,७२,९९२ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,४७,५८९ नमुने निगेटिव्ह आले. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यांतर्गत १,७२,५८९ नमुने तपासणी करण्यात आले. त्यात १,५१,६८२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४०,९८३ कोरोना बाधित आढळले असून, यापैकी ४०,००६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत २८१ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर १४८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.

...........

संसर्गात घट तरी चाचण्या वाढल्या

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने चाचण्या करणाऱ्यांचे प्रमाण जिल्ह्यात अलीकडे वाढले आहे. कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात आटाेक्यात आहे. मात्र, यानंतरही जिल्ह्यात दररोज साडेतीन हजारांवर चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

............

२ लाख ८७ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी जिल्ह्यात व्यापक स्वरुपात १४० लसीकरण केंद्रांवरून लसीकरण केले जात आहे. यांतर्गत आतापर्यंत २ लाख ८७ हजार ७५७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या दोन लाखावर आहे, तर दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.

....................

मास्कचा करा नियमित वापर

सोमवारपासून जिल्ह्यात अनलॉक करण्यात आले. मात्र, यामुळे नागरिक पुन्हा बिनधास्तपणे वागत आहेत. अनेकांनी मास्कचा वापर करणे बंद केले आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे.

.........